शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अभियंतापदाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात शक्य असेल तो बदल करा; औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:52 IST

जलसंपदा विभाग आणि मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंतापदासाठीच्या परीक्षा एकाच दिवशी

ठळक मुद्दे जलसंपदा व मुंबई महापालिकेत एकाच दिवशी होणार परीक्षा

औरंगाबाद : जलसंपदा विभाग आणि मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंतापदासाठीच्या परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून शक्य असेल तो बदल करावा, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. अविनाश घारोटे यांनी शुक्रवारी (दि. २२) देऊन  याचिका निकाली काढली. 

गुरुवारी (दि. २१) झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने सरकारी वकिलांना वेळापत्रकासंदर्भात माहिती घेण्याची तोंडी सूचना केली होती. त्यानुसार सरकारी वकील सिद्धार्थ यावलकर यांनी शुक्रवारी खंडपीठात माहिती सादर केली की, परीक्षा वेळापत्रक बदलण्यासंदर्भात जलसंपदा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, तसेच नागरी विकास विभागाची संयुक्त बैठक झाली. जलसंपदा विभागाची जवळपास बरीच प्रक्रिया पार पडलेली आहे, त्यामुळे परीक्षा वेळापत्रक बदलता येणार नसल्याचा निर्णय बैठकीत झाला आहे, तसेच मुंबई महापालिकेनेही वेळापत्रक बदलण्यास असमर्थता दर्शविली असल्याचे यावलकर यांनी खंडपीठाला सांगितले. यावर खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश देत याचिका निकाली काढली.

प्रेम दराडे यांच्यासह पाच उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे. जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता (सिव्हिल ग्रेड-बी) या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र, परीक्षेची तारीख निश्चित के ली नव्हती, तसेच मुंबई महापालिकेने आॅक्टोबर २०१९ मध्ये कनिष्ठ अभियंता (सिव्हिल ग्रेड-बी) या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती.  ही परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. जलसंपदा विभागातर्फे  २५ आणि २६ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे आॅनलाईन संकेतस्थळाद्वारे जाहीर केले. परीक्षार्थ्यांनी वेळापत्रकात बदल करण्याबाबत संबंधित विभागांना ई-मेलद्वारे कळविले. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. 

याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांनी निदर्शनास आणून दिले की, जलसंपदा विभागाने सदर पदासाठी तब्बल चार वर्षांनंतर जाहिरात दिली आहे. या विभागातर्फे  २५ आणि २६ नोव्हेंबरदरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे. यामुळे २५ नोव्हेंबर रोजी परीक्षा असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या उमेदवारांवर अन्याय होईल. इतर उमेदवार महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या परीक्षा देऊ शकतील. जलसंपदा परीक्षेसाठी राज्यभरातून ३५ ते ४० हजार उमेदवार बसले असून, संबंधित परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यासाठी येणारा खर्च याचिकाकर्त्यांसह इतर उमेदवार करण्यास तयार असल्याचाही युक्तिवाद केल्याचे अ‍ॅड. जैस्वाल यांनी सांगितले. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठexamपरीक्षाAurangabadऔरंगाबाद