शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

अभियंतापदाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात शक्य असेल तो बदल करा; औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:52 IST

जलसंपदा विभाग आणि मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंतापदासाठीच्या परीक्षा एकाच दिवशी

ठळक मुद्दे जलसंपदा व मुंबई महापालिकेत एकाच दिवशी होणार परीक्षा

औरंगाबाद : जलसंपदा विभाग आणि मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंतापदासाठीच्या परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून शक्य असेल तो बदल करावा, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. अविनाश घारोटे यांनी शुक्रवारी (दि. २२) देऊन  याचिका निकाली काढली. 

गुरुवारी (दि. २१) झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने सरकारी वकिलांना वेळापत्रकासंदर्भात माहिती घेण्याची तोंडी सूचना केली होती. त्यानुसार सरकारी वकील सिद्धार्थ यावलकर यांनी शुक्रवारी खंडपीठात माहिती सादर केली की, परीक्षा वेळापत्रक बदलण्यासंदर्भात जलसंपदा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, तसेच नागरी विकास विभागाची संयुक्त बैठक झाली. जलसंपदा विभागाची जवळपास बरीच प्रक्रिया पार पडलेली आहे, त्यामुळे परीक्षा वेळापत्रक बदलता येणार नसल्याचा निर्णय बैठकीत झाला आहे, तसेच मुंबई महापालिकेनेही वेळापत्रक बदलण्यास असमर्थता दर्शविली असल्याचे यावलकर यांनी खंडपीठाला सांगितले. यावर खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश देत याचिका निकाली काढली.

प्रेम दराडे यांच्यासह पाच उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे. जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता (सिव्हिल ग्रेड-बी) या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र, परीक्षेची तारीख निश्चित के ली नव्हती, तसेच मुंबई महापालिकेने आॅक्टोबर २०१९ मध्ये कनिष्ठ अभियंता (सिव्हिल ग्रेड-बी) या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती.  ही परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. जलसंपदा विभागातर्फे  २५ आणि २६ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे आॅनलाईन संकेतस्थळाद्वारे जाहीर केले. परीक्षार्थ्यांनी वेळापत्रकात बदल करण्याबाबत संबंधित विभागांना ई-मेलद्वारे कळविले. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. 

याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांनी निदर्शनास आणून दिले की, जलसंपदा विभागाने सदर पदासाठी तब्बल चार वर्षांनंतर जाहिरात दिली आहे. या विभागातर्फे  २५ आणि २६ नोव्हेंबरदरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे. यामुळे २५ नोव्हेंबर रोजी परीक्षा असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या उमेदवारांवर अन्याय होईल. इतर उमेदवार महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या परीक्षा देऊ शकतील. जलसंपदा परीक्षेसाठी राज्यभरातून ३५ ते ४० हजार उमेदवार बसले असून, संबंधित परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यासाठी येणारा खर्च याचिकाकर्त्यांसह इतर उमेदवार करण्यास तयार असल्याचाही युक्तिवाद केल्याचे अ‍ॅड. जैस्वाल यांनी सांगितले. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठexamपरीक्षाAurangabadऔरंगाबाद