शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

घाटीत अन्नाऐवजी औषधी दान करा; प्रशासनाचे स्वयंसेवी संस्थांसह सामाजिक संघटनांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 5:50 PM

स्वयंसेवी संस्था व संघटनांनी अन्नदानाऐवजी औषधी दान करण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्दे गेल्या काही दिवसांत जवळपास १५ ट्रक अन्न रुग्णांच्या नातेवाईकांनी कचऱ्याच्या डब्यात टाकले असल्याचे घाटी प्रशासनाने म्हटले आहे.

औरंगाबाद : घाटीत संपूर्ण मराठवाड्यासह खान्देश व विदर्भाच्या काही भागांतील रुग्ण उपचारार्थ येतात. त्यांच्या समवेत त्यांचे नातेवाईकही सोबत येत असतात. त्यांची गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने विविध स्वयंसेवी संस्था व संघटना अन्नदान करतात. मात्र, हे अन्नदान घाटी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. काही रुग्णांचे नातेवाईक अन्न न खाता ते कचऱ्यात टाकत असल्याचे प्रकार घडत आहेत. यातून कचऱ्याची समस्या निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था व संघटनांनी अन्नदानाऐवजी औषधी दान करण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीत स्वयंसेवी संस्थांसह सामाजिक संघटना अन्नदान करतात. मात्र, रुग्णांचे नातेवाईक संपूर्ण अन्न न खाता ते बहुतांश अन्न कचऱ्यात टाकत असल्याचे आढळून आले आहे. यातून कचऱ्याची नवीनच समस्या निर्माण झाल्याचे घाटी प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांत जवळपास १५ ट्रक अन्न रुग्णांच्या नातेवाईकांनी कचऱ्याच्या डब्यात टाकले असल्याचे घाटी प्रशासनाने म्हटले आहे. हा कचरा आता रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर घाटी प्रशासनाने स्वयंसेवी संस्था आणि संघटनांना विनंती केली आहे. त्यांनी अन्नदानावर होणाऱ्या खर्चातून औषधी खरेदी करावी.गरजू आणि आर्थिक दुर्बल रुग्णांना ती पुरवावी. सलाईन, बँडेजसह इतर कमी खर्चाच्या औषधी रुग्णांना पुरविल्या जाऊ शकतात.

यासाठी या संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे अथवा संस्थांनी अन्नदानाचे साहित्य घाटी रुग्णालयास द्यावे. त्याचे अन्नपदार्थ तयार करून ते रुग्णांना दिले जाईल. घाटी प्रशासनाच्या वाचणाऱ्या पैशांतून गरजू रुग्णांना औषधी दिली जाईल, असाही पर्याय घाटी प्रशासनाने संस्थांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटना काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

औषधींचे दान करावेघाटी रुग्णालय परिसरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच १५ ट्रक उरलेल्या अन्नाचा कचरा आहे. याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्नच आहे. म्हणूनच संस्था आणि संघटनांना आम्ही आवाहन केले आहे की, त्यांनी गरजू रुग्णांना औषधींचे दान करावे.- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद.

आवाहनावर विचार केला जाईल

सकल जैन समाजाच्या अलर्ट ग्रुपच्या वतीने घाटीत दररोज ३०० ते ४०० रुग्णांच्या नातेवाईकांना एक कडधान्य, वरण भात, चपाती आणि शिरा असलेले भोजन मोफत दिले जाते. यासाठी एक वा दोन दात्यांकडून दररोज ४ हजार १०० रुपये घेतले जातात. यातून अन्नदान केले जाते. घाटीतील अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्याने नातेवाईक आम्ही दिलेले अन्न चवीने खातात, तरीही घाटी प्रशासनाच्या आवाहनावर ग्रुपच्या बैठकीत विचार केला जाईल.- अभय गांधी, स्वयंसवेक, भगवान महावीर रसोई घर, सकल जैन समाज.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीmedicineऔषधंdoctorडॉक्टर