शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; पण अभियंता, लाईनमन 'पदा'वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:50 IST

महावितरणच्या पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत ठाण्यात कसून चौकशी

छत्रपती संभाजीनगर : शेतात पेरणीसाठी गेलेल्या कचरू जनार्दन दहीहंडे (वय ५०) व किरण ऊर्फ बाळू जगन्नाथ दहीहंडे (३०) या काका-पुतण्याचा वीजप्रवाहित तारांना स्पर्श होऊन शेतातच अंत झाला. सोमवारी सायंकाळी सहा वाजता चिकलठाणा परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेप्रकरणी चौकशी करण्यात आली. मंगळवारी पहाटे चार वाजता महावितरणचे मुख्य अभियंता, संबंधित लाईनमन, व्हॉट्सॲप (७०६६०४२२५०) क्रमांक असलेला कर्मचारी यांच्यावर, व्हिडीओ पाठवूनही तसेच कारवाई न केलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या महिनाभरापासून महावितरणकडे लोंबकळणाऱ्या या तारा हटविण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून मागणी केली जात होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सोमवारी कचरू व किरण दहीहंडे दोघेही पेरणीच्या पूर्वतयारीसाठी शेतात गेले होते. १५ मे पासून वीजप्रवाह नसलेल्या तारांमध्ये सोमवारीदेखील वीजप्रवाह नसावा, असे वाटल्याने कचरू व किरण यांनी त्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अचानक वीजप्रवाह उतरलेला होता. तारांना स्पर्श करताच दोघेही गंभीररीत्या भाजून शेतातच गतप्राण झाले.

महावितरणच्या बेजबाबदारपणाचा घटनाक्रम-कचरू दहीहंडे यांच्या कुटुंबाची चिकलठाण्याच्या गट क्रमांक ६६८ मध्ये साडेपाच एकर शेती आहे. त्यांच्या शेजारील हरीशचंद्र त्रिभुवन यांची शेतजमीन किरण यांनी बटाईने घेतली हाेती. त्यांच्या शेतातून विमानतळासाठी १५ वर्षांपूर्वी अतिउच्च दाबाची वीजवाहिनी गेली आहे.-त्याखालून थ्रीफेज लाईन गेली असून, १९ मे रोजी वादळात त्यावर झाड कोसळून विजेचे खांब कोसळून तारा लोंबकळल्या होत्या.-दहीहंडे कुटुंबाने महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही बाब कळवली. व्हॉट्सॲपवर व्हिडीओदेखील पाठवले.- तीन दिवसांनी अधिकारी, लाईनमनने भेट देऊन वादळात पडलेला विजेचा खांब काही अंतरावर उभा केला. मात्र, अतिउच्च दाबाचे खांब दुरुस्त केले नाहीत. त्यानंतर वारंवार दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला. मात्र, त्यांना बेजबाबदार महावितरणने प्रतिसाद दिला नाही.

एक कलम टाळले-सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा भाग कोसळून दोन महिलांच्या मृत्यू प्रकरणात क्रांतीचौक पोलिसांनी बीएनएस १०५ (सदोष मनुष्यवध),१२५ (अ), १२५ (ब) (इतरांची जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती) आणि ३(५) (समान उद्देश साध्य करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींनी केलेली कृती) या कलमांतर्गत सहाजणांवर गुन्हा दाखल केला.-एमआयडीसी सिडको पोलिसांनी शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात १२५ (अ, ब) हे कलम टाळून बीएनएस १०५ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

रात्री उशिरापर्यंत पाच अधिकारी, कर्मचारी ठाण्यातदहीहंडे कुटुंबावर ओढवलेल्या संकटानंतर ग्रामस्थ, नातेवाइकांनी महावितरणविरोधात मंगळवारीदेखील संताप व्यक्त केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दुपारीच महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ठाण्यात बोलावले. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू होती.

महावितरणचे मुख्य अभियंता कोण आहेत?- मुख्य अभियंता पवनकुमार कछोट हे सध्या वैद्यकीय रजेवर.- सध्या प्रभारी मुख्य अभियंता महेश पवार हे आहेत.- अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांनी काही दिवस प्रभारी मुख्य अभियंतापदाचा पदभार सांभाळला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी