शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; पण अभियंता, लाईनमन 'पदा'वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:50 IST

महावितरणच्या पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत ठाण्यात कसून चौकशी

छत्रपती संभाजीनगर : शेतात पेरणीसाठी गेलेल्या कचरू जनार्दन दहीहंडे (वय ५०) व किरण ऊर्फ बाळू जगन्नाथ दहीहंडे (३०) या काका-पुतण्याचा वीजप्रवाहित तारांना स्पर्श होऊन शेतातच अंत झाला. सोमवारी सायंकाळी सहा वाजता चिकलठाणा परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेप्रकरणी चौकशी करण्यात आली. मंगळवारी पहाटे चार वाजता महावितरणचे मुख्य अभियंता, संबंधित लाईनमन, व्हॉट्सॲप (७०६६०४२२५०) क्रमांक असलेला कर्मचारी यांच्यावर, व्हिडीओ पाठवूनही तसेच कारवाई न केलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या महिनाभरापासून महावितरणकडे लोंबकळणाऱ्या या तारा हटविण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून मागणी केली जात होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सोमवारी कचरू व किरण दहीहंडे दोघेही पेरणीच्या पूर्वतयारीसाठी शेतात गेले होते. १५ मे पासून वीजप्रवाह नसलेल्या तारांमध्ये सोमवारीदेखील वीजप्रवाह नसावा, असे वाटल्याने कचरू व किरण यांनी त्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अचानक वीजप्रवाह उतरलेला होता. तारांना स्पर्श करताच दोघेही गंभीररीत्या भाजून शेतातच गतप्राण झाले.

महावितरणच्या बेजबाबदारपणाचा घटनाक्रम-कचरू दहीहंडे यांच्या कुटुंबाची चिकलठाण्याच्या गट क्रमांक ६६८ मध्ये साडेपाच एकर शेती आहे. त्यांच्या शेजारील हरीशचंद्र त्रिभुवन यांची शेतजमीन किरण यांनी बटाईने घेतली हाेती. त्यांच्या शेतातून विमानतळासाठी १५ वर्षांपूर्वी अतिउच्च दाबाची वीजवाहिनी गेली आहे.-त्याखालून थ्रीफेज लाईन गेली असून, १९ मे रोजी वादळात त्यावर झाड कोसळून विजेचे खांब कोसळून तारा लोंबकळल्या होत्या.-दहीहंडे कुटुंबाने महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही बाब कळवली. व्हॉट्सॲपवर व्हिडीओदेखील पाठवले.- तीन दिवसांनी अधिकारी, लाईनमनने भेट देऊन वादळात पडलेला विजेचा खांब काही अंतरावर उभा केला. मात्र, अतिउच्च दाबाचे खांब दुरुस्त केले नाहीत. त्यानंतर वारंवार दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला. मात्र, त्यांना बेजबाबदार महावितरणने प्रतिसाद दिला नाही.

एक कलम टाळले-सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा भाग कोसळून दोन महिलांच्या मृत्यू प्रकरणात क्रांतीचौक पोलिसांनी बीएनएस १०५ (सदोष मनुष्यवध),१२५ (अ), १२५ (ब) (इतरांची जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती) आणि ३(५) (समान उद्देश साध्य करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींनी केलेली कृती) या कलमांतर्गत सहाजणांवर गुन्हा दाखल केला.-एमआयडीसी सिडको पोलिसांनी शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात १२५ (अ, ब) हे कलम टाळून बीएनएस १०५ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

रात्री उशिरापर्यंत पाच अधिकारी, कर्मचारी ठाण्यातदहीहंडे कुटुंबावर ओढवलेल्या संकटानंतर ग्रामस्थ, नातेवाइकांनी महावितरणविरोधात मंगळवारीदेखील संताप व्यक्त केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दुपारीच महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ठाण्यात बोलावले. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू होती.

महावितरणचे मुख्य अभियंता कोण आहेत?- मुख्य अभियंता पवनकुमार कछोट हे सध्या वैद्यकीय रजेवर.- सध्या प्रभारी मुख्य अभियंता महेश पवार हे आहेत.- अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांनी काही दिवस प्रभारी मुख्य अभियंतापदाचा पदभार सांभाळला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी