शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लवकरच महाविकास आघाडी 'संभाजीनगर'वर शिक्कामोर्तब करणार : सुभाष देसाई

By सुमेध उघडे | Updated: January 16, 2021 12:30 IST

Aurangabad Rename शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करून टाकले आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी संभाजीनगरवर सकारात्मक असल्याचे स्पष्ट संकेत लवकरच शहर नामकरणासाठी महाविकास आघाडी संभाजीनगरचा प्रस्ताव आणणार

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करून टाकले आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच औरंगजेब सेक्युलर होता का?  असा प्रश्न उपस्थित केला. लवकरच महाविकास आघाडी सरकार शहराच्या नामकरणावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वास पालकमंत्री  सुभाष देसाई यांनी आज औरंगाबादेत व्यक्त केला.

शहराच्या नामकरणावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. औरंगाबाद की संभाजीनगर यावरून भाजप शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सुद्धा विरोधकांनी या मुद्यावरून कोंडीत पकडले आहे. कॉंग्रेसने संभाजीनगर नावावरून जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने संयमी भूमिका घेतली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रसने याचा निर्णय महाविकास आघाडी मिळून घेईल. तीनही पक्षांचे जेष्ठ नेते यावर जे निर्णय घेतील तो सर्व मान्य असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक पेटणार असे दिसत आहे. 

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत बेबनाव आहे असे आरोप विरोधक करत आहेत. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावर प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी यावर सकारात्मक असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. लवकरच शहर नामकरणासाठी महाविकास आघाडी संभाजीनगरचा प्रस्ताव आणेल असे त्यांनी म्हटले आहे. प्रस्ताव आणून महाविकास आघाडी सरकार शहराच्या नामकरणावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण होत आहे यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाईAurangabad renameऔरंगाबादचे-नामांतर