शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

छत्रपती संभाजीनगरात १३ जुलै रोजी मनोज जरांगे यांची महासंवाद रॅलीचे आयोजन

By बापू सोळुंके | Updated: June 21, 2024 20:23 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला मराठा समाजाने पूर्ण ताकदीनिशी उभे राहण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला सगे-सोयऱ्याचे आरक्षण देणारा कायदा करावा आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकाला १३ जुलैपर्यंत  मुदत दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात जरांगे यांची महासंवाद रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.

सकल मराठा समाजाची जिल्हास्तरीय बैठक शुक्रवारी दुपारी हर्सूल येथील एका मंगलकार्यालयात झाली. या बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला मराठा समाजाने पूर्ण ताकदीनिशी उभे राहण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला. १३ जुलै रोजी राजमाता जिजाऊं चौक(केम्ब्रीज चौक)ते क्रांतीचौक अशी महासंवाद रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाने महारॅलीत सहभागी व्हावे, यासाठी जास्तीत जास्त गावांत जनजागरण करण्याची जबाबदारी तालुका  आणि  विविध सर्कलमधील स्वयंसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर यावेळी सोपविण्यात आली. महारॅलीकरीता येणाऱ्या नागरीकांची पिण्याच्या पाण्याची सुविधा केली जाईल. तसेच वाहनतळाची माहिती लवकरच दिली जाणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.

या बैठकीसाठी प्रा.चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, अप्पासाहेब कुढेकर, सतिश वेताळ, सुनील कोटकर, सचीन हावळे, मनोज गायके, प्रभाकर मते, पंढरीनाथ गोडसे, गणपत म्हस्के, भारत कदम, राजीव थिटे, अजय गंडे,रवींद्र नीळ, गणेश मोटे , अजय पाटील राजू मोहिते , डॉ. मनीषा मराठे, रेखा वाहटुळे, कल्पना साखळे, शारदा शिंदे, दिपाली पाटील यांच्यासह शेकडो समाजबांधवांची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण