शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

महाराष्ट्रात बिहारपेक्षाही अधिक विषमता; दारिद्र्यरेषेचे प्रमाण २६ टक्क्यांवर: नीरज हातेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:14 IST

देशामध्ये ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा पुरवण्यामध्ये केरळ हे देशातील पहिल्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र हा २७ व्या स्थानी आहे.

छत्रपती संभाजीनगर : जागतिक बँकेच्या दारिद्र्याच्या परिमाणानुसार महाराष्ट्रातील दारिद्र्यरेषेचे प्रमाण हे २६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. हे बिहार आणि अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. महाराष्ट्राच्या विषमतेचा विचार केला तर इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातील ग्रामीण विषमताही सर्वाधिक आणि चिंताजनक आहे, असे मत अर्थतज्ज्ञ प्रा.नीरज हातेकर (वाई, जि. सातारा) यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

देवगिरी महाविद्यालयाच्या फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रा. हातेकर यांनी गुंफले. त्यांनी महाराष्ट्राचा( बे)रोजगारनामा या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक डी. एस. काटे तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. शशिकुमार चौधरी, प्राचार्य अशोक तेजनकर आणि समन्वयक प्रा. गणेश मोहिते होते. यावेळी बोलताना प्रा. हातेकर म्हणाले की, जागतिक बँकेचे दारिद्र्याचे निकष अभ्यासले तर महाराष्ट्रातील दारिद्र्यरेषेचे प्रमाण हे २६ टक्क्यांवर आहे. या तुलनेने बिहारचे ग्रामीण दारिद्र्य २३ टक्के आहे. महाराष्ट्रात विषमताही अन्य राज्यांच्या तुलनेने अधिक आहे. देशामध्ये ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा पुरवण्यामध्ये केरळ हे देशातील पहिल्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र हा २७ व्या स्थानी आहे.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण चीनच्या कित्येक पटीने मागे आहोत. असे असताना आपण चीनच्या मॉडेलने विकसित देशाच्या रांगेत जाण्याचे स्वप्न पाहत आहोत. मात्र चीनने स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक अधिकार दिलेले आहेत. दुसरीकडे मात्र आपल्या देशाच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सरकारच्या मदतीवर विसंबून असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ अन्य देशातील स्पेअर पार्ट्स येथे आणून त्याची जुळवाजुळव करून मेक इन इंडियाचे लेबल आपण लावत आहोत. यातून आपल्याला विशेष आर्थिक लाभ होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEconomyअर्थव्यवस्था