शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

महाराष्ट्रात बिहारपेक्षाही अधिक विषमता; दारिद्र्यरेषेचे प्रमाण २६ टक्क्यांवर: नीरज हातेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:14 IST

देशामध्ये ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा पुरवण्यामध्ये केरळ हे देशातील पहिल्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र हा २७ व्या स्थानी आहे.

छत्रपती संभाजीनगर : जागतिक बँकेच्या दारिद्र्याच्या परिमाणानुसार महाराष्ट्रातील दारिद्र्यरेषेचे प्रमाण हे २६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. हे बिहार आणि अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. महाराष्ट्राच्या विषमतेचा विचार केला तर इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातील ग्रामीण विषमताही सर्वाधिक आणि चिंताजनक आहे, असे मत अर्थतज्ज्ञ प्रा.नीरज हातेकर (वाई, जि. सातारा) यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

देवगिरी महाविद्यालयाच्या फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रा. हातेकर यांनी गुंफले. त्यांनी महाराष्ट्राचा( बे)रोजगारनामा या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक डी. एस. काटे तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. शशिकुमार चौधरी, प्राचार्य अशोक तेजनकर आणि समन्वयक प्रा. गणेश मोहिते होते. यावेळी बोलताना प्रा. हातेकर म्हणाले की, जागतिक बँकेचे दारिद्र्याचे निकष अभ्यासले तर महाराष्ट्रातील दारिद्र्यरेषेचे प्रमाण हे २६ टक्क्यांवर आहे. या तुलनेने बिहारचे ग्रामीण दारिद्र्य २३ टक्के आहे. महाराष्ट्रात विषमताही अन्य राज्यांच्या तुलनेने अधिक आहे. देशामध्ये ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा पुरवण्यामध्ये केरळ हे देशातील पहिल्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र हा २७ व्या स्थानी आहे.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण चीनच्या कित्येक पटीने मागे आहोत. असे असताना आपण चीनच्या मॉडेलने विकसित देशाच्या रांगेत जाण्याचे स्वप्न पाहत आहोत. मात्र चीनने स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक अधिकार दिलेले आहेत. दुसरीकडे मात्र आपल्या देशाच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सरकारच्या मदतीवर विसंबून असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ अन्य देशातील स्पेअर पार्ट्स येथे आणून त्याची जुळवाजुळव करून मेक इन इंडियाचे लेबल आपण लावत आहोत. यातून आपल्याला विशेष आर्थिक लाभ होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEconomyअर्थव्यवस्था