शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

काय चुकले ते सांगा, चुक सुधारतो : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 08:46 IST

राग काढतांना सुध्दा आपण कुणाला मदत करतो आहोत, हे पण पहा.

ठळक मुद्देशरद पवार, अजित पवारांवर टीकास्त्र

औरंगाबाद : शहराभोवती एमआयएमचा पडणारा विळखा काढून टाका. आजवर जे काय घडले असेल, त्यावरून तुमचा राग आमच्यावर आहे, हे मान्य आहे. जर का तुम्ही त्यावेळी चिडून शिवसेना-भाजपाला मतदान केले नसेल तर काय चुक असेल ती सांगा, चुक सुधारण्याची जबाबदारी माझी आहे. जर का? शिक्षा म्हणून तुम्ही मतदान केले असेल तर त्याची फळे पुढच्या पिढीला भोगावी लागतील. जे झाले ते झाले पुन्हा होऊ देऊ नका. चुक झाली तर जबाबदारी माझी असेल. राग काढतांना सुध्दा आपण कुणाला मदत करतो आहोत, हे पण पहा. असे आवाहन शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुरूवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेत केले. सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे  सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांनाही ठाकरे यांनी टीकेचे लक्ष्य केले.

विधानसभा निवडणुकी निमित्ताने युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात ठाकरे यांनी तीन सभा घेतल्या. शेवटची सभा त्यांनी औरंगाबादेत घेतली. ठाकरे म्हणाले, दिल्लीत औरंगाबादचा खासदार नाही, याचे दु:ख आजही कायम आहे. आपल्या रागाची मला कल्पना आहे. चुका झाल्या तर तुुम्ही कान खेचाच, मीही कान उपटल्या शिवाय राहणार नाही.शहरात कचºयाचा प्रश्न होता, तो आजही थोडाफार शिल्लक असेल, तुम्ही सांगा, त्यावेळी नामुष्कीची वेळ होती. कचरा टाकायचा कुठे ही समस्या होती. तेव्हा जे कचºयाचे साम्राज्य होते. ते आता राहिले आहे काय, ते सांगा. पाण्याचा प्रश्न सुटेल, १६८० कोटी सरकारने मंजुर केले आहेत. स्वच्छ पाणी सरकार आल्यावर देणार. गेले पाच वर्ष अनुभव गोळा करण्यात गेले. शिवसेना-भाजपातील संबंध कसे राहिले हे जगजाहीर आहे. पाच वर्षांत कधी तरी शिवसेनेने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला का? तंगड्यात तंगड्या घातल्या का, शेतकºयांच्या बाबतीत जे पटले नाही, ते पटले नाही. आमचे म्हणणे पटले ते सरकारने केले. मारून मुटकून विकास परवडणारा नाही. या शहरात जसा कचºयाचा प्रश्न होता. तसा उद्योगधंद्याचा प्रश्न आहे. बेरोजगारी वाढते आहे. महिलांमध्ये शिक्षण वाढतेय पण बेरोजगारी आहे. सरकार आल्यावर स्वस्तातील घरकुल देण्यात येतील.

अजित पवार म्हणतात, ५ वर्ष झोपले होतात काय. झोपलो नव्हतो तुमचे नाटकं  पाहत होतो. रडतात काय, लपतात काय, सुशील कुमार म्हणाले, थकलो आहोत. टीका करायची तर कुणावर करायची, असा प्रश्न आहे. काँग्रेस पक्ष देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचा घटक आहे. पुर्वीचे नेते विभूतीप्रमाणे होते. शिवसेनाप्रमुख म्हणायचे, तेव्हाचे नेते समोर आल्यावर आदराने मान खाली जायची. आताचे नेते समोर आल्यावर शरमेने मान खाली जाते. तसेच शरद पवार आहेत, कोणत्याही परिस्थितीत सरकार पाडल्याविना राहणार नाही, असे म्हणतात. पवार तुम्ही वयाने मोठे आहात. सरकार पाडण्याचा दांडगा अनुभव आहे. आपण विघ्नसंतोषी आहात हे सगळ्यांना माहिती आहे. वसंतदादांचे सरकार आपण पाडले होते, हे माहिती आहे. आम्ही तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. कारण हे सरकारच जाणार नाही, तुम्ही असेच कार्यरत रहा, तुम्हाला काम मिळू दे अशी माझी प्रार्थना आहे. व्यासपीठावर युतीचे सर्व उमेदवार,स्थानिक नेते होते.

जाधवांचे नाव न घेता हल्लाकन्नडच्या सभेत बोललो. विश्वासघातकीने औरंगाबादवरील भगवा उतरविण्यासाठी हिरव्याची साथ दिली, त्याला आता माफी नाही. पाच वर्ष त्याच्या चुका लहान म्हणून पोटात घेत समजून घेतले. भगव्याच्या विरोधात गेला आता सहन करणार नाही. असा हल्ला हर्षवर्धन जाधव यांच्यावर ठाकरे यांनी नाव न घेता चढविला.

खा.जलील यांच्यावर टीकामराठवाडा मुक्तीसंग्रामातील ही वीरांची भूमी आहे. वीरांचे स्मरण करण्यासाठी सुध्दा हिरवा खासदार (खा.इम्तियाज जलील) आला नाही. याची त्याला नाही,आपल्याला लाज वाटली पाहिजे. माझे यावेळी राहिले पुढच्यावेळी येईल, असे बोलतो. तो काही उपकार करत नाही.

तुमचे गडकरी, आमचे शिंदेयुतीच्या सरकारच्या काळात नितीन गडकरींनी बुल्डोझरप्रमाणे काम केले, रस्ते निर्माण केले. तसेच आता समृध्दी महामार्गाचे काम करतांना शिवसेनेचे एकनाथ शिंदे नाहीत काय? असेही ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेनाaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिम