शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

'खाम नदीचे प्रदूषण रोखा';पर्यावरणप्रेमींकडून औरंगाबाद शहराचा 'पर्यावरण जाहीरनामा' तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 19:57 IST

पर्यावरणप्रेमी नागरिक, अभ्यासकांच्या चर्चेतील मुद्यांचे संकलन

ठळक मुद्देऔरंगाबाद कनेक्ट टीम आणि स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था यांचा पुढाकार

औरंगाबाद : औरंगाबाद कनेक्ट टीम आणि स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद शहराचा पर्यावरण जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. खाम नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय करणे, वृक्ष संवर्धन, स्वेच्छा निधीपैकी दरवर्षी किमान १० टक्के निधी पर्यावरणविषयक कामांसाठीच खर्च करणे बंधनकारक करावे, आदी मुद्यांचा त्यात समावेश आहे.

पर्यावरणप्रेमी नागरिक आणि अभ्यासकांच्या चर्चेतून हा पर्यावरण जाहीरनामा तयार झाला आहे. औरंगाबादच्या सर्व मतदारसंघांतील उमेदवारांना तो दिला जात आहे. सोबतच उमेदवारांनी याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात करण्याची विनंती करण्यात येत आहे. निवडणुकीनंतर तिन्ही मतदारसंघांतील नवनिर्वाचित आमदारांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. 

जाहीरनाम्यात वीजपुरवठा केबल पूर्णत: भूमिगत करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाकडे प्रस्ताव आणि पाठपुरावा, वृक्षतोडीवर निर्बंध घालण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी पाठपुरावा आमदारांनी करावा, दरवर्षी लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात किमान २०० वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे, दक्षिण भागातील जैवविविधता धोक्यात येऊन आॅक्सिजन हब संपुष्टात येत आहेत. यासाठी विशेष लक्ष देणे, आदी बाबींचा  समावेश आहे.

जाहीरनाम्यातील काही मुद्दे - खाम नदीचे प्रदूषण तात्काळ रोखण्यासाठी उपाययोजना करणे. - खाम नदीतील अतिक्रमणे हटवणे. नदी काठावर वृक्ष लागवड करणे.- सुखना नदीत सोडले जाणारे सांडपाणी थांबवणे.- कचरा संकलन ते प्रक्रिया याची पूर्ण माहिती नागरिकांना जाहीर करणे.- नहर-ए-अंबरी व अन्य पुरातन नहरींच्या संवर्धनासाठी योजना आखणे. - पाणी वापर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारला आग्रह धरणे.- जलसंवर्धनासाठी निधी मिळविण्यासह विहिरी, बारवांचे पुरुज्जीवन.- सर्व कारखान्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अनिवार्य करणे.- दरवर्षी पर्यावरण वस्तुस्थिती अहवाल जाहीर करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रवृत्त करणे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमAurangabadऔरंगाबाद