शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

'खाम नदीचे प्रदूषण रोखा';पर्यावरणप्रेमींकडून औरंगाबाद शहराचा 'पर्यावरण जाहीरनामा' तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 19:57 IST

पर्यावरणप्रेमी नागरिक, अभ्यासकांच्या चर्चेतील मुद्यांचे संकलन

ठळक मुद्देऔरंगाबाद कनेक्ट टीम आणि स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था यांचा पुढाकार

औरंगाबाद : औरंगाबाद कनेक्ट टीम आणि स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद शहराचा पर्यावरण जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. खाम नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय करणे, वृक्ष संवर्धन, स्वेच्छा निधीपैकी दरवर्षी किमान १० टक्के निधी पर्यावरणविषयक कामांसाठीच खर्च करणे बंधनकारक करावे, आदी मुद्यांचा त्यात समावेश आहे.

पर्यावरणप्रेमी नागरिक आणि अभ्यासकांच्या चर्चेतून हा पर्यावरण जाहीरनामा तयार झाला आहे. औरंगाबादच्या सर्व मतदारसंघांतील उमेदवारांना तो दिला जात आहे. सोबतच उमेदवारांनी याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात करण्याची विनंती करण्यात येत आहे. निवडणुकीनंतर तिन्ही मतदारसंघांतील नवनिर्वाचित आमदारांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. 

जाहीरनाम्यात वीजपुरवठा केबल पूर्णत: भूमिगत करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाकडे प्रस्ताव आणि पाठपुरावा, वृक्षतोडीवर निर्बंध घालण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी पाठपुरावा आमदारांनी करावा, दरवर्षी लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात किमान २०० वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे, दक्षिण भागातील जैवविविधता धोक्यात येऊन आॅक्सिजन हब संपुष्टात येत आहेत. यासाठी विशेष लक्ष देणे, आदी बाबींचा  समावेश आहे.

जाहीरनाम्यातील काही मुद्दे - खाम नदीचे प्रदूषण तात्काळ रोखण्यासाठी उपाययोजना करणे. - खाम नदीतील अतिक्रमणे हटवणे. नदी काठावर वृक्ष लागवड करणे.- सुखना नदीत सोडले जाणारे सांडपाणी थांबवणे.- कचरा संकलन ते प्रक्रिया याची पूर्ण माहिती नागरिकांना जाहीर करणे.- नहर-ए-अंबरी व अन्य पुरातन नहरींच्या संवर्धनासाठी योजना आखणे. - पाणी वापर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारला आग्रह धरणे.- जलसंवर्धनासाठी निधी मिळविण्यासह विहिरी, बारवांचे पुरुज्जीवन.- सर्व कारखान्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अनिवार्य करणे.- दरवर्षी पर्यावरण वस्तुस्थिती अहवाल जाहीर करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रवृत्त करणे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमAurangabadऔरंगाबाद