शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Maharashtra Election 2019 : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या १,६०० जणांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 17:58 IST

विधानसभा निवडणुकीत गडबड-गोंधळ कराल, तर खबरदार...

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचा सज्जड दम ४५५ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई 

औरंगाबाद : विधानसभा निवडणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शहर पोलिसांनी कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल १ हजार ६०० जणांना नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक काळात गडबड कराल, तर खबरदार, थेट जेलमध्ये जाल, असा इशाराच या नोटिसांच्या माध्यमातून त्यांना दिला आहे. याशिवाय पोलिसांच्या रेकॉर्डवरील ४५५ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून बंधपत्र घेण्यात आले.

गतवर्षी झालेल्या विविध दंगलींमुळे शहराची शांतता धोक्यात आली होती. त्यातच आता विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक शांततेत आणि निर्विघ्न व्हावी, याकरिता शहर पोलिसांनी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार, गत निवडणुकांमध्ये गडबड करणारे, मतपेट्या पळविणारे, मतदान केंद्रावर दहशत निर्माण केल्याचा गुन्हा असलेले, तसेच मतदारांना प्रलोभन देणारे अथवा धमकावण्याचे गुन्हे असलेल्या लोकांची यादीच पोलिसांकडे आहे. 

शिवाय हाणामारी, लुटमार आणि सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान करणारे आणि चोरी आदी प्र्रकारचे दोन अथवा दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या आयुक्तालयाच्या हद्दीतील १ हजार ६०० जणांना पोलिसांनी सीआरपीसी कलम १४९ नुसार नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक कालावधीत तुम्ही गडबड करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे, तुमच्या कोणत्याही कृत्यामुळे शहराची शांतता धोक्यात आली, तर खबरदार, तुमच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, तसेच पुरावा म्हणून ही नोटीस ग्राह्य धरण्यात येईल, असा इशारा या नोटीसमधून देण्यात आला. पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ केला आहे. 

४५५ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांच्या रेकॉर्डवरील ४५५ सराईत गुन्हेगारांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यापैकी ९४ जणांविरोधात सीआरपीसी ११० ची, तर सीआरपीसी १९७ ची ३५० लोकांविरोधात आणि ११ संशयितांवर सीआरपीसी १०९ कलमानुसार कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली. शिवाय तडीपारी आणि एमपीडीएसारखी कडक कारवाईही पोलिसांकडून केली जात आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तडीपारीच्या नोटिसा बजावल्याने ते भूमिगत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

बंधपत्र न देणाऱ्या गुन्हेगाराला पाठविले कारागृहातविष्णूनगर येथील रहिवासी विजय सुभाष बिरारे याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर त्याला एक लाख रुपयांचे हमीपत्र देण्याचा आदेश सहायक पोलीस आयुक्तांच्या न्यायालयाने दिला होता. मात्र, हमीपत्र न देऊ शकल्याने बिरारेला हर्सूल कारागृहात पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबाद