शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : खासदार जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 21:00 IST

कदीर मौलाना आणि खा. जलील हे परस्परांवर धावून गेले.

औरंगाबाद: मतदान संपण्यास अवघा अर्धा तास शिल्लक राहिला असताना एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी झालेल्या ओढाताणीमध्ये  खासदार इम्तियाज जलील यांच्या अंगावरील कपडे फाटल्याची घटना सोमवारी सायंकाळी कटकटगेट परिसरात घडली. यावेळी प्रसंगावधान राखून पोलिसांनी लाठी हल्ला करून जमाव पांगविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.

मध्य विधानसभा मतदार संघातील एमआयएम उमेदवार नासेर सिद्दीकी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या कार्यकर्त्यामध्ये सोमवारी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर ठिकठिकाणी शाब्दिक चकमक होत होती. कटकटगेट येथील इकरा हायस्कुल या मतदान केंद्राबाहेर कदीर मौलाना यांचे समर्थक तथा एमआयएमचे बंडखोर नगरसेवक अज्जू पहेलवान आणि नासेर सिद्दीकी यांचे समर्थक नगरसेवक सलीम सहारा यांच्यात वाद झाला. यावेळी दोन पक्षाचे लोक आमनेसामने आल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही पक्षाच्या समर्थकांना वेगळे केले.

 

यानंतर अज्जू पहेलवान आणि उमेदवार कदीर मौलाना आणि कार्यकर्ते त्यांच्या मंडपखाली खुर्चीवर बसलेले होते. त्याचवेळी खासदार इम्तियाज जलील, नगरसेवक सलीम सहारा, नगरसेवक फेरोज खान, बाबा बिल्डर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यासह तेथे दाखल झाले. कदीर मौलाना यांच्यासोबत वाद झाल्याचे त्यांना समजल्यानंतर खा. जलील हे पदाधिक ारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडपकडे गेले. कदीर मौलाना आणि खा. जलील हे परस्परांवर धावून गेले. यावेळी वातावरण चिघळल्याचे पाहुन पोलिसांनी जोरदार लाठीहल्ला करून जमावाला पांगविले. यावेळी झालेल्या ओढाताणीमध्ये खा. जलील यांच्या अंगावरील शर्ट फाटला. या घटनेनंतर कटकटगेट परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, उपायुक्त डॉ.राहुल खाडे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे आणि दंगाकाबू पथकासह पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

केवळ कार्यकर्त्यांत किरकोळ हाणामारी

कटकटगेट येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण झाल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. केवळ कार्यकर्त्यांत किरकोळ हाणामारी झाली. पोलिसांनी लाठीहल्ला करून जमावाला पांगविल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून शहरात शांतता आहे. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये.  - चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यImtiaz Jalilइम्तियाज जलीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन