शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

चहा आणि पकोडेवाल्यांची फक्त चर्चा; प्रत्यक्षात त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 18:13 IST

पथविक्रेत्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

ठळक मुद्देनिवडणुकीत नागरी प्रश्नांना बगलसरकारची दुटप्पी भूमिका आहे

औरंगाबाद : देशात सध्या चहावाला, पकोडेवाल्यांची चर्चा पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री करीत आहेत. त्यांच्या सन्मानाविषयी बोलले जाते; परंतु दुसरीकडे फुटपाथवरील छोट्या व्यावसायिकांना हुसकावण्यात येत आहे. त्यांना बेरोजगार करण्यात येत आहे. सरकारची ही दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका नॅशनल हॉकर्स फेडरेशनचे सदस्य जम्मू आनंद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

देशात सुमारे ३ कोटी, तर महाराष्ट्रात ५ लाख पथविक्रे ते आहेत. दररोज या वर्गांची साधारण ८ हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. त्यातून हजारो पथविक्रे ते स्वत:ची उपजीविका भागवत आहेत; परंतु त्यांना बेरोजगार करण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप आनंद यांनी केला. निवडणुका जनतेच्या प्रश्नांवर होताना दिसत नाहीत. शिवीगाळ, नक्कल अशा अर्थहीन मुद्यांवर निवडणूक होत आहे. आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे म्हटले जाते; परंतु त्याचे मानक कोणालाही माहिती नाही. विधानसभेच्या निवडणुकीत नॅशनल हॉकर्स फेडरेशन औरंगाबाद मध्यचे भाकप व डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. अभय टाकसाळ यांच्या पाठीशी असल्याचे जम्मू आनंद म्हणाले. याप्रसंगी अभय टाकसाळ, मनोहर टाकसाळ, डॉ. राम बाहेती, मधुकर खिल्लारे, किसनराज पंडित उपस्थित होते.

पथविक्रेता कायदा का लागू नाही?फेरीवाल्यांसाठी वर्ष २०१४  मध्ये पथविके्रता उपजीविका संरक्षण व पथ विक्रेय विनिमय कायदा २०१४ तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने त्यासाठी २०१६ मध्ये नियम तयार केले आहेत. प्रत्यक्षात ३ वर्षे उलटूनही हा कायदा लागू  नाही. औरंगाबादेत हा कायदा लागू करण्यापासून कोणी रोखले, हे समोर आले पाहिजे. हा कायदा लागू केला जात नसेल तर पथविक्रेता, फेरीवाल्यांवर कारवाईचाही अधिकार नसल्याचे जम्मू आनंद म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादGovernmentसरकार