शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

काँग्रेसने निवडणूकीपूर्वीच मैदान सोडले : शहनवाज हुसैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 22:34 IST

हरियाणा, महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये भाजपचा बोलबाला असल्याचे सांगितले.

औरंगाबाद : काँग्रेस पक्षाचा लोकसभेत झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या पूर्वीच पराभव मान्य करत मैदान सोडल्याची टिका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसैन यांनी केली.

मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या शहनवाज हुसैन यांनी 'लोकमत' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी हरियाणा, महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये भाजपचा बोलबाला असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी लढाई करण्याच्या स्थितीत होते. मात्र आता काँग्रेस लढाईतच राहिली नाही.पाच वषार्पूर्वीपर्यंत काँग्रेस राज्यात सत्तेत होती. तीन मुख्यमंत्री कार्यरत आहेत. तरी लढण्यास कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे काँग्रेसने लढाईपूर्वीच मैदान सोडले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाजप व शिवसेनेची मागील विधानसभा निवडणूकीत युती नव्हती. तरीही भाजपच्या मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यावेळी युती असल्यामुळे परिस्थिती अधिक भक्कम बनली आहे. एका जागेसाठी दहा-दहा उमेदवार स्पर्धेत होते. उमेदवारी मिळाली नसल्यामुळे अनेकांना नाराज व्हावे लागले. काही मतदारसंघ युतीमध्ये शिवसेना सोडण्यात आल्यामुळे नाराजीची स्थिती होती. मात्र इच्छुकांची नाराजी दुर करण्याचे काम केले आहे. त्यामुळे पुन्हा सत्ता स्थापन करण्यास कोणत्याही अडचणी उद्भवनार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. औरंगाबादसह मराठवाड्याला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम भाजपाने केले आहे. मराठवाड्यातील अनेक भाग काँग्रेसमुक्त बनले आहेत. औरंगाबाद शहरही काँग्रेसमुक्त असल्याचे शहनवाज हुसैन यांनी सांगितले.पंतप्रधान महात्मा गांधींच्या विचारांवर चालतात

काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी यांचे नाव घेतले. मात्र त्यांचे विचार सोडून दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांच्या विचारानुसार चालत आहेत. गांधीजींनी सांगितलेली प्रत्येक विकासाचा विचार त्यांनी आत्मसात करुन त्यांची अंमलबजावणी सुरू केल्याचेही शहनवाज हुसैन यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019