शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

Maharashtra Election 2019 : उमेदवारी अर्ज बाद होण्यामागे बागडे यांचे षड्यंत्र; रमेश गायकवाड यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 14:16 IST

निवडणूकीला न्यायालयात आव्हान देणार

ठळक मुद्देऔरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आरपीआय (ड्रेमोक्रॅटिक)चे उमेदवार उमेदवारी दिल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाचे आभार

औरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मानसपुत्र असलेल्या राजू शिंदे यांच्यासाठी माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हाताशी धरून षडयंत्र रचल्याचा आरोप रमेश गायकवाड यांनी केला आहे. औरंगाबाद पश्चिम मधून उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर त्या विरोधातील याचिका मागे घेतल्यानंतर बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आरपीआय (ड्रेमोक्रॅटिक)चे राज्याध्यक्ष तथा जि.प.  सदस्य रमेश गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या शपथपत्रात गुन्हा नोंदच्या कॉलममध्ये दुरुस्ती राहिली होती. ही चूक निवडणूक आयोगाने निदर्शनास आणून दिल्यानंतरही ती दुरुस्त करण्यात आली नाही. त्यामुळे अर्ज बाद झाला. यामुळे रमेश गायकवाड यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतल्यानंतरही जाणीवपूर्वक चूक ठेवली का?  चूक लक्षात आणून दिल्यानंतरही दुरुस्त का केली नाही? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. गायकवाड यांनी याअगोदर अनेक निवडणुका लढविल्या आहेत. ते एका जबाबदार पक्षाचे पदाधिकारी असताना अशी चूक कशी होऊ शकते, असा सवालही उपस्थित होत आहे. यामुळे गायकवाड यांनी काँग्रेसशी दगाबाजी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उमेदवारी दिल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाचे आभार देखील मानले. तसेच अर्ज बाद झाल्याच्या विरोधातील याचिका खंडपीठातून फेटाळण्याची शक्यता होती म्हणून मागे घेतली असे स्पष्टीकरण दिले. यासोबतच आपण आता रीतसर निवडणूकीला न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही  त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले

निवडणूक आयोगाचे म्हणणे असे औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पाराणी भोसले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रमेश गायकवाड यांची किरकोळ चूक असताना त्यांच्या लक्षात आणून दिली का? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी निवडणूक आयोगाकडून त्यांना दोन लेखी पत्र देण्यात आले आहेत. पत्रांच्या माध्यमातून उमेदवारी अर्जात चूक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर त्यांना चूक दुरुस्त करण्यास संधीही देण्यात आली. मात्र ती चूक दुरुस्त करण्यात आली नसल्यामुळे नियमानुसार अर्ज बाद करण्यात आल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमcongressकाँग्रेसHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे