शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद शहर काँग्रेस झाली पुरती खिळखिळी; शहराध्यक्षांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 17:42 IST

शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांच्या नियुक्तीपासूनच तक्रारी होत्या. आता तर त्या खूपच वाढल्या आहेत.

ठळक मुद्देशहराध्यक्ष नामदेव पवार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हनिवडणुकीचा काळ सुरू असूनही कार्यकर्त्यांनी पक्षाचा त्याग केला आहे.शहराध्यक्षांच्या वागण्या-बोलण्यावरून टीकेचे सूर उमटवत असतात.

औरंगाबाद : शहर- जिल्हा काँग्रेस या नावाने वर्षानुवर्षे चालत आलेल्या औरंगाबादचीकाँग्रेस आता पुरती खिळखिळी बनली आहे. वाद-विवाद, गट-तट व मत-मतांतरांमुळे गाजत राहणे हे वैशिष्ट्य राहिलेली ही काँग्रेस विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत बेदखल झाली आहे. एक प्रकारची गळतीच लागली असून, कार्यकर्ते या पक्षात काम करायला तयार नाहीत. या दारुण अवस्थेला जबाबदार कोण? हा खरा प्रश्न आहे. विद्यमान शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांच्या नियुक्तीपासूनच तक्रारी होत्या. आता तर त्या खूपच वाढल्या आहेत.

एकतर ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले आहेत. या मुद्यावरून तेव्हाही त्यांच्यासंबंधाने तक्रारी होत्या. ‘पक्का शिवसैनिक है’ असे कार्यकर्ते पाठीमागे बोलत असत. शहरातील तीनपैकी पूर्व व पश्चिम मतदारसंघात काँग्रेसला सक्षम उमेदवार देऊन लढत देता आली असती. अनेक जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी तिकीट मागितले होते. मागितले नाही, असेही नाही; परंतु त्याकडे दुर्लक्ष करून वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय तर केलाच; पण नंतर या दोन्ही मतदारसंघांत उमेदवारीवरून जो घोळ झाला, तशी वेळ यापूर्वी कधीही आली नव्हती. याला जबाबदार कोण? यात शहराध्यक्षांची भूमिका काहीच नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्वमधून कुणाला पाठिंबा द्यावा यावरूनही शहराध्यक्षांच्या भूमिकेवरून चर्चा होत होती. 

शहर काँग्रेसची ही तºहा, तर जिल्हा काँग्रेसचा परफॉर्मन्स  तर न पाहवणारा. जिल्ह्यात अनेक जागा आघाडीत राष्ट्रवादी लढत आहे. अब्दुल सत्तार हे लोकसभेच्या वेळीच काँग्रेस सोडून गेले. संतोष कोल्हे हे काँग्रेसचे; पण ते आता कन्नडहून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लढत आहेत. डॉ. कल्याण काळे हे मात्र स्वत:च्या ताकदीवर फुलंब्रीत चांगली लढत देत आहेत.

गळती सुरूचनिवडणुकीचा काळ सुरू असूनही शहरातील कितीतरी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आहे. त्यांना  रोखण्याचे प्रयत्न झाल्यासारखे दिसत नाहीत. शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले मीर हिदायत अली यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. रमजानी व नगरसेविका राहिलेल्या त्यांच्या पत्नीनेही एमआयएममध्ये प्रवेश केला. फार पूर्वीच अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष बाबा तायडे हे भाजपमध्ये दाखल झाले. अलीकडेच मनोज पाटील व राजकुमार जाधव हेही भाजपवासी झाले. ही गळती थांबविण्यासाठी काय प्रयत्न केले गेले, हे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले, याची जबाबदारी कुणावर? अशाने पक्ष कसा चालणार? जे कार्यकर्ते म्हणून कार्य करीत आहेत. तेही शहराध्यक्षांच्या वागण्या-बोलण्यावरून टीकेचे सूर उमटवत असतात.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेस