शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद शहर काँग्रेस झाली पुरती खिळखिळी; शहराध्यक्षांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 17:42 IST

शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांच्या नियुक्तीपासूनच तक्रारी होत्या. आता तर त्या खूपच वाढल्या आहेत.

ठळक मुद्देशहराध्यक्ष नामदेव पवार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हनिवडणुकीचा काळ सुरू असूनही कार्यकर्त्यांनी पक्षाचा त्याग केला आहे.शहराध्यक्षांच्या वागण्या-बोलण्यावरून टीकेचे सूर उमटवत असतात.

औरंगाबाद : शहर- जिल्हा काँग्रेस या नावाने वर्षानुवर्षे चालत आलेल्या औरंगाबादचीकाँग्रेस आता पुरती खिळखिळी बनली आहे. वाद-विवाद, गट-तट व मत-मतांतरांमुळे गाजत राहणे हे वैशिष्ट्य राहिलेली ही काँग्रेस विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत बेदखल झाली आहे. एक प्रकारची गळतीच लागली असून, कार्यकर्ते या पक्षात काम करायला तयार नाहीत. या दारुण अवस्थेला जबाबदार कोण? हा खरा प्रश्न आहे. विद्यमान शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांच्या नियुक्तीपासूनच तक्रारी होत्या. आता तर त्या खूपच वाढल्या आहेत.

एकतर ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले आहेत. या मुद्यावरून तेव्हाही त्यांच्यासंबंधाने तक्रारी होत्या. ‘पक्का शिवसैनिक है’ असे कार्यकर्ते पाठीमागे बोलत असत. शहरातील तीनपैकी पूर्व व पश्चिम मतदारसंघात काँग्रेसला सक्षम उमेदवार देऊन लढत देता आली असती. अनेक जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी तिकीट मागितले होते. मागितले नाही, असेही नाही; परंतु त्याकडे दुर्लक्ष करून वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय तर केलाच; पण नंतर या दोन्ही मतदारसंघांत उमेदवारीवरून जो घोळ झाला, तशी वेळ यापूर्वी कधीही आली नव्हती. याला जबाबदार कोण? यात शहराध्यक्षांची भूमिका काहीच नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्वमधून कुणाला पाठिंबा द्यावा यावरूनही शहराध्यक्षांच्या भूमिकेवरून चर्चा होत होती. 

शहर काँग्रेसची ही तºहा, तर जिल्हा काँग्रेसचा परफॉर्मन्स  तर न पाहवणारा. जिल्ह्यात अनेक जागा आघाडीत राष्ट्रवादी लढत आहे. अब्दुल सत्तार हे लोकसभेच्या वेळीच काँग्रेस सोडून गेले. संतोष कोल्हे हे काँग्रेसचे; पण ते आता कन्नडहून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लढत आहेत. डॉ. कल्याण काळे हे मात्र स्वत:च्या ताकदीवर फुलंब्रीत चांगली लढत देत आहेत.

गळती सुरूचनिवडणुकीचा काळ सुरू असूनही शहरातील कितीतरी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आहे. त्यांना  रोखण्याचे प्रयत्न झाल्यासारखे दिसत नाहीत. शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले मीर हिदायत अली यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. रमजानी व नगरसेविका राहिलेल्या त्यांच्या पत्नीनेही एमआयएममध्ये प्रवेश केला. फार पूर्वीच अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष बाबा तायडे हे भाजपमध्ये दाखल झाले. अलीकडेच मनोज पाटील व राजकुमार जाधव हेही भाजपवासी झाले. ही गळती थांबविण्यासाठी काय प्रयत्न केले गेले, हे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले, याची जबाबदारी कुणावर? अशाने पक्ष कसा चालणार? जे कार्यकर्ते म्हणून कार्य करीत आहेत. तेही शहराध्यक्षांच्या वागण्या-बोलण्यावरून टीकेचे सूर उमटवत असतात.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेस