शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद शहर काँग्रेस झाली पुरती खिळखिळी; शहराध्यक्षांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 17:42 IST

शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांच्या नियुक्तीपासूनच तक्रारी होत्या. आता तर त्या खूपच वाढल्या आहेत.

ठळक मुद्देशहराध्यक्ष नामदेव पवार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हनिवडणुकीचा काळ सुरू असूनही कार्यकर्त्यांनी पक्षाचा त्याग केला आहे.शहराध्यक्षांच्या वागण्या-बोलण्यावरून टीकेचे सूर उमटवत असतात.

औरंगाबाद : शहर- जिल्हा काँग्रेस या नावाने वर्षानुवर्षे चालत आलेल्या औरंगाबादचीकाँग्रेस आता पुरती खिळखिळी बनली आहे. वाद-विवाद, गट-तट व मत-मतांतरांमुळे गाजत राहणे हे वैशिष्ट्य राहिलेली ही काँग्रेस विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत बेदखल झाली आहे. एक प्रकारची गळतीच लागली असून, कार्यकर्ते या पक्षात काम करायला तयार नाहीत. या दारुण अवस्थेला जबाबदार कोण? हा खरा प्रश्न आहे. विद्यमान शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांच्या नियुक्तीपासूनच तक्रारी होत्या. आता तर त्या खूपच वाढल्या आहेत.

एकतर ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले आहेत. या मुद्यावरून तेव्हाही त्यांच्यासंबंधाने तक्रारी होत्या. ‘पक्का शिवसैनिक है’ असे कार्यकर्ते पाठीमागे बोलत असत. शहरातील तीनपैकी पूर्व व पश्चिम मतदारसंघात काँग्रेसला सक्षम उमेदवार देऊन लढत देता आली असती. अनेक जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी तिकीट मागितले होते. मागितले नाही, असेही नाही; परंतु त्याकडे दुर्लक्ष करून वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय तर केलाच; पण नंतर या दोन्ही मतदारसंघांत उमेदवारीवरून जो घोळ झाला, तशी वेळ यापूर्वी कधीही आली नव्हती. याला जबाबदार कोण? यात शहराध्यक्षांची भूमिका काहीच नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्वमधून कुणाला पाठिंबा द्यावा यावरूनही शहराध्यक्षांच्या भूमिकेवरून चर्चा होत होती. 

शहर काँग्रेसची ही तºहा, तर जिल्हा काँग्रेसचा परफॉर्मन्स  तर न पाहवणारा. जिल्ह्यात अनेक जागा आघाडीत राष्ट्रवादी लढत आहे. अब्दुल सत्तार हे लोकसभेच्या वेळीच काँग्रेस सोडून गेले. संतोष कोल्हे हे काँग्रेसचे; पण ते आता कन्नडहून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लढत आहेत. डॉ. कल्याण काळे हे मात्र स्वत:च्या ताकदीवर फुलंब्रीत चांगली लढत देत आहेत.

गळती सुरूचनिवडणुकीचा काळ सुरू असूनही शहरातील कितीतरी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आहे. त्यांना  रोखण्याचे प्रयत्न झाल्यासारखे दिसत नाहीत. शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले मीर हिदायत अली यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. रमजानी व नगरसेविका राहिलेल्या त्यांच्या पत्नीनेही एमआयएममध्ये प्रवेश केला. फार पूर्वीच अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष बाबा तायडे हे भाजपमध्ये दाखल झाले. अलीकडेच मनोज पाटील व राजकुमार जाधव हेही भाजपवासी झाले. ही गळती थांबविण्यासाठी काय प्रयत्न केले गेले, हे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले, याची जबाबदारी कुणावर? अशाने पक्ष कसा चालणार? जे कार्यकर्ते म्हणून कार्य करीत आहेत. तेही शहराध्यक्षांच्या वागण्या-बोलण्यावरून टीकेचे सूर उमटवत असतात.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेस