शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

Maharashtra Bandh : वाळूज तोडफोडप्रकरणी १७ हल्लेखोर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:20 IST

मराठा आरक्षणासंदर्भात पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान वाळूज औद्योगिकनगरीत तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांची पोलिसांनी शुक्रवारपासून धरपकड सुरू केली आहे.

ठळक मुद्देतीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, १७ हल्लेखोरांना अटक केली आहे.

औरंगाबाद : मराठा आरक्षणासंदर्भात पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान वाळूज औद्योगिकनगरीत तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांची पोलिसांनी शुक्रवारपासून धरपकड सुरू केली आहे. तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, १७ हल्लेखोरांना अटक केली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या हल्लेखोरांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी येथे सांगितले. 

गुरुवारी बंददरम्यान वाळूज औद्योगिकनगरीत हिंसक जमावाने परिसरातील जवळपास १०० कारखान्यांवर प्रचंड प्रमाणात दगडफेक करून तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी उद्योजक संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. बंददरम्यान कारखान्यांवर दगडफेक करून मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दोषी हल्लेखोरांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कारखान्यांची तोडफोड व दगडफेक होत असताना पोलिसांनी बळाचा वापर केला असता तर जमाव पुन्हा हिंसक होऊन अप्रिय घटना घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी संयमाची भूमिका घेतली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तोडफोड करताना कैद झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  

हल्लेखोर पोलीस कोठडीतनुकसानीसंदर्भात उद्योजकांकडून रात्री उशिरापर्यंत ३५ तक्रारी देण्यात आल्या असून, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी धरपकड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत निवृत्ती पवार, रवींद्र शेटे, बाळू पेंडगे, मदन गवळी, प्रभाकर साळुंके, सोपान बुरजे, सोमनाथ सुराशे, निकेश बाबर, सुदर्शन काळे, आनंद हुडेकर, मंगेश उदार, बळीराम गायकवाड, सूरज पा. जाधव, गजानन चोरमारे, रामेश्वर वानखेडे, संतोष डुकरे, अक्षय गायकवाड या १७ हल्लेखोरांना पोलिसांनी पकडले आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Reservationमराठा आरक्षणArrestअटकWaluj MIDCवाळूज एमआयडीसी