शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शिवसेनेतील इच्छुक पोहोचले मातोश्रीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:10 IST

युतीसाठी विद्यमानांचे देव पाण्यात 

ठळक मुद्दे युती होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष

औरंगाबाद : शिवसेनेतील इच्छुकांची मातोश्रीवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी मुंबईत ठाण मांडले असून, भाजपसोबत युती होणार की नाही, याबाबत पक्षातील नेत्यांकडून माहिती घेत असल्याचे सेनेच्या गोटातून समजले आहे. युती झाली तरी काही जणांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी सुरू केली आहे. जागा वाटपाच्या वाटाघाटीत मतदारसंघ इच्छुकांच्या वाट्याला आला नाही, तर त्यांनी लढण्यासाठी कंबर कसली आहे. 

मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर युतीची घोषणा होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपमधील विद्यमान आमदारांना युती व्हावी, असे वाटते आहे, तर तशीच भूमिका शिवसेनेच्याही विद्यमान आमदारांची आहे. विद्यमान आमदारांनी युती होण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. युती झाली तरी शिवसेनेतील काही इच्छुक ‘मातोश्री’च्या कानावर घालून अपक्ष मैदानात उतरण्यासाठी परवानगी कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावत असल्याचे वृत्त आहे.

वैजापूर, पश्चिम आणि मध्य मतदारसंघ भाजपने शिवसेनेकडून मागितल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. त्या मोबदल्यात सिल्लोड, गंगापूर व अन्य एक मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेला मिळावा. यासाठी पूर्णत: राजकीय वाटाघाटी सुरू आहेत. या सगळ्या तर्कवितर्काच्या माहितीमुळे जिल्ह्यातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. 

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेला ३, भाजपला ३, एमआयएमला १ आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रसेला प्रत्येकी १ जागेवर यश मिळाले होते. २०१४ साली युती तुटली होती. ९ पैकी ३ जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल व इतर सहा ते सात जणांत उमेदवारीसाठी स्पर्धा आहे, तर भाजपकडूनही कि शनचंद तनवाणी व अन्य दोघांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. 

जिल्ह्यात सध्या अशी सुरू आहे चर्चा- शहरातील पूर्व मतदारसंघात राज्यमंत्री अतुल सावे भाजपचे उमेदवार असणार आहेत, हे स्पष्ट आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून राजू वैद्य अपक्ष लढण्याच्या तयारत आहेत.

- पश्चिममध्ये आ. संजय शिरसाट यांना शिवसेनेने उमेदवारी दिली, तर राजू शिंदे किंवा बाळासाहेब गायकवाड यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.दोघांनीही आपली संवाद यात्रा सुरू केली आहे. - मध्यमध्ये शिवसेनेने जैस्वाल यांना उमेदवारी दिली, तर तनवाणी समर्थकांशी चर्चा करून पुढे जाणार आहेत.

- सिल्लोडची जागा माजी आ. सत्तार यांना सुटल्यास भाजपचे सुरेश बनकर लढतील, असे चित्र आहे. - गंगापूरची जागा भाजपकडे गेली, तर आ. प्रशांत बंब यांच्या विरोधात शिवसेना पुरस्कृत अपक्ष मैदानात असेल. - वैजापूर,कन्नड, पैठण मतदारसंघातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019