शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

शिवसेनेतील इच्छुक पोहोचले मातोश्रीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:10 IST

युतीसाठी विद्यमानांचे देव पाण्यात 

ठळक मुद्दे युती होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष

औरंगाबाद : शिवसेनेतील इच्छुकांची मातोश्रीवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी मुंबईत ठाण मांडले असून, भाजपसोबत युती होणार की नाही, याबाबत पक्षातील नेत्यांकडून माहिती घेत असल्याचे सेनेच्या गोटातून समजले आहे. युती झाली तरी काही जणांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी सुरू केली आहे. जागा वाटपाच्या वाटाघाटीत मतदारसंघ इच्छुकांच्या वाट्याला आला नाही, तर त्यांनी लढण्यासाठी कंबर कसली आहे. 

मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर युतीची घोषणा होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपमधील विद्यमान आमदारांना युती व्हावी, असे वाटते आहे, तर तशीच भूमिका शिवसेनेच्याही विद्यमान आमदारांची आहे. विद्यमान आमदारांनी युती होण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. युती झाली तरी शिवसेनेतील काही इच्छुक ‘मातोश्री’च्या कानावर घालून अपक्ष मैदानात उतरण्यासाठी परवानगी कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावत असल्याचे वृत्त आहे.

वैजापूर, पश्चिम आणि मध्य मतदारसंघ भाजपने शिवसेनेकडून मागितल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. त्या मोबदल्यात सिल्लोड, गंगापूर व अन्य एक मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेला मिळावा. यासाठी पूर्णत: राजकीय वाटाघाटी सुरू आहेत. या सगळ्या तर्कवितर्काच्या माहितीमुळे जिल्ह्यातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. 

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेला ३, भाजपला ३, एमआयएमला १ आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रसेला प्रत्येकी १ जागेवर यश मिळाले होते. २०१४ साली युती तुटली होती. ९ पैकी ३ जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल व इतर सहा ते सात जणांत उमेदवारीसाठी स्पर्धा आहे, तर भाजपकडूनही कि शनचंद तनवाणी व अन्य दोघांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. 

जिल्ह्यात सध्या अशी सुरू आहे चर्चा- शहरातील पूर्व मतदारसंघात राज्यमंत्री अतुल सावे भाजपचे उमेदवार असणार आहेत, हे स्पष्ट आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून राजू वैद्य अपक्ष लढण्याच्या तयारत आहेत.

- पश्चिममध्ये आ. संजय शिरसाट यांना शिवसेनेने उमेदवारी दिली, तर राजू शिंदे किंवा बाळासाहेब गायकवाड यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.दोघांनीही आपली संवाद यात्रा सुरू केली आहे. - मध्यमध्ये शिवसेनेने जैस्वाल यांना उमेदवारी दिली, तर तनवाणी समर्थकांशी चर्चा करून पुढे जाणार आहेत.

- सिल्लोडची जागा माजी आ. सत्तार यांना सुटल्यास भाजपचे सुरेश बनकर लढतील, असे चित्र आहे. - गंगापूरची जागा भाजपकडे गेली, तर आ. प्रशांत बंब यांच्या विरोधात शिवसेना पुरस्कृत अपक्ष मैदानात असेल. - वैजापूर,कन्नड, पैठण मतदारसंघातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019