शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्याच दिवशी जिल्ह्यात ३०१ उमेदवारी अर्ज घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:28 IST

पितृपक्षामुळे शुक्रवारी जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेण्यास सुरुवात केली असून, अधिसूचना जारी झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३०१ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. पितृपक्षामुळे शुक्रवारी जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. फक्त दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. 

२८, २९ सप्टेंबरला सुटी असणार आहे. २ आॅक्टोबरलादेखील सुटी आहे. त्यामुळे ४ आॅक्टोबरपर्यंत ४ दिवसच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत. त्यात ३० सप्टेंबर, १, ३ व ४ आॅक्टोबर या दिवसांत उमेदवारी अर्ज भरता येणे शक्य आहे.  पूर्व आणि कन्नडमध्ये प्रत्येक एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. निवडणूक उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघनिहाय नियुक्त निवडणूक अधिकाऱ्यांकडून उमेदवारी अर्ज नेल्याच्या माहितीचा आढावा घेतला. त्यानुसार पूर्ण जिल्ह्यात शुक्रवारी ३०१ उमेदवारी अर्ज नेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पश्चिममध्ये सर्वाधिक ६५ अर्ज नेलेपश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक ६५ उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्याखालोखाल पूर्व मतदारसंघातून ५२, तर मध्य व गंगापूर मतदारसंघातून अनुक्रमे ३६ व ३५ उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. उमेदवारी अर्ज नेण्याच्या पहिल्याच दिवसाचा आकडा पाहता नऊ मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता दिसत आहे. मध्य मतदारसंघातून कीर्ती शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज नेला. पहिल्या दिवशी कुठल्याही राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. 

मतदारसंघ     उमेदवारी अर्ज संख्याफुलंब्री    १८सिल्लोड    १३कन्नड    २६वैजापूर    ३०गंगापूर    ३६पैठण    २६

औरंगाबाद

पूर्व    ५२पश्चिम    ६५मध्य    ३५एकूण    ३०१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक