शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

औरंगाबाद जिल्ह्यातील लढती ठरतील लक्षवेधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 16:55 IST

मूळ प्रश्न बाजूला ठेवून भावनिक प्रश्नांचे भांडवल केले जाणार यात कुठलीही शंका नाही.

ठळक मुद्देसिल्लोड विधानसभा मतदारसंघाकडे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

- स.सो. खंडाळकर 

औरंगाबाद : उमेदवारी अर्ज भरायला तीन दिवसांचा अवधी आहे. एकाही महत्त्वाच्या उमेदवाराने अद्याप आपला अर्ज भरला नाही. उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर, छाननी झाल्यानंतर व अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर, पुरेसे चित्र स्पष्ट होईलच; परंतु औरंगाबाद जिल्ह्यातील लढती लक्षवेधी ठरणार, गाजणार, जातीय समीकरणे मांडली जाणार, पैशांचा पुरेपूर वापर होणार, मूळ प्रश्न बाजूला ठेवून भावनिक प्रश्नांचे भांडवल केले जाणार यात कुठलीही शंका नाही.

सिल्लोड विधानसभा मतदारसंघाकडे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. अब्दुल सत्तार यांच्या अस्तित्वाची लढाई तेथे बघायला मिळणार! कालपरवापर्यंत काँग्रेसचा तिरंगा झेंडा हातात घेतलेले सत्तार यांना शिवसेनेचा भगवा घेताना काहीही वाटले नाही. राजकारण किती सत्ताकेंद्रित असते, हेच सत्तार यांनी सिद्ध केले आहे. अर्थात, त्यांचा पराभव करण्यासाठी सत्तारविरोधक सारेच जण एकवटणार, ताकद लावणार, सिल्लोडची भाजपची मंडळी किती बंडखोरी करणार यावर ही निवडणूक रंगतदार होणार, याबद्दल शंका नाही. हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभेची निवडणूक गाजवली. त्यांचा ट्रॅक्टर फॅक्टर अजूनही सर्वांच्याच लक्षात आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे ते जावई आहेत. शिवस्वराज्य बहुजन पार्टीचे ते उमेदवार असतील; पण त्यांच्या पाठीमागे अनेक अदृश्य शक्ती राहतील, हे सांगणे न लगे. 

औरंगाबाद मध्यमध्ये अनेक उमेदवारांच्या उड्या पडत आहेत. एमआयएमसाठी मध्य खूपच प्रतिष्ठेचा राहणार आहे. याच मतदारसंघातून मागे आमदार बनलेले प्रदीप जैस्वाल हे आपले नशीब अजमावताहेत. भाजपकडून दगाफटका न झाला तरच जैस्वाल यांच्यासाठी ही निवडणूक सोपी राहील. एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी या महत्त्वाच्या उमेदवारांशिवाय मध्यमधून छोट्या-मोठ्या पक्षांना उभे राहून न्यूजसेन्स व्हॅल्यू वाढवून घ्यायची आहे.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे राजेंद्र दर्डा यांनी प्रतिनिधित्व केलेले. आमदार निधी काय असतो, हे साऱ्या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिले. मंत्रीपदाचा विकासासाठी किती प्रभावीपणे उपयोग करून घेता येतो, हे त्यांनी खेचून आणलेल्या डीएमआयसीवरून लक्षात आल्याशिवाय राहत नाही; परंतु यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी या मतदारसंघासाठी योग्य उमेदवाराच्या जणू शोधातच आहे. भाजप-सेनेतर्फे अतुल सावे हेच लढणार... पण शेवटपर्यंत बंडखोरीचे आव्हान त्यांनाही राहीलच. एमआयएम, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुणाचा फायदा करून जातील, यावरही बरेचसे अवलंबून आहे. 

औरंगाबाद पश्चिमचे विद्यमान उमेदवार संजय शिरसाट यांनी अनेक वादविवादानंतर एबी फॉर्म मिळविण्यात यश मिळवले. तेथे भाजपची बंडखोरी होते का, ते पाहावयाचे. पैठण, गंगापूर, वैजापूर येथील लढती रंगतदार होतील. गंगापूरमधून विद्यमान आ. प्रशांत बंब यांना विजयाचा मार्ग वाटतो तेवढा सुकर नाही. वैजापूर यावेळी शिवसेना खेचून घेणार का, हा प्रश्न आहे. पैठणची जागा राखण्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांना यश मिळते का, हे सारेच पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सिल्लोडप्रमाणेच फुलंब्रीकडेही सर्वांचे लक्षसिल्लोडप्रमाणेच फुलंब्री मतदारसंघही गाजणार आहे, यावेळीही भाजपचे उमेदवार म्हणून हरिभाऊ बागडे यांनी शड्डू ठोकलेला आहे. भाजपच्या घटनेत उमेदवारीसाठी कुठलीही अट नाही, असा खुलासा करीत विधानसभेचे विद्यमान सभापती असलेल्या नानांना आगामी काळातही मोठमोठी पदे भूषवायची आहेत, ही त्यांची मनीषा लपून राहिलेली नाही.कॉंग्रेसचे डॉ. कल्याण काळे हे मागच्या वेळी फार कमी मतांनी पराभूत झालेले आहेत. हे भान ठेवूनच ते मतदारसंघात सतत सक्रिय राहिलेले आहेत. त्यामुळे नानांना वाटते तेवढी ही निवडणूक सोपी नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादvidhan sabhaविधानसभा