शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

देवगडतांड्यावर मुलभूत सुविधांसह शासकीय योजनांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 15:38 IST

मतदारसंघ : औरंगाबाद पश्चिम : निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मतदान मागणाऱ्या राजकीय टोळ्या येतील

ठळक मुद्देलोक प्रतिनिधींनी समस्या जाणून घेतल्याचे येथील कोणालाच आठवत नाही.

औरंगाबाद : डोंगर माथ्यावर नैसर्गिक संपन्नता लाभलेल्या देवगडतांडा परिसरात कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची सोय शासनाने केली नसल्याने ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. पाण्यासह सर्वच मूलभूत सुविधांसह शासनाच्या योजनांची सतत प्रतीक्षा करावी लागते. 

निवडणुकीनंतर ५ वर्षांत तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट अथवा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदींसह अन्य मंत्रिमहोदयांनी डोंगरावर येऊन नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे येथील कोणालाच आठवत नाही. पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या फेऱ्या अधूनमधून होतात. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मतदान मागणाऱ्या राजकीय टोळ्या येतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच गतवर्षी योजनेतून कचनेर डीएमआयसीला जोडणारा डांबरी रस्ता झाल्याने दळणवळणाची अडचण संपली आहे; परंतु पाण्यासाठी तांड्यावरील नागरिकांना शहरातून जार विकत आणून पाणी पिण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या टँकरची अखेरची फेरी गेल्या आठवड्यात शिवगडतांडा येथे आली. पश्चिम मतदारसंघातील शेवटच्या टोकाच्या तांड्यात शिवगडचा समावेश होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास अनेकदा कॉल करून लाईनमनला बोलवावे लागते. डोंगरमाथ्यावर अनेक मोबाईलची सेवा नॉटरिचेबल असल्याने अशा वेळी महत्त्वाचा संपर्क साधणे अशक्यच. 

युवक बेरोजगारांचे थवेयेथील प्रत्येक कुटुंबातील मुले-मुली सुशिक्षित आहे. शासनाने युवकांसाठी किमान कौशल्यावर आधारित उपक्रम राबवून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, असे अनिकेत जाधव, शुभम राठोड,चरण राठोड, आदिनाथ राठोड, अभिषेक जाधव आदींचे म्हणणे आहे.  

पाण्यावाचून हालपश्चिम मतदारसंघातील शेवटच्या टोकाचे गाव शिवगडतांडा मानले जाते. येथे नवीन उपक्रम शासनाने राबवून शासन दरबारी लोकप्रतिनिधीने लक्ष घालून पाणी प्रश्न सोडविण्याची गरज होती. - रुक्मिणीबाई राठोड

डोक्यावर आणतो पाणीम्हातारपणात डोक्यावर हंडा घेऊन दूरवरून पाणी शेंदून किंवा जुन्या टाकीपासून डोक्यावर वाहून न्यावे लागते, शहराच्या जवळ असलो तरी पाणी नाही मिळत. - बेबीबाई राठोड 

आरोग्य केंद्र नाहीदूषित पाण्यामुळे मुले व महिला आजारी पडतात त्यांच्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाचे पथक येथे तपासणीसाठी फिरकत नाही. शहरातील दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते. - जनाबाई चव्हाण

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019fundsनिधी