शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवगडतांड्यावर मुलभूत सुविधांसह शासकीय योजनांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 15:38 IST

मतदारसंघ : औरंगाबाद पश्चिम : निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मतदान मागणाऱ्या राजकीय टोळ्या येतील

ठळक मुद्देलोक प्रतिनिधींनी समस्या जाणून घेतल्याचे येथील कोणालाच आठवत नाही.

औरंगाबाद : डोंगर माथ्यावर नैसर्गिक संपन्नता लाभलेल्या देवगडतांडा परिसरात कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची सोय शासनाने केली नसल्याने ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. पाण्यासह सर्वच मूलभूत सुविधांसह शासनाच्या योजनांची सतत प्रतीक्षा करावी लागते. 

निवडणुकीनंतर ५ वर्षांत तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट अथवा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदींसह अन्य मंत्रिमहोदयांनी डोंगरावर येऊन नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे येथील कोणालाच आठवत नाही. पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या फेऱ्या अधूनमधून होतात. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मतदान मागणाऱ्या राजकीय टोळ्या येतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच गतवर्षी योजनेतून कचनेर डीएमआयसीला जोडणारा डांबरी रस्ता झाल्याने दळणवळणाची अडचण संपली आहे; परंतु पाण्यासाठी तांड्यावरील नागरिकांना शहरातून जार विकत आणून पाणी पिण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या टँकरची अखेरची फेरी गेल्या आठवड्यात शिवगडतांडा येथे आली. पश्चिम मतदारसंघातील शेवटच्या टोकाच्या तांड्यात शिवगडचा समावेश होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास अनेकदा कॉल करून लाईनमनला बोलवावे लागते. डोंगरमाथ्यावर अनेक मोबाईलची सेवा नॉटरिचेबल असल्याने अशा वेळी महत्त्वाचा संपर्क साधणे अशक्यच. 

युवक बेरोजगारांचे थवेयेथील प्रत्येक कुटुंबातील मुले-मुली सुशिक्षित आहे. शासनाने युवकांसाठी किमान कौशल्यावर आधारित उपक्रम राबवून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, असे अनिकेत जाधव, शुभम राठोड,चरण राठोड, आदिनाथ राठोड, अभिषेक जाधव आदींचे म्हणणे आहे.  

पाण्यावाचून हालपश्चिम मतदारसंघातील शेवटच्या टोकाचे गाव शिवगडतांडा मानले जाते. येथे नवीन उपक्रम शासनाने राबवून शासन दरबारी लोकप्रतिनिधीने लक्ष घालून पाणी प्रश्न सोडविण्याची गरज होती. - रुक्मिणीबाई राठोड

डोक्यावर आणतो पाणीम्हातारपणात डोक्यावर हंडा घेऊन दूरवरून पाणी शेंदून किंवा जुन्या टाकीपासून डोक्यावर वाहून न्यावे लागते, शहराच्या जवळ असलो तरी पाणी नाही मिळत. - बेबीबाई राठोड 

आरोग्य केंद्र नाहीदूषित पाण्यामुळे मुले व महिला आजारी पडतात त्यांच्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाचे पथक येथे तपासणीसाठी फिरकत नाही. शहरातील दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते. - जनाबाई चव्हाण

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019fundsनिधी