शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

देवगडतांड्यावर मुलभूत सुविधांसह शासकीय योजनांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 15:38 IST

मतदारसंघ : औरंगाबाद पश्चिम : निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मतदान मागणाऱ्या राजकीय टोळ्या येतील

ठळक मुद्देलोक प्रतिनिधींनी समस्या जाणून घेतल्याचे येथील कोणालाच आठवत नाही.

औरंगाबाद : डोंगर माथ्यावर नैसर्गिक संपन्नता लाभलेल्या देवगडतांडा परिसरात कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची सोय शासनाने केली नसल्याने ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. पाण्यासह सर्वच मूलभूत सुविधांसह शासनाच्या योजनांची सतत प्रतीक्षा करावी लागते. 

निवडणुकीनंतर ५ वर्षांत तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट अथवा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदींसह अन्य मंत्रिमहोदयांनी डोंगरावर येऊन नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे येथील कोणालाच आठवत नाही. पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या फेऱ्या अधूनमधून होतात. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मतदान मागणाऱ्या राजकीय टोळ्या येतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच गतवर्षी योजनेतून कचनेर डीएमआयसीला जोडणारा डांबरी रस्ता झाल्याने दळणवळणाची अडचण संपली आहे; परंतु पाण्यासाठी तांड्यावरील नागरिकांना शहरातून जार विकत आणून पाणी पिण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या टँकरची अखेरची फेरी गेल्या आठवड्यात शिवगडतांडा येथे आली. पश्चिम मतदारसंघातील शेवटच्या टोकाच्या तांड्यात शिवगडचा समावेश होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास अनेकदा कॉल करून लाईनमनला बोलवावे लागते. डोंगरमाथ्यावर अनेक मोबाईलची सेवा नॉटरिचेबल असल्याने अशा वेळी महत्त्वाचा संपर्क साधणे अशक्यच. 

युवक बेरोजगारांचे थवेयेथील प्रत्येक कुटुंबातील मुले-मुली सुशिक्षित आहे. शासनाने युवकांसाठी किमान कौशल्यावर आधारित उपक्रम राबवून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, असे अनिकेत जाधव, शुभम राठोड,चरण राठोड, आदिनाथ राठोड, अभिषेक जाधव आदींचे म्हणणे आहे.  

पाण्यावाचून हालपश्चिम मतदारसंघातील शेवटच्या टोकाचे गाव शिवगडतांडा मानले जाते. येथे नवीन उपक्रम शासनाने राबवून शासन दरबारी लोकप्रतिनिधीने लक्ष घालून पाणी प्रश्न सोडविण्याची गरज होती. - रुक्मिणीबाई राठोड

डोक्यावर आणतो पाणीम्हातारपणात डोक्यावर हंडा घेऊन दूरवरून पाणी शेंदून किंवा जुन्या टाकीपासून डोक्यावर वाहून न्यावे लागते, शहराच्या जवळ असलो तरी पाणी नाही मिळत. - बेबीबाई राठोड 

आरोग्य केंद्र नाहीदूषित पाण्यामुळे मुले व महिला आजारी पडतात त्यांच्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाचे पथक येथे तपासणीसाठी फिरकत नाही. शहरातील दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते. - जनाबाई चव्हाण

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019fundsनिधी