शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्यासमोर भाजपाच्या राजू शिंदे यांचे आव्हान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 14:25 IST

औरंगाबाद पश्चिममध्ये निवडणूक होणार नागरी प्रश्नांवरच

ठळक मुद्देकाँग्रेसच्या उमेदवारीबाबत चित्र अस्पष्टच शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपाची तयारी

औरंगाबाद : भाजप आणि शिवसेना युतीबाबत घोषणा होत नसल्याने इच्छुक उमेदवार अद्यापही चाचपडत आहेत. मात्र, शहरातील औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांकडून लढण्याची तयारी सुरू आहे. 

प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात  भाजपकडून इच्छुक असलेले राजू शिंदे यांनी आपला दावा आधीच ठोकला आहे. युती न झाल्यास शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध लढण्याची त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदारसंघात त्यांनी मोठे कार्यालयही थाटले आहे. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही. त्यावेळी भाजपचे मधुकर सावंत यांनी आ. शिरसाट यांना जोरदार लढत दिली. सावंत यांची तयारी नसताना त्यांना पक्षाने तिकीट दिले आणि त्यांनी ५४ हजार ३५५ इतकी मते घेतली. आ. शिरसाट यांना त्यावेळी ६१ हजार २८२ मते मिळाली. या निवडणुकीच्या काही दिवसांनंतरच राजू शिंदे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. 

मागील पाच वर्षांत महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी महापालिकेच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात समाविष्ट असलेल्या भागाचे प्रश्न मांडल्याचे दिसत आहे. वाळूज महानगर आणि बजाजनगर परिसरातही त्यांच्या अनेक चकरा होऊन नागरिकांच्या भेटी झाल्या आहेत. मतदारसंघातील प्रचार कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.  शिवसेनेचे शहराचे मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू झाले आहे. मात्र, विद्यमान आमदार शिरसाट यांची त्या मानाने तयारी दिसत नाही. गेल्या दोन अडीच वर्षांत त्यांचा जनसंपर्कही कमी झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. याच गोष्टी हेरून राजू शिंदे यांनी आपला जनसंपर्क वाढविला आहे. सातारा- देवळाईचे अनेक मुद्दे शिंदे यांनी निवडणुकीच्या दृष्टीनेच महापालिकेत उपस्थित केल्याचे आता समोर येत आहे. युती न झाल्यास शिंदे यांचे आ. शिरसाट यांच्यासमोर तगडे आव्हान असणार आहे. 

औरंगाबाद पश्चिमची निवडणूक ही यंदा मतदारसंघातील न सुटलेल्या प्रश्नांवर होणार आहे. हीच बाब हेरून राजू शिंदे यांनी या मतदारसंघात काम करायला सुरुवात केली आणि आता आ. शिरसाट यांच्यापुढे तेच प्रबळ उमेदवार असल्याचे वातावरण तयार करण्यात ते यशस्वी झाले आहेत. आ. शिरसाट यांच्याशिवाय शिवसेनेतून इतरही अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, त्यांचा विचार होण्याची शक्यता कमी आहे.

काँग्रेसमध्ये काय?आघाडीमध्ये यापूर्वी २००९ आणि २०१४ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसने लढविला आहे. २००९ मध्ये काँग्रेस उमेदवार चंद्रभान पारखे हे संजय शिरसाट यांच्या विरोधात दुसऱ्या स्थानी होते, तर २०१४ मध्ये जितेंद्र देहाडे हे काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले. त्यामुळे या मतदारसंघात वर्तमान परिस्थितीमध्ये काँग्रेसची ताकद कमी आहे. त्यामुळे ही जागा अन्य पक्षाला देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. ४मात्र, याबाबत निश्चित अशी माहिती समोर येत नाही. देहाडे यांच्यासह जयप्रकाश नारनवरे, पंकजा माने यांनी येथून उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसचे औरंगाबाद शहरातील कार्यकर्ते ही जागा इतर पक्षाला सोडण्यात येऊ नये, असा आग्रह करीत आहेत. तूर्तास या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराबाबत स्पष्ट चित्र नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद