शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना मिळाली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:26 IST

वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने कंबर कसली असून, उन्हाची पर्वा न करता कर्मचारी मान्सूनपूर्व कामाला लागले आहेत.

ठळक मुद्देफांद्यांची छाटणी रखडली : पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी कर्मचारी करतात दर शुक्रवारी कामे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने कंबर कसली असून, उन्हाची पर्वा न करता कर्मचारी मान्सूनपूर्व कामाला लागले आहेत.महावितरणने पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी दर शुक्रवारी शहरातील विविध भागांमध्ये ठराविक वेळेत वीजपुरवठा बंद ठेवून मान्सूनपूर्व कामे हाती घेतली आहेत. यंदा पावसाचे लवकरच आगमन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर देखभाल, दुरुस्तीच्या कामांनी गती घेतली आहे. पावसात अथवा वादळी वाऱ्याने झाडे किंवा झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर कोसळून त्या तुटण्याच्या घटना घडत असतात. खांब व रोहित्र पडल्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान तर होतेच, याशिवाय विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहकांनाही मनस्ताप होतो. अनेकदा भूमिगत वाहिन्यांमध्ये पाणी शिरून वीजपुरवठा खंडित होतो. पावसाळ्यातही वीज ग्राहकांना अखंडित व चोवीस तास वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणने मागील काही दिवसांपासून दर शुक्रवारी वीजपुरवठा बंद ठेवून उच्चदाब व लघुदाब वाहिन्या, रोहित्रांची देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच डिस्क इन्सुलेटर बदलणे, तारा ओढणे, तारा बदलणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, उपकेंद्र देखभाल, वाकलेले खांब सरळ करणे, गंजलेले, तुटलेले विजेचे खांब बदलणे, ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, आॅईल फिल्टरेशन, तारांजवळील झाडांच्या फांद्यांची छाटणी, फ्युज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, अनेक वेळा विद्युत उपकेंद्रांमध्ये पावसाचे पाणी साठल्यामुळे वीज यंत्रणेला धोका निर्माण होतो. अशा उपकेंद्रांमध्ये भराव टाकून त्यांची उंची वाढविणे आदी कामेही केली जात आहेत. यासंदर्भात महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळांतर्गत ११ जिल्ह्यांमध्ये सकाळच्या सत्रातच कामे सुरू करावीत व जास्तीत जास्त दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस