शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबादेत महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना मिळाली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:26 IST

वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने कंबर कसली असून, उन्हाची पर्वा न करता कर्मचारी मान्सूनपूर्व कामाला लागले आहेत.

ठळक मुद्देफांद्यांची छाटणी रखडली : पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी कर्मचारी करतात दर शुक्रवारी कामे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने कंबर कसली असून, उन्हाची पर्वा न करता कर्मचारी मान्सूनपूर्व कामाला लागले आहेत.महावितरणने पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी दर शुक्रवारी शहरातील विविध भागांमध्ये ठराविक वेळेत वीजपुरवठा बंद ठेवून मान्सूनपूर्व कामे हाती घेतली आहेत. यंदा पावसाचे लवकरच आगमन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर देखभाल, दुरुस्तीच्या कामांनी गती घेतली आहे. पावसात अथवा वादळी वाऱ्याने झाडे किंवा झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर कोसळून त्या तुटण्याच्या घटना घडत असतात. खांब व रोहित्र पडल्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान तर होतेच, याशिवाय विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहकांनाही मनस्ताप होतो. अनेकदा भूमिगत वाहिन्यांमध्ये पाणी शिरून वीजपुरवठा खंडित होतो. पावसाळ्यातही वीज ग्राहकांना अखंडित व चोवीस तास वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणने मागील काही दिवसांपासून दर शुक्रवारी वीजपुरवठा बंद ठेवून उच्चदाब व लघुदाब वाहिन्या, रोहित्रांची देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच डिस्क इन्सुलेटर बदलणे, तारा ओढणे, तारा बदलणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, उपकेंद्र देखभाल, वाकलेले खांब सरळ करणे, गंजलेले, तुटलेले विजेचे खांब बदलणे, ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, आॅईल फिल्टरेशन, तारांजवळील झाडांच्या फांद्यांची छाटणी, फ्युज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, अनेक वेळा विद्युत उपकेंद्रांमध्ये पावसाचे पाणी साठल्यामुळे वीज यंत्रणेला धोका निर्माण होतो. अशा उपकेंद्रांमध्ये भराव टाकून त्यांची उंची वाढविणे आदी कामेही केली जात आहेत. यासंदर्भात महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळांतर्गत ११ जिल्ह्यांमध्ये सकाळच्या सत्रातच कामे सुरू करावीत व जास्तीत जास्त दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस