शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

औरंगाबादेत महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना मिळाली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:26 IST

वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने कंबर कसली असून, उन्हाची पर्वा न करता कर्मचारी मान्सूनपूर्व कामाला लागले आहेत.

ठळक मुद्देफांद्यांची छाटणी रखडली : पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी कर्मचारी करतात दर शुक्रवारी कामे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने कंबर कसली असून, उन्हाची पर्वा न करता कर्मचारी मान्सूनपूर्व कामाला लागले आहेत.महावितरणने पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी दर शुक्रवारी शहरातील विविध भागांमध्ये ठराविक वेळेत वीजपुरवठा बंद ठेवून मान्सूनपूर्व कामे हाती घेतली आहेत. यंदा पावसाचे लवकरच आगमन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर देखभाल, दुरुस्तीच्या कामांनी गती घेतली आहे. पावसात अथवा वादळी वाऱ्याने झाडे किंवा झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर कोसळून त्या तुटण्याच्या घटना घडत असतात. खांब व रोहित्र पडल्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान तर होतेच, याशिवाय विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहकांनाही मनस्ताप होतो. अनेकदा भूमिगत वाहिन्यांमध्ये पाणी शिरून वीजपुरवठा खंडित होतो. पावसाळ्यातही वीज ग्राहकांना अखंडित व चोवीस तास वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणने मागील काही दिवसांपासून दर शुक्रवारी वीजपुरवठा बंद ठेवून उच्चदाब व लघुदाब वाहिन्या, रोहित्रांची देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच डिस्क इन्सुलेटर बदलणे, तारा ओढणे, तारा बदलणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, उपकेंद्र देखभाल, वाकलेले खांब सरळ करणे, गंजलेले, तुटलेले विजेचे खांब बदलणे, ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, आॅईल फिल्टरेशन, तारांजवळील झाडांच्या फांद्यांची छाटणी, फ्युज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, अनेक वेळा विद्युत उपकेंद्रांमध्ये पावसाचे पाणी साठल्यामुळे वीज यंत्रणेला धोका निर्माण होतो. अशा उपकेंद्रांमध्ये भराव टाकून त्यांची उंची वाढविणे आदी कामेही केली जात आहेत. यासंदर्भात महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळांतर्गत ११ जिल्ह्यांमध्ये सकाळच्या सत्रातच कामे सुरू करावीत व जास्तीत जास्त दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस