शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

मग्रारोहयोची कामे ठप्प

By admin | Updated: May 13, 2014 01:01 IST

जिंतूर : तालुक्यामध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची कामे मागील दोन महिन्यांपासून ठप्प झाली आहेत.

 जिंतूर : तालुक्यामध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची कामे मागील दोन महिन्यांपासून ठप्प झाली आहेत. जुन्या कामांबरोबरच नवीन कामांना मान्यता देण्यास प्रशासनाची होणारी दिरंगाई यामुळे तालुक्यातील मजूर स्थलांतरणाच्या प्रयत्नात आहे. जिंतूर तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे मागील एक ते दीड महिन्यापासून बंद आहेत. ज्या जुन्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली होती, त्यातील बहुतांश कामे सुरुच झाली नाहीत. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने प्रशासनाला कामे बंद ठेवण्यास प्रमुख कारण सापडले. मागील दीड ते दोन महिन्यांपासून रोजगार हमी योजनेच्या कामांचे मस्टर काढणे बंद झाले आहे. त्यामुळे अनेक मजुरांची मजुरी अद्यापपर्यंत मिळाली नाही. तहसील कार्यालयामार्फत या कामाांचा बोजवारा उडाला आहे. अधिकार्‍यांचा चालढकलपणा, निष्काळजीपणा व काम करण्याची कासवगती यामुळे तालुक्यातील मजुरांचे स्थलांतरण हा गंभीर प्रश्न समोर उभा राहिला आहे. जुन्या कामांचे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे देयक प्रलंबित आहेत. नवीन कामांना मंजुरी मिळावी, यासाठी प्रशासनाकडे २०० ते २५० प्रस्ताव धूळखात आहेत. शेतरस्ते, सीएनबी, गाव तलाव, पाझर तलाव, रोड रस्ते, पाणंद रस्ते, शिवरस्ते आदी कामे ठप्प झाली आहेत. प्रशासन मात्र याकडे गांभीर्याने पाहत नाही. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून नवीन कामांना मंजुरी नाही. जुने कामे सुरु आहेत. त्यांची मस्टर निघत नाहीत. या सर्व प्रकारामुळे या भागातील मजूर वर्ग कामाच्या शोधार्थ मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद , सुरत या शहरांकडे भटकंती करत आहेत. विशेष म्हणजे नवीन कामांच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेण्यात यावी, ही तहसीलदारांची पळवाट तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामाला आडकाठी ठरत आहे. एकीकडे तहसील कार्यालय कामे बंद ठेवत असतानाच पंचायत समितीमार्फत मात्र रोजगार हमी योजनेची कामे सुरु आहेत. परंतु, तालुका दंडाधिकार्‍यांची कामबंद ठेवण्याची भूमिका मजुरांच्या पथ्यावर पडत आहे. (वार्ताहर) कोट्यवधींचे प्रस्ताव प्रलंबित तालुक्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या कामांसाठी शासनाकडे पुरेसा निधी नाही. परंतु, एमआरजीएसअंतर्गत कामे केल्यास गावातील मजुरांना काम मिळेल यासाठी विविध सरपंच, ग्रामपंचायती यांनी तहसीलदार जिंतूर यांच्याकडे २०० ते २५० प्रस्ताव मागील दोन महिन्यांपासून दाखल केले आहेत. परंतु, या प्रस्तावाला मान्यता देण्यास तहसीलदारांनी नकार दिला आहे. विशेष म्हणजे, प्रस्ताव तयार करण्यापूर्वी जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी श्रमदानातून रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्या कराव्यात, अशा सूचना वेळोवेळी बैठकांतून दिल्या. त्यामुळे अनेकांनी श्रमदानातून नाल्या करुन रस्ते तयार केले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कामे बंद असल्याने भविष्यामध्ये नागरिकांना या रस्त्यावरुन वाहने चालविणे व पादचार्‍यांना प्रचंड त्रास होणार आहे. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रशासन चालले कासवगतीने तालुका प्रशासन मागील तीन ते चार महिन्यांपासून अत्यंत धिमे झाले आहे. कधी बैठकीचे कारण पुढे करुन तर कधी निवडणुकीचे कारण पुढे करुन कामे करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तालुका प्रशासनाने तर जुन्या कामांकडे बोट दाखवत नवीन कामांना मंजुरी देणे टाळले. वरुनच आदेश असल्याचे सांगत कार्यकर्त्यांची बोळवण केली जात आहे. मात्र यापूर्वी अनेक प्रशासकीय बाबी धाब्यावर बसवून कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली, त्याचे काय, हे न उलगडणारे कोडे आहे.