शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, चोख बंदोबस्त
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
4
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
5
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
6
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
7
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
8
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
9
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
10
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
11
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
12
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
13
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
14
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
15
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
16
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
17
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
18
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
20
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

गावच्या वेशीबाहेरच ‘लम्पी’ रोखणार; पावणेतीन लाख जनावरांच्या लसीकरणाचे ‘टार्गेट’

By विजय सरवदे | Updated: July 13, 2023 19:56 IST

आता पुन्हा लम्पीचा गावांत शिरकाव होऊ नये, म्हणून पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : थांबलेल्या ‘लम्पी’ संसर्गजन्य आजाराने पुन्हा तोंड वर काढू नये, म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला असून, आता हा आजार वेशीबाहेरच रोखण्यासाठी लसीकरण, तसेच गोठा फवारणीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे पावणेतीन लाख जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुरेखा माने यांनी दिली.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात ‘लम्पी’ आजाराचा शिरकाव झाला. बघता-बघता या आजाराने संपूर्ण जिल्हा कवेत घेतला. त्यामुळे पशुपालकांवर मोठे संकट ओढावले. या आजाराने मार्चअखेरपर्यंत ११ हजार ९७२ जनावरे बाधित झाली, तर १ हजार २५२ जनावरे मरण पावली. त्यामुळे शेतकरी पशुपालकांचे आतोनात नुकसान झाले. आता पुन्हा लम्पीचा गावांत शिरकाव होऊ नये, म्हणून पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. एक मिशन म्हणून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे.

जिल्ह्यातील ५ लाख ३९ हजार गोवंश जनावरे आहेत. सध्या या विभागाकडे बफर स्टाॅकमध्ये असलेली ५५ हजार लस व नुकत्याच शासनाकडून प्राप्त २ लाख १३ हजार लसी या येत्या आठ ते दहा दिवसांत गोवंश जनावरांना दिल्या जाणार आहेत. बाधित गावांपासून पाच किलोमीटर त्रिजा परिसरातील गावांसाठी एक याप्रमाणे जिल्ह्यात १४८ ईपीक सेंटर स्थापन केले होते. पहिल्या टप्प्यात या ईपीक सेंटर परिसरातील जनावरांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर, शासनाकडून मिळणाऱ्या लसी जिल्ह्यातील उर्वरित गावांतील सर्व गोवंश जनावरांना दिल्या जाणार आहेत.

गोठ्यांची स्वच्छता महत्त्वाचीप्रामुख्याने गोमाशा, गोचीड आणि चिलटांमुळे ‘लम्पी’ हा संसर्ग आजार गोवंश जनावरांना होतो. गोठ्यापर्यंत हा आजार येऊच नये, यासाठी पशुपालकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील प्रशिक्षित ‘लम्पी’दूत गावागावांत जाऊन गोठ्यांची फवारणी करणार आहेत. त्यांना पशुपालकांनी सहकार्य करावे, याशिवाय लसीकरणासाठीही प्रतिसाद द्यावा.- डॉ.सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

लम्पीची लक्षणेया आजाराची लागण झाल्यास जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते, जनावरांना ताप येतो. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. हळूहळू डोके, मान, कास इत्यादी भागांच्या त्वचेवर १० ते ३० मिमी व्यासाच्या गाठी येतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर