शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

गावच्या वेशीबाहेरच ‘लम्पी’ रोखणार; पावणेतीन लाख जनावरांच्या लसीकरणाचे ‘टार्गेट’

By विजय सरवदे | Updated: July 13, 2023 19:56 IST

आता पुन्हा लम्पीचा गावांत शिरकाव होऊ नये, म्हणून पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : थांबलेल्या ‘लम्पी’ संसर्गजन्य आजाराने पुन्हा तोंड वर काढू नये, म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला असून, आता हा आजार वेशीबाहेरच रोखण्यासाठी लसीकरण, तसेच गोठा फवारणीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे पावणेतीन लाख जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुरेखा माने यांनी दिली.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात ‘लम्पी’ आजाराचा शिरकाव झाला. बघता-बघता या आजाराने संपूर्ण जिल्हा कवेत घेतला. त्यामुळे पशुपालकांवर मोठे संकट ओढावले. या आजाराने मार्चअखेरपर्यंत ११ हजार ९७२ जनावरे बाधित झाली, तर १ हजार २५२ जनावरे मरण पावली. त्यामुळे शेतकरी पशुपालकांचे आतोनात नुकसान झाले. आता पुन्हा लम्पीचा गावांत शिरकाव होऊ नये, म्हणून पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. एक मिशन म्हणून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे.

जिल्ह्यातील ५ लाख ३९ हजार गोवंश जनावरे आहेत. सध्या या विभागाकडे बफर स्टाॅकमध्ये असलेली ५५ हजार लस व नुकत्याच शासनाकडून प्राप्त २ लाख १३ हजार लसी या येत्या आठ ते दहा दिवसांत गोवंश जनावरांना दिल्या जाणार आहेत. बाधित गावांपासून पाच किलोमीटर त्रिजा परिसरातील गावांसाठी एक याप्रमाणे जिल्ह्यात १४८ ईपीक सेंटर स्थापन केले होते. पहिल्या टप्प्यात या ईपीक सेंटर परिसरातील जनावरांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर, शासनाकडून मिळणाऱ्या लसी जिल्ह्यातील उर्वरित गावांतील सर्व गोवंश जनावरांना दिल्या जाणार आहेत.

गोठ्यांची स्वच्छता महत्त्वाचीप्रामुख्याने गोमाशा, गोचीड आणि चिलटांमुळे ‘लम्पी’ हा संसर्ग आजार गोवंश जनावरांना होतो. गोठ्यापर्यंत हा आजार येऊच नये, यासाठी पशुपालकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील प्रशिक्षित ‘लम्पी’दूत गावागावांत जाऊन गोठ्यांची फवारणी करणार आहेत. त्यांना पशुपालकांनी सहकार्य करावे, याशिवाय लसीकरणासाठीही प्रतिसाद द्यावा.- डॉ.सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

लम्पीची लक्षणेया आजाराची लागण झाल्यास जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते, जनावरांना ताप येतो. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. हळूहळू डोके, मान, कास इत्यादी भागांच्या त्वचेवर १० ते ३० मिमी व्यासाच्या गाठी येतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर