शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

गावच्या वेशीबाहेरच ‘लम्पी’ रोखणार; पावणेतीन लाख जनावरांच्या लसीकरणाचे ‘टार्गेट’

By विजय सरवदे | Updated: July 13, 2023 19:56 IST

आता पुन्हा लम्पीचा गावांत शिरकाव होऊ नये, म्हणून पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : थांबलेल्या ‘लम्पी’ संसर्गजन्य आजाराने पुन्हा तोंड वर काढू नये, म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला असून, आता हा आजार वेशीबाहेरच रोखण्यासाठी लसीकरण, तसेच गोठा फवारणीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे पावणेतीन लाख जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुरेखा माने यांनी दिली.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात ‘लम्पी’ आजाराचा शिरकाव झाला. बघता-बघता या आजाराने संपूर्ण जिल्हा कवेत घेतला. त्यामुळे पशुपालकांवर मोठे संकट ओढावले. या आजाराने मार्चअखेरपर्यंत ११ हजार ९७२ जनावरे बाधित झाली, तर १ हजार २५२ जनावरे मरण पावली. त्यामुळे शेतकरी पशुपालकांचे आतोनात नुकसान झाले. आता पुन्हा लम्पीचा गावांत शिरकाव होऊ नये, म्हणून पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. एक मिशन म्हणून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे.

जिल्ह्यातील ५ लाख ३९ हजार गोवंश जनावरे आहेत. सध्या या विभागाकडे बफर स्टाॅकमध्ये असलेली ५५ हजार लस व नुकत्याच शासनाकडून प्राप्त २ लाख १३ हजार लसी या येत्या आठ ते दहा दिवसांत गोवंश जनावरांना दिल्या जाणार आहेत. बाधित गावांपासून पाच किलोमीटर त्रिजा परिसरातील गावांसाठी एक याप्रमाणे जिल्ह्यात १४८ ईपीक सेंटर स्थापन केले होते. पहिल्या टप्प्यात या ईपीक सेंटर परिसरातील जनावरांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर, शासनाकडून मिळणाऱ्या लसी जिल्ह्यातील उर्वरित गावांतील सर्व गोवंश जनावरांना दिल्या जाणार आहेत.

गोठ्यांची स्वच्छता महत्त्वाचीप्रामुख्याने गोमाशा, गोचीड आणि चिलटांमुळे ‘लम्पी’ हा संसर्ग आजार गोवंश जनावरांना होतो. गोठ्यापर्यंत हा आजार येऊच नये, यासाठी पशुपालकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील प्रशिक्षित ‘लम्पी’दूत गावागावांत जाऊन गोठ्यांची फवारणी करणार आहेत. त्यांना पशुपालकांनी सहकार्य करावे, याशिवाय लसीकरणासाठीही प्रतिसाद द्यावा.- डॉ.सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

लम्पीची लक्षणेया आजाराची लागण झाल्यास जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते, जनावरांना ताप येतो. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. हळूहळू डोके, मान, कास इत्यादी भागांच्या त्वचेवर १० ते ३० मिमी व्यासाच्या गाठी येतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर