शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेचे पडघम; भाजपच्या ‘शत-प्रतिशत’ रणनीतीने शिवसेना शिंदे गट अस्वस्थ

By स. सो. खंडाळकर | Updated: January 5, 2023 12:16 IST

भाजपने ठोकला मराठवाड्यातील आठही मतदारसंघांवर दावा

- ससो खंडाळकरऔरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुकीला सुमारे दीड वर्षाचा कालावधी असला तरी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मराठवाड्यातील आठही मतदारसंघांवर भाजपने दावा सांगितल्याने बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे समजते.

‘शत प्रतिशत भाजप’ मिशन अंतर्गत मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघांवर भाजपचा डोळा दिसतोय. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी औरंगाबाद येथून जणू लोकसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले आहे. सध्या जालन्यातून रावसाहेब दानवे, बीडमधून प्रीतम मुंडे, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे असे चार खासदार भाजपचे आहेत. औरंगाबादमधून इम्तियाज जलिल हे एमआयएमचे, परभणीमधून संजय जाधव व उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार आहेत. तर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटात गेलेले आहेत.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी, मराठवाड्याच्या सर्व जागा भाजप लढेल, असे म्हटले आहे. असे झाले तर मग शिंदे गटाचे अस्तित्व ते काय उरेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी औरंगाबाद जिल्ह्यात झाली. पैठणचे संदीपान भुमरे, औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट, मध्यचे प्रदीप जैस्वाल, सिल्लोडचे अब्दुल सत्तार, वैजापूरचे प्रा. रमेश बोरनारे हे बंडखोरीत अग्रभागी होते. कन्नडचे उदयसिंह राजपूत हे शिंदे गटातून वेळीच परत फिरले. जिल्ह्यात फुलंब्रीतून हरिभाऊ बागडे, औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे, गंगापूर - खुलताबादमधून प्रशांत बंब एवढेच भाजपचे आमदार आहेत. आमदारांच्या संख्येचा विचार करता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाला सुटायला हवा, असा शिंदे गटाचा आग्रह आहे.

शिंदे गटाचे एक आमदार म्हणाले, भाजपने आमच्याशी चर्चा न करताच मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघांवर दावा सांगितला आहे. जागावाटपावर अद्याप दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणे बाकी आहे. असे असताना जागांबाबत परस्पर एकतर्फी विधाने केल्याने अविश्वास निर्माण होईल. भाजपच्या या डावपेचाबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत, असेही ते म्हणाले. शिंदे गटाकडे सक्षम उमेदवार आहे का, असे विचारता ते आमदार म्हणाले, कोण म्हणतो शिंदे गटाकडे सक्षम उमेदवार नाही? संदीपान भुमरे व वेळ पडल्यास अब्दुल सत्तारही लोकसभा लढवू शकतात.

हेमंत पाटलांचे समर्थकही चिंतेत हिंगोलीचे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हे राज्यातील राजकीय बंडात शिंदे सोबत  गले. भाजपने मराठवाड्यातील आठही जागांवर दावा सांगितल्याने हेमंत पाटलांचे काय? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला आहे . जालना मतदारसंघ युतीतून शिवसेनेला सोडवा , असाही सतत मागणी करणारे अर्जुन खोतकर आता शिंदे गटात असून, त्यांनीही भाजपच्या या रणनीतीवर प्रहार केला आहे . 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMarathwadaमराठवाडाlok sabhaलोकसभा