शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

लोकसभा रंगतदार होणार; छत्रपती संभाजीनगरात विनोद पाटील यांची उमेदवारीची घोषणा

By बापू सोळुंके | Updated: March 1, 2024 18:16 IST

विनोद पाटील यांच्या उमेदवारीमुळे आगामी लोकसभा निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा सुरू झाली.

छत्रपती संभाजीनगर: आगामी लोकसभा निवडणुकीचे पघडम वाजू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांसोबतच इच्छुकांकडूनही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी शुक्रवारी येथे सत्कार समारंभात औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केली. विनोद पाटील यांच्या उमेदवारीमुळे आगामी लोकसभा निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा सुरू झाली.

उत्तरप्रदेशातील आग्रा येथील किल्ल्यात जेथे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने दगाफटका करून अपमानित केले होते. त्याच दिवाण -ए -आम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती समारंभाचे आयोजन सलग दुसऱ्या वर्षी विनोद पाटील यांनी केले होते. या यशस्वी आयोजनाबद्दल शहरातील नागरीकांच्यावतीने शुक्रवारी सिडकोतील मंगल कार्यालयात पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक पृथ्वीराज पवार यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुष्पहार घालून आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  

या समारंभात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यात अग्रसेर असलेली मंडळी विचारपीठावर उपस्थित होती. यावेळी प्रत्येकांनी आपल्या भाषणात विनोद पाटील यांनी आगामी लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. यात प्रा.रामदास गायकवाड, प्रा. चंद्रकांत भराट, संदीप बोरसे,  सुरेश वाकडे, माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद जंजाळ, रेखा वाहटुळे ,माजी उपमहापौर राजू शिंदे,   विजय वाहुळ, महेश गुजरे, सतीश तुपे, कलीम शेख आदींनी उत्तर देताना विनोद पाटील यांनी सक्रिय राजकारणात यावे आणि आगामी लोकसभेची निवडणू लढवावी,अशी मागणी केली. 

यावेळी प्रत्येक वक्ता सभागृहातील उपस्थितांना विनोद पाटील यांना आपल्याला खासदार करायचे असल्याचे आवाहन करीत. सभागृहातील मंडळीही त्यांना होकार देत. या सत्काराला उत्तर देताना विनोद पाटील यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. पाटील यांच्या घोषणेने औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चित्र निर्माण होण्यास सुरवात झाली आहे.

महाविकास आघाडीकडून खैरे ? तर महायुतीकडून डॉ. कराड यांची चर्चामहाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे आणि महायुतीकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड  यांच्या नावाची तर एमआयएमकडून विद्यमान खासदार सय्यद इम्तियाज जलील हे निवडूणक रिंगणार असतील असे चित्र आहे. आता विनेाद पाटील यांच्या उमेदवारीने आगामी लोकसभा निवडणूक चौरंगी होईल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभाMaratha Reservationमराठा आरक्षण