शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मराठवाड्यातील लढतींचे चित्र; मविआचे सहा उमेदवार जाहीर, महायुतीत तीन जागांचा तिढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 07:40 IST

औरंगाबाद, उस्मानाबाद आणि हिंगोली या तीन जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लोकसभेच्या आठपैकी सहा जागांवरील उमेदवार जाहीर करून महाविकास आघाडी प्रचाराला लागली असून, महायुतीचे घोडे अजूनही तीन जागांवर अडले आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि हिंगोली या तीन जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बुधवारी सोळा उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. औरंगाबादमधून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली. खैरे यांच्या उमेदवारीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विरोध होता.

हिंगोलीचे विद्यमान शिवसेना खासदार हेमंत पाटील शिंदे गटात गेल्याने ठाकरे यांनी तिथे हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना संधी दिली आहे. परभणीत संजय ऊर्फ बंडू जाधव, तर उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर या विद्यमान खासदारांना संधी मिळाली आहे.

चारपैकी तीन मराठाउद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मराठवाड्यात दिलेले चारपैकी तीन उमेदवार मराठा समाजाचे तर एक ओबीसी प्रवर्गातील आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीला शिवसेनेचा सुरुवातीपासून पाठिंबा आहे. मराठा आरक्षण आंदोलन लक्षात घेऊन उमेदवार निवडल्याचे दिसून येते.

मराठवाड्यात मविआचे उमेदवारऔरंगाबाद - चंद्रकांत खैरे (शिवसेना-उबाठा)जालना - अद्याप जाहीर नाही (काँग्रेस)परभणी - संजय जाधव (शिवसेना - उबाठा) हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना, उबाठा) नांदेड - वसंतराव चव्हाण (काँग्रेस)लातूर - डाॅ. शिवाजी काळगे (काँग्रेस)उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर (शिवसेना, उबाठा) बीड - अद्याप जाहीर नाही (राष्ट्रवादी श. प.) 

जालना-बीडमधून कोण? मराठवाड्यातील आठ जागांपैकी चार शिवसेनेकडे, तीन काँग्रेस तर एक जागा राष्ट्रवादीला (शरद पवार) सोडण्यात आली आहे.जालन्यातून काँग्रेस तर बीडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.जालन्यातून कल्याण काळे (काँग्रेस) तर बीडमधून बजरंग सोनवणे अथवा ज्योती मेटेयांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

महायुतीत काय? भाजप - नांदेड, लातूर, बीड, जालनाशिवसेना (शिंदे) - अद्याप एकही उमेदवार जाहीर नाही.राष्ट्रवादी (अजित पवार) - अद्याप एकही उमेदवार जाहीर नाही. (औरंगाबाद, उस्मानाबाद आणि हिंगोलीचा पेच कायम)

महायुतीची तिघाडीमहायुतीत औरंगाबाद, हिंगोली आणी उस्मानाबाद या तीन जागांचा तिढा कायम आहे. औरंगाबादच्या जागेवर भाजप आणि शिंदे गट, उस्मानाबादमध्ये भाजप-राष्ट्रवादी तर हिंगोलीत भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४