शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Lok Sabha Election 2019 : उमेदवार कोण? जिंकणार कोण? चर्चांना उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 19:06 IST

अशा चर्चांना विद्यापीठातील विविध ठिकाणी, महाविद्यालयातील कट्ट्यांवर उधाण आले आहे.

औरंगाबाद : प्रधानमंत्रीपदी पुन्हा नरेंद्र मोदी येणार? औरंगाबाद लोकसभेची लढत कशी होणार ? सेनेला भाजप आणि काँग्रेसला राष्ट्रवादी किती मदत करणार ? इतर उमेदवार कोण असणार? वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचा उमेदवार किती मते घेणार? अशा चर्चांना विद्यापीठातील विविध ठिकाणी, महाविद्यालयातील कट्ट्यांवर उधाण आले आहे. यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षक हिरीरीने सहभागी होत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत खासदार चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला सुटणार असून, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण उमेदवार राहतील, अशी चर्चा करण्यात येत होती. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या भाजपमधील प्रवेशामुळे औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सुटणार नाही, अशी मतेही नोंदविली जात होती. यातच शुक्रवारी उशिरा कॉंग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे आता चर्चा खैरे विरुद्ध झांबड अशीच रंगत आहे. हर्षवर्धन जाधव यांनी सुद्धा दंड थोपटले असून एमआयएमसुद्धा लढत देणार आहे. या साऱ्या घटनांवर नागरिकांचे लक्ष आहे.  

औरंगाबाद शहरातील समस्यांचा पाडा वाचताना विद्यमान खासदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणारी चर्चाही रंगात आहे. मात्र, त्याचे नशीब बलवत्तर असल्याचे अनेक जण बोलताना दिसतात. विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापक, प्रशासकीय इमारतीमधील कर्मचारीही या चर्चांत सहभागी होत आहेत.

विद्यापीठाच्या अभ्यासिकेच्या बाहेर विद्यार्थी औरंगाबादसह राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांत काय होणार, याविषयी आडाखे बांधत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समर्थक आणि विरोधक यांच्यात शाब्दिक बाण चालविण्यात येत असल्याची प्रतिक्रिया संशोधक विद्यार्थी रवी कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

नोकरभरती, बेरोजगारीवरून युवकांमध्ये संतापमहाविद्यालय, विद्यापीठातील युवकांमध्ये मागील तीन वर्षांपासूून विविध नोकरभरतीवर घातलेली बंदी, बेरोजगारीचे वाढलेले प्रमाण यावरून संताप व्यक्त केला जात आहे.निवडणुकीच्या अगोदर नोकरभरतीला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यात पुढे काहीच झाले नाही, अशी भावना संशोधक विद्यार्थी श्रीराम फरताडे यांनी व्यक्त केली. ७२ हजार जागा भरण्याचेही गाजरच दाखविले असल्याचे मत शामराव रुद्रे या विद्यार्थ्याने व्यक्त केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थी