शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : उमेदवार कोण? जिंकणार कोण? चर्चांना उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 19:06 IST

अशा चर्चांना विद्यापीठातील विविध ठिकाणी, महाविद्यालयातील कट्ट्यांवर उधाण आले आहे.

औरंगाबाद : प्रधानमंत्रीपदी पुन्हा नरेंद्र मोदी येणार? औरंगाबाद लोकसभेची लढत कशी होणार ? सेनेला भाजप आणि काँग्रेसला राष्ट्रवादी किती मदत करणार ? इतर उमेदवार कोण असणार? वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचा उमेदवार किती मते घेणार? अशा चर्चांना विद्यापीठातील विविध ठिकाणी, महाविद्यालयातील कट्ट्यांवर उधाण आले आहे. यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षक हिरीरीने सहभागी होत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत खासदार चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला सुटणार असून, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण उमेदवार राहतील, अशी चर्चा करण्यात येत होती. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या भाजपमधील प्रवेशामुळे औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सुटणार नाही, अशी मतेही नोंदविली जात होती. यातच शुक्रवारी उशिरा कॉंग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे आता चर्चा खैरे विरुद्ध झांबड अशीच रंगत आहे. हर्षवर्धन जाधव यांनी सुद्धा दंड थोपटले असून एमआयएमसुद्धा लढत देणार आहे. या साऱ्या घटनांवर नागरिकांचे लक्ष आहे.  

औरंगाबाद शहरातील समस्यांचा पाडा वाचताना विद्यमान खासदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणारी चर्चाही रंगात आहे. मात्र, त्याचे नशीब बलवत्तर असल्याचे अनेक जण बोलताना दिसतात. विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापक, प्रशासकीय इमारतीमधील कर्मचारीही या चर्चांत सहभागी होत आहेत.

विद्यापीठाच्या अभ्यासिकेच्या बाहेर विद्यार्थी औरंगाबादसह राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांत काय होणार, याविषयी आडाखे बांधत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समर्थक आणि विरोधक यांच्यात शाब्दिक बाण चालविण्यात येत असल्याची प्रतिक्रिया संशोधक विद्यार्थी रवी कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

नोकरभरती, बेरोजगारीवरून युवकांमध्ये संतापमहाविद्यालय, विद्यापीठातील युवकांमध्ये मागील तीन वर्षांपासूून विविध नोकरभरतीवर घातलेली बंदी, बेरोजगारीचे वाढलेले प्रमाण यावरून संताप व्यक्त केला जात आहे.निवडणुकीच्या अगोदर नोकरभरतीला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यात पुढे काहीच झाले नाही, अशी भावना संशोधक विद्यार्थी श्रीराम फरताडे यांनी व्यक्त केली. ७२ हजार जागा भरण्याचेही गाजरच दाखविले असल्याचे मत शामराव रुद्रे या विद्यार्थ्याने व्यक्त केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थी