शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : उमेदवार कोण? जिंकणार कोण? चर्चांना उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 19:06 IST

अशा चर्चांना विद्यापीठातील विविध ठिकाणी, महाविद्यालयातील कट्ट्यांवर उधाण आले आहे.

औरंगाबाद : प्रधानमंत्रीपदी पुन्हा नरेंद्र मोदी येणार? औरंगाबाद लोकसभेची लढत कशी होणार ? सेनेला भाजप आणि काँग्रेसला राष्ट्रवादी किती मदत करणार ? इतर उमेदवार कोण असणार? वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचा उमेदवार किती मते घेणार? अशा चर्चांना विद्यापीठातील विविध ठिकाणी, महाविद्यालयातील कट्ट्यांवर उधाण आले आहे. यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षक हिरीरीने सहभागी होत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत खासदार चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला सुटणार असून, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण उमेदवार राहतील, अशी चर्चा करण्यात येत होती. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या भाजपमधील प्रवेशामुळे औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सुटणार नाही, अशी मतेही नोंदविली जात होती. यातच शुक्रवारी उशिरा कॉंग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे आता चर्चा खैरे विरुद्ध झांबड अशीच रंगत आहे. हर्षवर्धन जाधव यांनी सुद्धा दंड थोपटले असून एमआयएमसुद्धा लढत देणार आहे. या साऱ्या घटनांवर नागरिकांचे लक्ष आहे.  

औरंगाबाद शहरातील समस्यांचा पाडा वाचताना विद्यमान खासदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणारी चर्चाही रंगात आहे. मात्र, त्याचे नशीब बलवत्तर असल्याचे अनेक जण बोलताना दिसतात. विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापक, प्रशासकीय इमारतीमधील कर्मचारीही या चर्चांत सहभागी होत आहेत.

विद्यापीठाच्या अभ्यासिकेच्या बाहेर विद्यार्थी औरंगाबादसह राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांत काय होणार, याविषयी आडाखे बांधत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समर्थक आणि विरोधक यांच्यात शाब्दिक बाण चालविण्यात येत असल्याची प्रतिक्रिया संशोधक विद्यार्थी रवी कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

नोकरभरती, बेरोजगारीवरून युवकांमध्ये संतापमहाविद्यालय, विद्यापीठातील युवकांमध्ये मागील तीन वर्षांपासूून विविध नोकरभरतीवर घातलेली बंदी, बेरोजगारीचे वाढलेले प्रमाण यावरून संताप व्यक्त केला जात आहे.निवडणुकीच्या अगोदर नोकरभरतीला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यात पुढे काहीच झाले नाही, अशी भावना संशोधक विद्यार्थी श्रीराम फरताडे यांनी व्यक्त केली. ७२ हजार जागा भरण्याचेही गाजरच दाखविले असल्याचे मत शामराव रुद्रे या विद्यार्थ्याने व्यक्त केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थी