शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

उमेदवारांना चाचपताना चाचपडताहेत प्रमुख पक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 14:18 IST

इतर पक्षांतील संभाव्य उमेदवारांनाच आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न होत आहेत

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी मराठवाड्यात तरी कोणत्याही प्रमुख उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.

सर्वच पक्ष उमेदवारांची अंतिम चाचपणी करताना चाचपडताहेत अशीच स्थिती मंगळवारी बहुतेक ठिकाणी होती. पुन्हा त्यातच उमेदवारी अर्ज करण्याच्या मुदतीतच या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या आयाराम- गयारामांमुळे संभ्रम अधिकच वाढला आहे 

औरंगाबादेत होळीनंतरच प्रमुख पक्ष उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. चंद्रकांत खैरेंविरुद्ध आघाडीतर्फे कोण लढणार; हे अद्यापही नक्की ठरत नाही. एमआयएमने स्वतंत्र उमेदवार दिल्यास वंचित बहुुजन आघाडीत फूट पडण्याची चिन्हे आहेत.

नांदेडला ५१ जणांनी ९३ अर्ज नेले. फक्त एका अपक्षाने अर्ज दाखल केला. लातूरला १५ जणांनी ३८ अर्ज दाखल केले. पण एकानेही दाखल केला नाही. तीच गत परभणी व बीडची. जालन्यात दानवे यांच्याविरुद्ध आघाडीतर्फे कोण; हे अजूनही स्पष्ट नाही. 

गोंधळाचे वातावरणएकंदरीत काय, तर उमेदवारांची चाचपणी करताना बहुतेक सारेच पक्ष चाचपडताहेत आणि दुसरीकडे इतर पक्षांतील संभाव्य उमेदवारांनाच आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी निष्ठावान उमेदवार बंडखोरी करणार आणि मतदारांसमोरील पर्यायही अधिक वाढणार, असे गोंधळाचे वातावरण सध्या आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाAurangabadऔरंगाबाद