शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Lok Sabha Election 2019 : लोकांच्या मनात खदखद, परिवर्तनाची सुप्त लाट : राजेंद्र दर्डा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 15:45 IST

काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन 

औरंगाबाद : ‘लोकांच्या मनात काही तरी खदखदतेय... परिवर्तनाची सुप्त लाट आलेली आहे,’ असे सूचक वक्तव्य आज येथे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. जालना रोडवर आकाशवाणीसमोर हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. 

त्यांनी सांगितले की, ३२ वर्षे ‘यांना’ आपण वाढू दिले. आता तर यांनी जाहीरच करून टाकले की, शहराला आठ दिवसांनंतर पाणी येईल. कचऱ्याच्या प्रश्नाने किती उग्र रूप धारण केले, हे आपण साऱ्यांनीच अनुभवले आहे. शहराचा व जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. आता बदल गरजेचा आहे. तो आपण करूया. 

यावेळी माजी खासदार उत्तमसिंग पवार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे, माजी मंत्री अनिल पटेल, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, माजी उपमहापौर तकी हसन, शेतकरी स्वाभिमान संघटनेचे चंद्रशेखर साळुंके पाटील, पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या सूर्यकांता गाडे आदींची भाषणे झाली. प्रारंभी, उमेदवार सुभाष झांबड यांनी प्रास्ताविक केले. ‘चला, बदल घडवू या’ असा नारा त्यांनी दिला.

मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  श्रीहरी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. माजी मंत्री गंगाधर गाडे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, मानसिंग पवार, सुधाकर सोनवणे, प्रकाश मुगदिया, छाया जंगले पाटील, फैय्याज कुरेशी, अ‍ॅड. सय्यद अक्रम,  डॉ. जितेंद्र देहाडे, इब्राहिम पठाण आदींची उपस्थिती होती. 

गांधी-नेहरू घराण्याचा अभ्यास करून बोलास्वातंत्र्यासाठी पं. जवाहरलाल नेहरू यांनी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे देशासाठीचे बलिदान सर्वश्रुत आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच जिवापाड झटत असतात.  असे असतानाही पंतप्रधान  त्यांच्यावर टीका करीत सुटले आहेत, हे निषेधार्ह होय, असे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी नमूद केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादcongressकाँग्रेसSubhash Zambadसुभाष झांबड