शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

Lok Sabha Election 2019 : लोकांच्या मनात खदखद, परिवर्तनाची सुप्त लाट : राजेंद्र दर्डा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 15:45 IST

काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन 

औरंगाबाद : ‘लोकांच्या मनात काही तरी खदखदतेय... परिवर्तनाची सुप्त लाट आलेली आहे,’ असे सूचक वक्तव्य आज येथे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. जालना रोडवर आकाशवाणीसमोर हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. 

त्यांनी सांगितले की, ३२ वर्षे ‘यांना’ आपण वाढू दिले. आता तर यांनी जाहीरच करून टाकले की, शहराला आठ दिवसांनंतर पाणी येईल. कचऱ्याच्या प्रश्नाने किती उग्र रूप धारण केले, हे आपण साऱ्यांनीच अनुभवले आहे. शहराचा व जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. आता बदल गरजेचा आहे. तो आपण करूया. 

यावेळी माजी खासदार उत्तमसिंग पवार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे, माजी मंत्री अनिल पटेल, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, माजी उपमहापौर तकी हसन, शेतकरी स्वाभिमान संघटनेचे चंद्रशेखर साळुंके पाटील, पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या सूर्यकांता गाडे आदींची भाषणे झाली. प्रारंभी, उमेदवार सुभाष झांबड यांनी प्रास्ताविक केले. ‘चला, बदल घडवू या’ असा नारा त्यांनी दिला.

मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  श्रीहरी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. माजी मंत्री गंगाधर गाडे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, मानसिंग पवार, सुधाकर सोनवणे, प्रकाश मुगदिया, छाया जंगले पाटील, फैय्याज कुरेशी, अ‍ॅड. सय्यद अक्रम,  डॉ. जितेंद्र देहाडे, इब्राहिम पठाण आदींची उपस्थिती होती. 

गांधी-नेहरू घराण्याचा अभ्यास करून बोलास्वातंत्र्यासाठी पं. जवाहरलाल नेहरू यांनी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे देशासाठीचे बलिदान सर्वश्रुत आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच जिवापाड झटत असतात.  असे असतानाही पंतप्रधान  त्यांच्यावर टीका करीत सुटले आहेत, हे निषेधार्ह होय, असे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी नमूद केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादcongressकाँग्रेसSubhash Zambadसुभाष झांबड