शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम बंद; मजूर, कर्मचाऱ्यांनी गाठले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 18:45 IST

राज्य शासनाने औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेचे काम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाले.

ठळक मुद्देशहरांतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे सर्वेक्षण केले जात होते, ते आता बंद करण्यात आले आहे.नऊ ठिकाणी जलकुंभांची कामे सुरू होती, ही कामे देखील तूर्त बंद करण्यात आली आहेत.

औरंगाबाद : राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक लॉकडाऊन लावला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांना ब्रेक लागला आहे. सर्वेक्षणाचे काम ठप्प झाले असून, जलकुंभांची कामे देखील बंद पडली आहेत. या योजनेवर काम करणाऱ्या मजूर आणि कर्मचाऱ्यांनी गाव घातले आहे.

राज्य शासनाने औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेचे काम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचसोबत शहरातील अंतर्गत जलवाहिनींच्या कामाचे सर्वेक्षण देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मदतीने नियुक्त खासगी कंपनीने सुरू केले. शहरात नऊ ठिकाणी नवीन जलकुंभ बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असून नक्षत्रवाडी येथे संतुलित जलकुंभ (एमबीआर) बांधण्याचे काम देखील सुरू झाले. राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. १ मे पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. त्याचा परिणाम औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर झाला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजयसिंग यांनी सांगितले की, संचारबंदीचा कामावर परिणाम झाला आहे. शहरांतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे सर्वेक्षण केले जात होते, ते आता बंद करण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी आपापल्या गावी गेले आहेत. नऊ ठिकाणी जलकुंभांची कामे सुरू होती, ही कामे देखील तूर्त बंद करण्यात आली आहेत. शहरात २३ रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण होतानाच नवीन जलवाहिन्या टाकण्याचे नियोजन आहे. संचारबंदीमुळे ही कामे देखील करता येत नाहीत. १ मेपर्यंत कामांची अशीच स्थिती राहील, असे आम्ही गृहीत धरले आहे. रुग्ण संख्या कमी झाली आणि संचारबंदीचा आदेश मागे घेतला गेला की कामांना गती येईल, असा विश्वास अजयसिंह यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका