शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

लॉकडाऊनमुळे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम बंद; मजूर, कर्मचाऱ्यांनी गाठले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 18:45 IST

राज्य शासनाने औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेचे काम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाले.

ठळक मुद्देशहरांतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे सर्वेक्षण केले जात होते, ते आता बंद करण्यात आले आहे.नऊ ठिकाणी जलकुंभांची कामे सुरू होती, ही कामे देखील तूर्त बंद करण्यात आली आहेत.

औरंगाबाद : राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक लॉकडाऊन लावला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांना ब्रेक लागला आहे. सर्वेक्षणाचे काम ठप्प झाले असून, जलकुंभांची कामे देखील बंद पडली आहेत. या योजनेवर काम करणाऱ्या मजूर आणि कर्मचाऱ्यांनी गाव घातले आहे.

राज्य शासनाने औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेचे काम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचसोबत शहरातील अंतर्गत जलवाहिनींच्या कामाचे सर्वेक्षण देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मदतीने नियुक्त खासगी कंपनीने सुरू केले. शहरात नऊ ठिकाणी नवीन जलकुंभ बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असून नक्षत्रवाडी येथे संतुलित जलकुंभ (एमबीआर) बांधण्याचे काम देखील सुरू झाले. राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. १ मे पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. त्याचा परिणाम औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर झाला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजयसिंग यांनी सांगितले की, संचारबंदीचा कामावर परिणाम झाला आहे. शहरांतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे सर्वेक्षण केले जात होते, ते आता बंद करण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी आपापल्या गावी गेले आहेत. नऊ ठिकाणी जलकुंभांची कामे सुरू होती, ही कामे देखील तूर्त बंद करण्यात आली आहेत. शहरात २३ रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण होतानाच नवीन जलवाहिन्या टाकण्याचे नियोजन आहे. संचारबंदीमुळे ही कामे देखील करता येत नाहीत. १ मेपर्यंत कामांची अशीच स्थिती राहील, असे आम्ही गृहीत धरले आहे. रुग्ण संख्या कमी झाली आणि संचारबंदीचा आदेश मागे घेतला गेला की कामांना गती येईल, असा विश्वास अजयसिंह यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका