शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Lockdown In Auranagabad : कोरोनाला रोखण्यासाठी शहरवासीयांचा निर्धार; लॉकडाऊनचा दुसरा दिवसही यशस्वी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 19:56 IST

शहरात कोरोना रुग्णांनी ८ हजाराचा आकडा पार केला आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन व शहरवासीयांनी लॉकडाऊन यशस्वी करण्याचे मनातून निश्चित केल्याचे दिसते.

ठळक मुद्देदाट लोकवस्तीचा भाग वगळता अन्य कॉलनीतील घरे दिवसभर बंद

औरंगाबाद : शहरातील काही दाट वसाहती वगळता अन्य कॉलनीतील घरांचे दरवाजे दिवसभर बंद होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरवासीयांनी स्वत:ला घरात अक्षरश: कोंडूनच घेतले. यामुळे दुसऱ्या दिवशीही लॉकडाऊन दणदणीत पाळला गेला. विनाकारण फिरणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा व त्यांच्या मदतीला महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावर पाय रोवून उभे होते. येणाऱ्या-जाणाऱ्यांची चौकशी केली जात होती, दाट वसाहतींमध्ये पेट्रोलिंग करीत नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन केले जात होते.  न ऐकणाऱ्यांना फटके दिले जात होते. 

शहरात कोरोना रुग्णांनी ८ हजाराचा आकडा पार केला आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन व शहरवासीयांनी लॉकडाऊन यशस्वी करण्याचे मनातून निश्चित केल्याचे दिसते. प्रशासनाला जनतेची साथ मिळते तेव्हा काय घडते त्याचे औरंगाबादेतील लॉकडाऊन  उत्तम उदाहरण ठरत आहे. उगाच फिरणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी पोलीस यंत्रणा व त्याच सोबतीने महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे नागरिकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. सकाळी दूध खरेदीचा अपवाद वगळता बहुतांश कॉलनीत लोक घराचे दरवाजेही दिवसभर बंद करून ठेवताना दिसून आले. 

सिडकोतील  एन-१,  एन-२, एन-३, एन-४, एन-५,  एन-६, एन-७, एन-८ , एन-९, एन-११, तसेच  जवाहर कॉलनी, बौद्धनगर, गारखेडा परिसर, ज्योतीनगर, उल्कानगरी, शिवाजीनगर, गावातील समर्थनगर, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, एसबी कॉलनी, रेल्वेस्टेशन परिसरातील बन्सीलालनगर, मिटकर कॉलनी आदी भागांत लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, शहरातील काही दाट वसाहतींमध्ये गल्लीबोळांत मात्र लोक गप्पा मारताना, फिरताना दिसून येत आहेत. यात बायजीपुरा, संजयनगर, कैलासनगर, जिन्सी, रोशनगेट परिसर, शाहबाजार, किराडपुरा, बुढीलेन या भागांत युवक व लहान मुले गल्लीत दिसून आली. यातील अनेक लोक मास्कही लावत नसल्याचे दिसून आले. या दाट वसाहतींवर पोलिसांनी शनिवारी लक्ष केंद्रित केले होते. पेट्रोलिंग सुरू होती, दुचाकीवरही पोलीस गस्त घालत होते. पोलीस नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करीत होते. पोलिसाची गाडी दिसली की, युवक घरात पळून जात व पोलीस गेले की पुन्हा बाहेर पडत होते. मात्र, शहरातील चौकाचौकांत चोख पोलीस बंदोबस्त असल्याने लॉकडाऊन दुसऱ्या दिवशीही यशस्वी ठरले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस