शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाण्यातील जागेवर कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 18:23 IST

आधी प्रक्रिया मशिन्स बसवा, त्यानंतरच कचऱ्याची वाहने याठिकाणी आणा, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. परिणामी पालिकेच्या कचऱ्याने भरलेली वाहने येथून परतली. 

ठळक मुद्देशहरातील कचऱ्याचा प्रश्न १३९ दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे.

औरंगाबाद : शहरातील कचऱ्याचा प्रश्न १३९ दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे. शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग तसेच असून, पावसामुळे त्यातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली आहे. बुधवारी चिकलठाण्यातील जागेवर कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे कचऱ्याने भरलेली पालिकेची वाहने परत आली. गुरुवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले व अधिकाऱ्यांनी तेथील नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आधी प्रक्रिया मशिन्स बसवा, त्यानंतरच कचऱ्याची वाहने याठिकाणी आणा, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. परिणामी पालिकेच्या कचऱ्याने भरलेली वाहने परतली. 

नारेगाव-मांडकी कचरा डेपो १३९ दिवसांपासून बंद झाल्यामुळे शहराची कचराकोंडी झाली आहे. हर्सूल, चिकलठाणा, कांचनवाडी आणि पडेगाव या परिसरात कचरा टाकण्यासाठी पालिकेने प्रयत्न केले. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे मनपाला माघार घ्यावी लागली. चिकलठाण्यातील दुग्धनगरीच्या जागेत मनपा कचरा आणून टाकत आहे. त्यावर कोणतीही प्रक्रिया करीत नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे, त्यामुळे यापुढे कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. महापौरांसोबत  शहर अभियंता एस. डी. पानझडे, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.

यावेळी माजी नगरसेवक संजय चौधरी, बाळासाहेब दहीहंडे, दिगंबर कावडे, नीलेश कावडे, संतोष रिठे, कचरू कावडे, संजय गोटे, नारायण गव्हाणे आदी नागरिकांची उपस्थिती होती. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी निश्चित केलेल्या जागांपैकी हर्सूल व चिकलठाणा येथील जागेवर कचरा टाकण्यास नागरिकांचा विरोध सुरू आहे. त्यामुळे शहरातील कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न मनपा प्रशासनासमोर उभा राहिला. 

मनपासह समितीला अपयश कचऱ्याच्या विल्हेवाटीप्रकरणी निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यात पालिकेला आणि विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला पूर्णत: अपयश आले आहे. समितीने हळूहळू या प्रकरणातून अंग काढून घेतले आहे. मनपाला आयुक्त मिळाल्यानंतर समितीने कागदोपत्री बैठका घेऊन शासनाकडे अहवाल पाठविण्याचे सोपस्कार पूर्ण केले आहेत. 

आता रोगराईची भीतीशहरातील प्रत्येक कॉर्नरवर कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. पावसामुळे तो कचरा आता रोगराईला आमंत्रण देणारा ठरणार आहे. हे सगळे होत असताना पालिकेला १३९ दिवसांत कचरा प्रक्रियेसाठी एक जागा शोधता आलेली नाही. ओला व सुका कचरा विघटन याबाबत जनजागृती करणाऱ्या संस्थाही गायब झाल्याचे दिसते आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाchikhalthanaचिखलठाणा