शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

चिकलठाण्यातील जागेवर कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 18:23 IST

आधी प्रक्रिया मशिन्स बसवा, त्यानंतरच कचऱ्याची वाहने याठिकाणी आणा, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. परिणामी पालिकेच्या कचऱ्याने भरलेली वाहने येथून परतली. 

ठळक मुद्देशहरातील कचऱ्याचा प्रश्न १३९ दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे.

औरंगाबाद : शहरातील कचऱ्याचा प्रश्न १३९ दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे. शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग तसेच असून, पावसामुळे त्यातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली आहे. बुधवारी चिकलठाण्यातील जागेवर कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे कचऱ्याने भरलेली पालिकेची वाहने परत आली. गुरुवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले व अधिकाऱ्यांनी तेथील नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आधी प्रक्रिया मशिन्स बसवा, त्यानंतरच कचऱ्याची वाहने याठिकाणी आणा, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. परिणामी पालिकेच्या कचऱ्याने भरलेली वाहने परतली. 

नारेगाव-मांडकी कचरा डेपो १३९ दिवसांपासून बंद झाल्यामुळे शहराची कचराकोंडी झाली आहे. हर्सूल, चिकलठाणा, कांचनवाडी आणि पडेगाव या परिसरात कचरा टाकण्यासाठी पालिकेने प्रयत्न केले. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे मनपाला माघार घ्यावी लागली. चिकलठाण्यातील दुग्धनगरीच्या जागेत मनपा कचरा आणून टाकत आहे. त्यावर कोणतीही प्रक्रिया करीत नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे, त्यामुळे यापुढे कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. महापौरांसोबत  शहर अभियंता एस. डी. पानझडे, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.

यावेळी माजी नगरसेवक संजय चौधरी, बाळासाहेब दहीहंडे, दिगंबर कावडे, नीलेश कावडे, संतोष रिठे, कचरू कावडे, संजय गोटे, नारायण गव्हाणे आदी नागरिकांची उपस्थिती होती. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी निश्चित केलेल्या जागांपैकी हर्सूल व चिकलठाणा येथील जागेवर कचरा टाकण्यास नागरिकांचा विरोध सुरू आहे. त्यामुळे शहरातील कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न मनपा प्रशासनासमोर उभा राहिला. 

मनपासह समितीला अपयश कचऱ्याच्या विल्हेवाटीप्रकरणी निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यात पालिकेला आणि विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला पूर्णत: अपयश आले आहे. समितीने हळूहळू या प्रकरणातून अंग काढून घेतले आहे. मनपाला आयुक्त मिळाल्यानंतर समितीने कागदोपत्री बैठका घेऊन शासनाकडे अहवाल पाठविण्याचे सोपस्कार पूर्ण केले आहेत. 

आता रोगराईची भीतीशहरातील प्रत्येक कॉर्नरवर कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. पावसामुळे तो कचरा आता रोगराईला आमंत्रण देणारा ठरणार आहे. हे सगळे होत असताना पालिकेला १३९ दिवसांत कचरा प्रक्रियेसाठी एक जागा शोधता आलेली नाही. ओला व सुका कचरा विघटन याबाबत जनजागृती करणाऱ्या संस्थाही गायब झाल्याचे दिसते आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाchikhalthanaचिखलठाणा