शहरं
Join us  
Trending Stories
1
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
2
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
3
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
4
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
5
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
6
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
7
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
8
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
9
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
10
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
11
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
12
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
13
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
14
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
15
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
16
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
17
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
18
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
19
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
20
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : मतदारांचा शेवटचा दिवस झाला ‘गोड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 17:42 IST

६५७ पैकी ६४७ मतदारांनी केले मतदान

ठळक मुद्दे९८ टक्के मतदान१० मतदारांची गैरहजेरी २२ रोजी निकाल

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक मतदानाचा दिवस मतदारांसाठी गोड ठरला. मागील अठरा दिवसांपासून काहीही हाती न लागलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी हाती फूल नाहीतर फुलाची ‘पाकळी’ पडली. निवडणुकीसाठी ९८.४८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. ६५७ पैकी ६४७ मतदारांनी मतदान केले. १० मतदार गैरहजर राहिले. त्यामध्ये जालन्यामधील ७ आणि औरंगाबाद, सिल्लोड व पैठण येथील प्रत्येकी १ मतदारांचा समावेश आहे. ३२१ पुरुष आणि ३२६ महिला मतदारांनी निवडणुकीत मतदान केले. 

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी यांच्यात थेट आमने-सामने लढत झाल्याचे स्पष्ट आहे. बहुमतामुळे महायुतीचे पारडे जड होते. तरीही इतर पक्षातील मतदान फोडण्यासाठी युतीने प्रचंड मेहनत घेतली. कारण भाजपवर शिवसेनेला मतदान होईपर्यंत भरवसा नव्हता. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणामुळे भाजपने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महायुतीच्या सर्व नेत्यांच्या मध्यस्थीने भाजपचा भरवसा जिंकण्यात शिवसेनेला यश आले. त्याचे परिणाम सोमवारी झालेल्या मतदानावर दिसून आले. आघाडीची काही मते फुटतील, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. 

महापौरांनी केले पहिले मतदानऔरंगाबाद जिल्ह्यातील पहिले मतदान महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले. येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्र होते. त्यानंतर माजी महापौर विकास जैन, त्र्यंबक तुपे यांनी मतदान केले. नगरसेवक सिद्धांत शिरसाट हे रुग्णालयातून मतदानासाठी आले. तीन मतदारांना मदतनीस देण्यात आले. यामध्ये मोहन मेघावाले, बन्सी जाधव व अन्य एकाचा समावेश होता. जि. प. गट सदस्याच्या ओळखपत्रावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे त्यांना मतदानासाठी थांबविण्यात आले. स्वाक्षरी आणल्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. औरंगाबाद तहसीलमध्ये सर्वाधिक १३८ मतदान होते. तेथे १०० टक्के मतदान झाले.

९ महिला मतदारांनी केले नाही मतदाननिवडणुकीत ९ महिला मतदारांनी मतदान केले नाही. ६५७ मतदारांपैकी ३३५ महिला मतदार आहेत. ३२२ पुरुष मतदारांपैकी ३२१ मतदारांनी मतदान केले. तर ३२६ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJalanaजालनाElectionनिवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस