शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : बहिष्काराचा पवित्रा घेणाऱ्या एमआयएम नगरसेवकांचा कल शिवसेनेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 19:27 IST

सेना उमेवाराने गुरुवारी घेतली नगरसेवकांची भेट

ठळक मुद्देस्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी मतदानसेनेकडून भेटी-गाठी सुरु  

औरंगाबाद : औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था १९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी  रिंगणात दोनच प्रमुख उमेदवार आहेत. शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांशी कोणत्याही उमेदवाराने संपर्क साधला नव्हता. गुरुवारी मध्यरात्री सेना उमेदवाराने काही एमआयएम नगरसेवकांची भेट घेतली. आज मध्यरात्री अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मागील साडेचार वर्षांपासून मनपातील नगरसेवक चातकासारखी वाट पाहत होते. आपल्या कार्यकाळात ही निवडणूक होते किंवा नाही अशीही भीती अनेकांना वाटत होती. अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. आचारसंहिता लागू झाली. सेनेकडून अंबादास दानवे तर काँग्रेसकडून बाबूराव कुलकर्णी यांचे नाव निश्चित झाले. निवडणूक रिंगणात दोघेच उमेदवार प्रमुख आहेत. अलीकडेच दोन्ही उमेदवारांनी एकत्र येऊन ‘घोडेबाजार’ करणार नाही अशी घोषणा केली. त्यामुळे नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मागील पंधरा दिवसांपासून अपक्ष, एमआयएम नगरसेवकांची चलबिचल वाढली होती. दरम्यान, एमआयएम पक्षाच्या नेत्यांनी सदसद्विवेक बुद्धीने कोणालाही मतदान करा, अशी मुभा नगरसेवकांना दिली.

पक्षाने स्वातंत्र्य दिल्याने नगरसेवकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून आले. निवडणूक रिंगणातील एकही उमेदवार त्यांच्याशी संपर्क करीत नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत कोणी संपर्क न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निश्चयही एमआयएम नगरसेवकांनी व्यक्त केला होता. अखेर गुरुवारी रात्री सेना उमेदवार अंबादास दानवे यांनी कटकटगेट भागातील काही नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शुक्रवारी मध्यरात्री एका ठिकाणी सर्व एमआयएम नगरसेवक एकत्र बसणार आहेत. या बैठकीत अंतिम ‘निर्णय’होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

अपेक्षित ‘मानपान’अशक्यऔरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत दरवेळी घोडेबाजार ठरलेला असतो. मागील दहा वर्षांमध्ये या निवडणुकीत प्रचंड पैसा खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना ही निवडणूक लढविणे अशक्य झाले होते. यंदा निवडणूक रिंगणातील दोन्ही उमेदवारांनी घोडेबाजारच्या मुद्यावर युती केली. ४त्यानंतर सोयीनुसार घोडेबाजार सुरू केला. नगरसेवकांना अपेक्षित ‘मानपान’आज तरी मिळणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादJalanaजालनाVidhan Parishadविधान परिषद