शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : बहिष्काराचा पवित्रा घेणाऱ्या एमआयएम नगरसेवकांचा कल शिवसेनेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 19:27 IST

सेना उमेवाराने गुरुवारी घेतली नगरसेवकांची भेट

ठळक मुद्देस्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी मतदानसेनेकडून भेटी-गाठी सुरु  

औरंगाबाद : औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था १९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी  रिंगणात दोनच प्रमुख उमेदवार आहेत. शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांशी कोणत्याही उमेदवाराने संपर्क साधला नव्हता. गुरुवारी मध्यरात्री सेना उमेदवाराने काही एमआयएम नगरसेवकांची भेट घेतली. आज मध्यरात्री अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मागील साडेचार वर्षांपासून मनपातील नगरसेवक चातकासारखी वाट पाहत होते. आपल्या कार्यकाळात ही निवडणूक होते किंवा नाही अशीही भीती अनेकांना वाटत होती. अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. आचारसंहिता लागू झाली. सेनेकडून अंबादास दानवे तर काँग्रेसकडून बाबूराव कुलकर्णी यांचे नाव निश्चित झाले. निवडणूक रिंगणात दोघेच उमेदवार प्रमुख आहेत. अलीकडेच दोन्ही उमेदवारांनी एकत्र येऊन ‘घोडेबाजार’ करणार नाही अशी घोषणा केली. त्यामुळे नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मागील पंधरा दिवसांपासून अपक्ष, एमआयएम नगरसेवकांची चलबिचल वाढली होती. दरम्यान, एमआयएम पक्षाच्या नेत्यांनी सदसद्विवेक बुद्धीने कोणालाही मतदान करा, अशी मुभा नगरसेवकांना दिली.

पक्षाने स्वातंत्र्य दिल्याने नगरसेवकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून आले. निवडणूक रिंगणातील एकही उमेदवार त्यांच्याशी संपर्क करीत नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत कोणी संपर्क न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निश्चयही एमआयएम नगरसेवकांनी व्यक्त केला होता. अखेर गुरुवारी रात्री सेना उमेदवार अंबादास दानवे यांनी कटकटगेट भागातील काही नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शुक्रवारी मध्यरात्री एका ठिकाणी सर्व एमआयएम नगरसेवक एकत्र बसणार आहेत. या बैठकीत अंतिम ‘निर्णय’होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

अपेक्षित ‘मानपान’अशक्यऔरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत दरवेळी घोडेबाजार ठरलेला असतो. मागील दहा वर्षांमध्ये या निवडणुकीत प्रचंड पैसा खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना ही निवडणूक लढविणे अशक्य झाले होते. यंदा निवडणूक रिंगणातील दोन्ही उमेदवारांनी घोडेबाजारच्या मुद्यावर युती केली. ४त्यानंतर सोयीनुसार घोडेबाजार सुरू केला. नगरसेवकांना अपेक्षित ‘मानपान’आज तरी मिळणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादJalanaजालनाVidhan Parishadविधान परिषद