शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

भारनियमन 2 तासांनी घटले; गंगापूर आणि पैठणच्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अंशतः यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 5:32 PM

भारनियमन विरुद्ध सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अंशतः यश आले आहे.

कायगाव (औरंगाबाद ) : गंगापूर आणि पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू असलेल्या भारनियमन विरुद्ध सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अंशतः यश आले आहे. आता १५ मार्च पर्यंत या भागातील वीजपुरवठा दररोज ६ तास सुरू राहणार आहे. याबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या सहाय्यक अधीक्षक अभियंता एस.डी. वैद्य यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन स्पष्ट केले आहे. 

मागील आठ दिवसांपासून गोदावरी नदीच्या काठावरील गंगापूर आणि पैठण तालुक्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना दिवसातून फक्त चार तास वीजपुरवठा सूरु होता. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन सुरू केले होते. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यानाही याबाबत निवेदन देऊन त्वरित वीस तासांचे भारनियमन बंद करून वीजपुरवठा पुर्ववत करण्याची मागणी केली होती. नसता उद्योगांना होणारा जायकवाडीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. यावर विभागीय आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी आणि लाभक्षेत्र प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांत याबाबत चर्चा झाली. त्यानुसार १५ मार्चपर्यंत या भागात वीजपुरवठा ६ तास सुरू ठेवण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना आदेशीत करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. 

दरम्यान प्रशासनाने सहा तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांनी स्वागत केले आहे. मात्र सहा तास वीजपुरवठा होऊनही शेतकऱ्यांना सिंचनाची समस्या कायम राहील त्यामुळे वीजपुरवठा किमान आठ तास सुरू रहावा यासाठी आंदोलन सुरूच राहील असे सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीजgodavariगोदावरी