शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

औरंगाबाद जिल्ह्यात ३४० मुलांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:58 PM

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेंतर्गत सन २०१३ पासून जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल ४७८ मुले हृदयरोगाने त्रस्त असल्याचे निदान झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुढाकाराने यापैकी ३४० मुलांची हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे नवे जीवन मिळाले, तर ७८१ मुलांवर अपेंडिक्स, हार्निया, व्यंग, कान, नाक, घसा, हाडे तसेच किडनीसह अन्य प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे२०१३ पासून : शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी मोहिमेचे फलित

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेंतर्गत सन २०१३ पासून जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल ४७८ मुले हृदयरोगाने त्रस्त असल्याचे निदान झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुढाकाराने यापैकी ३४० मुलांची हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे नवे जीवन मिळाले, तर ७८१ मुलांवर अपेंडिक्स, हार्निया, व्यंग, कान, नाक, घसा, हाडे तसेच किडनीसह अन्य प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे तसेच त्यांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी सन २००८ पासून शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. २०१३ साली या तपासणी मोहिमेचे ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ असे नामांतर झाले. या कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळा अंगणवाडीतील बालकांची, तर एक वेळेस शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. एप्रिल २०१७ ते जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यातील २,७८० शाळांपैकी २,५८१ शाळांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या ५ लाख १३ हजार ७५४ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ९१ हजार ४२० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी १ लाख ३४८ विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले.याशिवाय जिल्ह्यातील ३,४२७ अंगणवाड्यांपैकी जानेवारीअखेरपर्यंत १,९२५ अंगणवाड्यांमधील ०-६ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ३ लाख २० हजार ७५ बालकांपैकी १ लाख ५० हजार ८२५ बालकांची आरोग्य तपासणी झाली. किरकोळ आजारी असलेल्या बालकांपैकी २१ हजार ५४ बालकांवर औषधोपचार करण्यात आले.चालू आर्थिक वर्षातील शालेय आरोग्य तपासणी मोहिमेत ४५ मुले हृदयरोगाने त्रस्त असल्याचे निदान झाले. अधिक निदान करण्यासाठी या मुलांची टूडी इको तपासणी करण्यात आल्यानंतर ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने’च्या माध्यमातून ३२ मुलांपैकी काहींच्या कमलनयन, धूत, एमजीएम हॉस्पिटलमध्ये, तर काहींच्या हृदयावर मुंबई, बंगळुरू येथील हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सन २०१३ पासून जानेवारी अखेरपर्यंत ४७८ हृदयरोगाने त्रस्त आढळून आलेल्या मुलांपैकी ३४० मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ४ हजार ६६० विद्यार्थ्यांना संदर्भित रुग्णसेवेसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ९७७ मुलांवर औषधोपचार करण्यात आले.जिल्ह्यामध्ये ४२ पथके कार्यरत; अंगणवाडी, शाळांमध्ये तपासणीयासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी.एम. गायकवाड म्हणाले की, या मोहिमेंतर्गत जिल्ह्यामध्ये ४२ पथके तैनात करण्यात आलेली असून, एका पथकात महिला व पुरुष, असे दोन डॉक्टर, एक फार्मासिस्ट व एक नर्स यांचा समावेश आहे. अंगणवाडी, शाळांमध्ये जाऊन ही पथके विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करतात.हृदयरोगाने त्रस्त मुलांचे प्रमाण हे आंतरराष्ट्रीय प्रमाणाएवढेच आहे. एक लाख बालकांमागे किमान १० बालके हृदयरोगाने आजारी असतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नेहमी आढळून येणारे आरोग्यविषयक दोष शोधून काढणे, विद्यार्थ्यांमधील आजाराचे व मृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि गंभीर आजारी विद्यार्थ्यांना संदर्भसेवा देणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि आवश्यक वाटल्यास शस्त्रक्रिया करणे, हा या आरोग्य तपासणीचा उद्देश आहे.