शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

चला मिळून काम करू! दोन केंद्रीय, तीन राज्य कॅबिनेट मंत्र्यांमुळे 'अच्छे दिन' दिसतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 13:33 IST

पाच मंत्र्यांमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास होईल

औरंगाबाद: शिंदे सरकारचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबाद जिल्ह्याला झुकते माप मिळाले असून तीन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली असून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच केंद्रातील दोन आणि राज्यातील तीन अशी पाच मंत्रिपदे माझ्या जिल्ह्यात आहेत. यामुळे माझ्या जिल्ह्याला आणि मराठवाड्याला 'अच्छे दिन' येतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर तब्बल ४० दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. शिंदे गट आणि भाजपच्या एकूण १८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. यात जिल्ह्यातून शिंदे गटातील संदीपान भूमरे, अब्दुल सत्तार आणि भाजपकडून अतुल सावे यांचा समावेश आहे. दरम्यान, खासदार जलील यांनी ट्विट करून सर्व मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा विकासाचा अनुशेष दूर करण्याचा सुवर्णकाळ आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी आपण सर्व मिळून काम करू, असेही जलील म्हणाले. तसेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि रावसाहेब दानवे तर राज्य मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे अशी पाच मंत्री माझ्या जिल्ह्यात आहेत. यामुळे जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास होईल, अशी आशा जलील यांनी व्यक्त केली. 

''आता औरंगाबादला पाच मंत्री आहेत - 2 केंद्रीय मंत्री (डॉ. भागवत कराड आणि श्री. रावसाहेब दानवे) आणि 3 राज्य कॅबिनेट मंत्री (श्री. अब्दुल सत्तार, श्री. संदीपान भुमरे आणि श्री. अतुल सावे) आपल्या सर्वांकडून माझ्या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास होईल अशी आशा करूया. माझ्या जिल्हयाला 'अच्छे दिन' बघायला मिळेल, अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे. हा अनुशेष दूर करण्याचा औरंगाबादचा सुवर्णकाळ आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया. सर्व नवीन मंत्र्यांना आमच्या शुभेच्छा !''- इम्तियाज जलील, खासदार, औरंगाबाद

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादAtul Saveअतुल सावेSandeepan Bhoomraसंदीपान भुमरेAbdul Sattarअब्दुल सत्तारraosaheb danveरावसाहेब दानवेBhagwat Karadडॉ. भागवत