शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

चला मिळून काम करू! दोन केंद्रीय, तीन राज्य कॅबिनेट मंत्र्यांमुळे 'अच्छे दिन' दिसतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 13:33 IST

पाच मंत्र्यांमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास होईल

औरंगाबाद: शिंदे सरकारचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबाद जिल्ह्याला झुकते माप मिळाले असून तीन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली असून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच केंद्रातील दोन आणि राज्यातील तीन अशी पाच मंत्रिपदे माझ्या जिल्ह्यात आहेत. यामुळे माझ्या जिल्ह्याला आणि मराठवाड्याला 'अच्छे दिन' येतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर तब्बल ४० दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. शिंदे गट आणि भाजपच्या एकूण १८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. यात जिल्ह्यातून शिंदे गटातील संदीपान भूमरे, अब्दुल सत्तार आणि भाजपकडून अतुल सावे यांचा समावेश आहे. दरम्यान, खासदार जलील यांनी ट्विट करून सर्व मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा विकासाचा अनुशेष दूर करण्याचा सुवर्णकाळ आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी आपण सर्व मिळून काम करू, असेही जलील म्हणाले. तसेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि रावसाहेब दानवे तर राज्य मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे अशी पाच मंत्री माझ्या जिल्ह्यात आहेत. यामुळे जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास होईल, अशी आशा जलील यांनी व्यक्त केली. 

''आता औरंगाबादला पाच मंत्री आहेत - 2 केंद्रीय मंत्री (डॉ. भागवत कराड आणि श्री. रावसाहेब दानवे) आणि 3 राज्य कॅबिनेट मंत्री (श्री. अब्दुल सत्तार, श्री. संदीपान भुमरे आणि श्री. अतुल सावे) आपल्या सर्वांकडून माझ्या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास होईल अशी आशा करूया. माझ्या जिल्हयाला 'अच्छे दिन' बघायला मिळेल, अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे. हा अनुशेष दूर करण्याचा औरंगाबादचा सुवर्णकाळ आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया. सर्व नवीन मंत्र्यांना आमच्या शुभेच्छा !''- इम्तियाज जलील, खासदार, औरंगाबाद

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादAtul Saveअतुल सावेSandeepan Bhoomraसंदीपान भुमरेAbdul Sattarअब्दुल सत्तारraosaheb danveरावसाहेब दानवेBhagwat Karadडॉ. भागवत