शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

होऊ द्या चर्चा! रस्त्यातील खांब काढण्यावरून महावितरण, पीडब्ल्यूडीमध्ये बोंबाबोंब

By विकास राऊत | Updated: October 7, 2023 16:51 IST

शासनाकडून अनुदान येताच महावितरणला देणार, मग ते खांब काढणार

छत्रपती संभाजीनगर : शरणापूर ते साजापूर करोडीपर्यंतच्या ६ किलोमीटर रस्त्याच्या कामात महावितरणचे खांब तसेच ठेवून काँक्रिटीकरण उरकण्याचा सपाटा सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) नेमलेल्या कंत्राटदाराने लावल्यामुळे पीडब्ल्यूडी आणि महावितरणने एकमेकांच्या विरोधात गुरुवारी बोंबाबोंब केली.

‘विजेचे खांब आड आले तरी चालतील;रस्ता बांधा, खांब काढायचे नंतर बघू’ या मथळ्याखाली लोकमतने ५ ऑक्टोबरच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर महावितरणचे मुख्य अभियंता मोरहरी केळे यांनी पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांना मुख्यालयात बोलावून घेतले. पीडब्ल्यूडीने उपअभियंता डी. एस. कांबळे यांना पाठविले. खांब कोण काढणार, यावरून तांत्रिक मुद्द्यांसह चर्चा झाली.रस्त्यात खांब लावण्यापूर्वी महावितरणने विचार करणे गरजेचे होते. अलायनमेंटचा विचार न करता कंपनी मधोमध खांब लावते. त्यामुळे अशा अडचणी तयार होतात.अशी बाजू पीडब्ल्यूडीने मांडली तर कोणत्याही रस्त्याच्या रुंदीकरणानंतर महावितरणचे विद्युत खांब, तारा व रोहित्र स्थलांतरित करण्याची जबाबदारी ते काम करणाऱ्या आस्थापना, खाते, विभागाची असते, अशी भूमिका महावितरणने घेतली.

महावितरण जबाबदार नाहीमहावितरण केवळ संबंधितांना कामाचे अंदाजपत्रक व कामासाठी वीजपुरवठा बंद करून कामाची देखरेख करते. महावितरणची यात कसलीही जबाबदारी नाही. पीडब्ल्यूडीच्या मागणीनुसार शरणापूर ते साजापूर - करोडी रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक १.३ टक्के डीडीएफ योजनेत मंजूर करून महावितरणने त्यांना दिले होते. या कामाच्या देखरेख शुल्काचा भरणा महावितरणकडे त्यांनी केलेला आहे. यानंतर हे काम पीडब्ल्यूडीने ठेकेदाराकडून करून घेणे आवश्यक होते. मात्र, त्यांच्या अंतर्गत कारणांमुळे ते काम रेंगाळले. याला महावितरण जबाबदार नाही.

पीडब्ल्यूडीने पत्र देऊन हात झटकले..महावितरणने रस्त्याच्या मधोमध व दोन्ही बाजूला असलेले डीपीसह १६४ विद्युत खांब तातडीने काढून घ्यावेत. भविष्यात दुर्घटना होऊ नये, यासाठी हे महत्त्वाचे आहे. उजव्या बाजूला ६८ तर डाव्या बाजुला ४ डीपींसह ९८ विजेेचे खांब आहेत. रस्त्याच्या कामात हे खांब अडथळा निर्माण करीत आहेत. त्यामुळे रुंदीकरणाचे काम करण्यात अडचणी येत आहेत. उच्च दाब विद्युत वाहिनीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे पत्र पीडब्ल्यूडीचे उपअभियंता डी. एस. कांबळे यांनी महावितरण ग्रामीण कार्यकारी अभियंत्यांना देऊन खांब काढण्याची जबाबदारी महावितरणचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी सांगितले, कंत्राटामध्ये तरतूद आहे. महिन्याभरात ते खांब काढण्यात येतील.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गmahavitaranमहावितरण