शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

होऊ द्या चर्चा! रस्त्यातील खांब काढण्यावरून महावितरण, पीडब्ल्यूडीमध्ये बोंबाबोंब

By विकास राऊत | Updated: October 7, 2023 16:51 IST

शासनाकडून अनुदान येताच महावितरणला देणार, मग ते खांब काढणार

छत्रपती संभाजीनगर : शरणापूर ते साजापूर करोडीपर्यंतच्या ६ किलोमीटर रस्त्याच्या कामात महावितरणचे खांब तसेच ठेवून काँक्रिटीकरण उरकण्याचा सपाटा सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) नेमलेल्या कंत्राटदाराने लावल्यामुळे पीडब्ल्यूडी आणि महावितरणने एकमेकांच्या विरोधात गुरुवारी बोंबाबोंब केली.

‘विजेचे खांब आड आले तरी चालतील;रस्ता बांधा, खांब काढायचे नंतर बघू’ या मथळ्याखाली लोकमतने ५ ऑक्टोबरच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर महावितरणचे मुख्य अभियंता मोरहरी केळे यांनी पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांना मुख्यालयात बोलावून घेतले. पीडब्ल्यूडीने उपअभियंता डी. एस. कांबळे यांना पाठविले. खांब कोण काढणार, यावरून तांत्रिक मुद्द्यांसह चर्चा झाली.रस्त्यात खांब लावण्यापूर्वी महावितरणने विचार करणे गरजेचे होते. अलायनमेंटचा विचार न करता कंपनी मधोमध खांब लावते. त्यामुळे अशा अडचणी तयार होतात.अशी बाजू पीडब्ल्यूडीने मांडली तर कोणत्याही रस्त्याच्या रुंदीकरणानंतर महावितरणचे विद्युत खांब, तारा व रोहित्र स्थलांतरित करण्याची जबाबदारी ते काम करणाऱ्या आस्थापना, खाते, विभागाची असते, अशी भूमिका महावितरणने घेतली.

महावितरण जबाबदार नाहीमहावितरण केवळ संबंधितांना कामाचे अंदाजपत्रक व कामासाठी वीजपुरवठा बंद करून कामाची देखरेख करते. महावितरणची यात कसलीही जबाबदारी नाही. पीडब्ल्यूडीच्या मागणीनुसार शरणापूर ते साजापूर - करोडी रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक १.३ टक्के डीडीएफ योजनेत मंजूर करून महावितरणने त्यांना दिले होते. या कामाच्या देखरेख शुल्काचा भरणा महावितरणकडे त्यांनी केलेला आहे. यानंतर हे काम पीडब्ल्यूडीने ठेकेदाराकडून करून घेणे आवश्यक होते. मात्र, त्यांच्या अंतर्गत कारणांमुळे ते काम रेंगाळले. याला महावितरण जबाबदार नाही.

पीडब्ल्यूडीने पत्र देऊन हात झटकले..महावितरणने रस्त्याच्या मधोमध व दोन्ही बाजूला असलेले डीपीसह १६४ विद्युत खांब तातडीने काढून घ्यावेत. भविष्यात दुर्घटना होऊ नये, यासाठी हे महत्त्वाचे आहे. उजव्या बाजूला ६८ तर डाव्या बाजुला ४ डीपींसह ९८ विजेेचे खांब आहेत. रस्त्याच्या कामात हे खांब अडथळा निर्माण करीत आहेत. त्यामुळे रुंदीकरणाचे काम करण्यात अडचणी येत आहेत. उच्च दाब विद्युत वाहिनीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे पत्र पीडब्ल्यूडीचे उपअभियंता डी. एस. कांबळे यांनी महावितरण ग्रामीण कार्यकारी अभियंत्यांना देऊन खांब काढण्याची जबाबदारी महावितरणचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी सांगितले, कंत्राटामध्ये तरतूद आहे. महिन्याभरात ते खांब काढण्यात येतील.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गmahavitaranमहावितरण