शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

होऊ द्या चर्चा! रस्त्यातील खांब काढण्यावरून महावितरण, पीडब्ल्यूडीमध्ये बोंबाबोंब

By विकास राऊत | Updated: October 7, 2023 16:51 IST

शासनाकडून अनुदान येताच महावितरणला देणार, मग ते खांब काढणार

छत्रपती संभाजीनगर : शरणापूर ते साजापूर करोडीपर्यंतच्या ६ किलोमीटर रस्त्याच्या कामात महावितरणचे खांब तसेच ठेवून काँक्रिटीकरण उरकण्याचा सपाटा सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) नेमलेल्या कंत्राटदाराने लावल्यामुळे पीडब्ल्यूडी आणि महावितरणने एकमेकांच्या विरोधात गुरुवारी बोंबाबोंब केली.

‘विजेचे खांब आड आले तरी चालतील;रस्ता बांधा, खांब काढायचे नंतर बघू’ या मथळ्याखाली लोकमतने ५ ऑक्टोबरच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर महावितरणचे मुख्य अभियंता मोरहरी केळे यांनी पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांना मुख्यालयात बोलावून घेतले. पीडब्ल्यूडीने उपअभियंता डी. एस. कांबळे यांना पाठविले. खांब कोण काढणार, यावरून तांत्रिक मुद्द्यांसह चर्चा झाली.रस्त्यात खांब लावण्यापूर्वी महावितरणने विचार करणे गरजेचे होते. अलायनमेंटचा विचार न करता कंपनी मधोमध खांब लावते. त्यामुळे अशा अडचणी तयार होतात.अशी बाजू पीडब्ल्यूडीने मांडली तर कोणत्याही रस्त्याच्या रुंदीकरणानंतर महावितरणचे विद्युत खांब, तारा व रोहित्र स्थलांतरित करण्याची जबाबदारी ते काम करणाऱ्या आस्थापना, खाते, विभागाची असते, अशी भूमिका महावितरणने घेतली.

महावितरण जबाबदार नाहीमहावितरण केवळ संबंधितांना कामाचे अंदाजपत्रक व कामासाठी वीजपुरवठा बंद करून कामाची देखरेख करते. महावितरणची यात कसलीही जबाबदारी नाही. पीडब्ल्यूडीच्या मागणीनुसार शरणापूर ते साजापूर - करोडी रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक १.३ टक्के डीडीएफ योजनेत मंजूर करून महावितरणने त्यांना दिले होते. या कामाच्या देखरेख शुल्काचा भरणा महावितरणकडे त्यांनी केलेला आहे. यानंतर हे काम पीडब्ल्यूडीने ठेकेदाराकडून करून घेणे आवश्यक होते. मात्र, त्यांच्या अंतर्गत कारणांमुळे ते काम रेंगाळले. याला महावितरण जबाबदार नाही.

पीडब्ल्यूडीने पत्र देऊन हात झटकले..महावितरणने रस्त्याच्या मधोमध व दोन्ही बाजूला असलेले डीपीसह १६४ विद्युत खांब तातडीने काढून घ्यावेत. भविष्यात दुर्घटना होऊ नये, यासाठी हे महत्त्वाचे आहे. उजव्या बाजूला ६८ तर डाव्या बाजुला ४ डीपींसह ९८ विजेेचे खांब आहेत. रस्त्याच्या कामात हे खांब अडथळा निर्माण करीत आहेत. त्यामुळे रुंदीकरणाचे काम करण्यात अडचणी येत आहेत. उच्च दाब विद्युत वाहिनीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे पत्र पीडब्ल्यूडीचे उपअभियंता डी. एस. कांबळे यांनी महावितरण ग्रामीण कार्यकारी अभियंत्यांना देऊन खांब काढण्याची जबाबदारी महावितरणचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी सांगितले, कंत्राटामध्ये तरतूद आहे. महिन्याभरात ते खांब काढण्यात येतील.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गmahavitaranमहावितरण