शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

जो जे वांछील, ते तो खावो! गरिबांचे अन्न आता श्रीमंतांचे झाल्याने ते महाग बनले: शाहू पाटोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:30 IST

आपल्या खाद्य संस्कृतीची लाज वाटणे, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. ज्यांना जे खायचे, ते खाऊ द्या

छत्रपती संभाजीनगर : ज्वारी, बाजरी, नाचणी, राळे ही तृणधान्ये (मिलेट्स) गरिबांच्या ताटात असत. या तृणधान्यांतील पोषक तत्त्वांचे महत्त्व समजू लागल्याने हॉटेलच्या मेनूमध्ये आता मिलेट्स डिश दिसतात. गरिबांचे हे अन्न आता श्रीमंतांचे झाल्याने ते महाग बनल्याचे प्रतिपादन लेखक शाहू पाटोळे यांनी केले.

वाळूज येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४४ व्या साहित्य संमेलनातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मंचावर लेखक शाहू पाटोळे यांची मुलाखत अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि भूषण कोरगावकर यांनी घेतली. पाटोळे म्हणाले की, पूर्वी ग्रामीण भागात बाराही महिने सर्वांच्या जेवणात रानभाज्या असत. अनेक भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात. करडईचे तेल घरोघरी वापरले जाई. मात्र, आता करडई तेलाचे महत्त्व कळाल्याने या तेलाचे दर चढे असतात. शेतातील तण काढण्यासाठी तणनाशकाचा वापर केला जात असल्याने रानभाज्या दुर्मीळ होत आहेत. आता जो तो चुलीवरचे जेवण पसंत करत आहे. जेव्हा चपला नव्हत्या, तेव्हा पायी जात. आता लोक विनाचपलांचे फिरताना आपण पाहतो. १९७२ च्या दुष्काळाला इष्टापत्ती असल्याचे बोलले जाते. ते कसे, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, दुष्काळात इंदिरा गांधी यांनी माणसे जगविली. तेव्हाच पाम तेल स्वयंपाक घरात आले. प्रथम अस्पृश्य लोक विस्थापित झाले.

जो जे वांछील, ते तो खावो....गोहत्या कायद्याचे रूपांतर आता गोवंश हत्येत झाले. याचा परिणाम मुस्लिमांवर होतो, या दृष्टिकोनातून काही लोक पाहतात. परंतु, तसे नाही. कारण हे खाद्य काही केवळ एकाच समूहाचे नाही. असे असते तर खाटकांकडे हिंदू कॅलेंडर नसते. आपल्या खाद्य संस्कृतीची लाज वाटणे, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. ज्यांना जे खायचे, ते खाऊ द्या, असेही पाटोळे यांनी नमूद केले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरliteratureसाहित्य