शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

जो जे वांछील, ते तो खावो! गरिबांचे अन्न आता श्रीमंतांचे झाल्याने ते महाग बनले: शाहू पाटोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:30 IST

आपल्या खाद्य संस्कृतीची लाज वाटणे, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. ज्यांना जे खायचे, ते खाऊ द्या

छत्रपती संभाजीनगर : ज्वारी, बाजरी, नाचणी, राळे ही तृणधान्ये (मिलेट्स) गरिबांच्या ताटात असत. या तृणधान्यांतील पोषक तत्त्वांचे महत्त्व समजू लागल्याने हॉटेलच्या मेनूमध्ये आता मिलेट्स डिश दिसतात. गरिबांचे हे अन्न आता श्रीमंतांचे झाल्याने ते महाग बनल्याचे प्रतिपादन लेखक शाहू पाटोळे यांनी केले.

वाळूज येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४४ व्या साहित्य संमेलनातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मंचावर लेखक शाहू पाटोळे यांची मुलाखत अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि भूषण कोरगावकर यांनी घेतली. पाटोळे म्हणाले की, पूर्वी ग्रामीण भागात बाराही महिने सर्वांच्या जेवणात रानभाज्या असत. अनेक भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात. करडईचे तेल घरोघरी वापरले जाई. मात्र, आता करडई तेलाचे महत्त्व कळाल्याने या तेलाचे दर चढे असतात. शेतातील तण काढण्यासाठी तणनाशकाचा वापर केला जात असल्याने रानभाज्या दुर्मीळ होत आहेत. आता जो तो चुलीवरचे जेवण पसंत करत आहे. जेव्हा चपला नव्हत्या, तेव्हा पायी जात. आता लोक विनाचपलांचे फिरताना आपण पाहतो. १९७२ च्या दुष्काळाला इष्टापत्ती असल्याचे बोलले जाते. ते कसे, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, दुष्काळात इंदिरा गांधी यांनी माणसे जगविली. तेव्हाच पाम तेल स्वयंपाक घरात आले. प्रथम अस्पृश्य लोक विस्थापित झाले.

जो जे वांछील, ते तो खावो....गोहत्या कायद्याचे रूपांतर आता गोवंश हत्येत झाले. याचा परिणाम मुस्लिमांवर होतो, या दृष्टिकोनातून काही लोक पाहतात. परंतु, तसे नाही. कारण हे खाद्य काही केवळ एकाच समूहाचे नाही. असे असते तर खाटकांकडे हिंदू कॅलेंडर नसते. आपल्या खाद्य संस्कृतीची लाज वाटणे, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. ज्यांना जे खायचे, ते खाऊ द्या, असेही पाटोळे यांनी नमूद केले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरliteratureसाहित्य