शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

रबी पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:02 AM

खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा काढण्यासाठी एकीकडे शेतकºयांनी बँका, तसेच सेतू केंद्रांसमोर दिवसरात्र तळ ठोकला होता. मात्र, फुलंब्री तालुक्यातील शेतकºयांनी यंदा रबी हंगामातील पीक विमा काढण्यासाठी उदासीनता दाखविली आहे.

रऊफ शेखफुलंब्री : खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा काढण्यासाठी एकीकडे शेतकºयांनी बँका, तसेच सेतू केंद्रांसमोर दिवसरात्र तळ ठोकला होता. मात्र, फुलंब्री तालुक्यातील शेतकºयांनी यंदा रबी हंगामातील पीक विमा काढण्यासाठी उदासीनता दाखविली आहे. येथील २२ हजार शेतकºयांपैकी केवळ १,७५० शेतकºयांनी रबी पिकांसाठी विमा काढला असून, याला कारणीभूत यावर्षीचा दुष्काळ असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बळीराजाने विमा काढण्याकडे दुर्लक्ष केल्याने नुकसानही त्यांचेच होणार आहे, असे मत जाणकारांनी व्यक्त केल आहे.तालुक्यात रबी पिके घेणाºया शेतकºयांची संख्या २२ हजारांवर आहे. यावर्षी विविध कारणांमुळे खरीप व रबी पिके धोक्यात आली व त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट झाल्याचे दिसून आले. काही वेळा पिकांची नासाडी झाल्याने बळीराजाला आर्थिक फटका बसला. मात्र, तरीही यावर्षी रबी पिकांच्या विम्याकडे बहुतांश शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे पीक विमा भरण्यासाठी मोठी रक्कम लागत नाही. मात्र, पिकांचे नुकसान झाले, तर मदतीसाठी शासनाकडे मोठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शेतकºयांनी विमा न काढणेच पसंत केले.जाणकारांच्या मते तालुक्यात गत काही वर्षांपासून पर्जन्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीत येथील शेतकºयांनी गतवर्षी काही प्रमाणात पीकविमा काढला होता; पण त्यातून पुरेसा मोबदला मिळाला नसल्याने बळीराजा हताश झाला आहे. याच कारणामुळे त्यांनी विम्याकडे दुर्लक्ष केले. विशेष बाब म्हणजे विमा काढावा यासाठी शासनाने कृषी विभागाकडे जनजागृती करण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी गावोगावी जाऊन पीक विमा संरक्षणाबाबत माहिती दिली. मात्र, त्याचा काहीही फायदा झालेला दिसून येत नाही. विम्याची रक्कम वेळेवर मिळत नाही, बँकेत चकरा माराव्या लागतात, ठरवून देलेली रक्कम मिळत नाही. त्यामुळे विमा न काढणेच पसंत केल्याचे येथील बहुतांश शेतकºयांनी सांगितले.दरम्यान, तालुक्यात रबी पिकाचे क्षेत्र २९ हजार हेक्टर असून, यातील केवळ ८८९ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविण्यात आला. त्यापैकी रबी पिके घेणाºया शेतकºयांची संख्या २२ हजार एवढी आहे. मात्र, २२ हजार शेतकºयांपैकी अवघ्या १,७५० शेतकºयांनी विमा काढला आहे, तर २० हजार शेतकºयांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविली असून, ज्या शेतकºयांनी पीक विमा काढला नाही, असे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात, हे लक्षात असूनही याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले.पीक विमा भरण्यासाठी शेतकºयाला एकूण रकमेच्या केवळ पाच टक्केच रक्कम भरावी लागते. उर्वरित रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून भरतात. त्यामुळे शेतकºयांवर फारसे ओझे पडत नाही. मात्र, असे असतानाही शेतकरी या योजनेकडे दुर्लक्ष करतात. तालुक्यातील शेतकºयांनी रबी हंगाम २०१५-२०१६ मध्ये गहू व हरभºयासाठी विमा काढला होता. मात्र, नुकसान झालेले असताना त्यांना शेतकºयांच्या बियाणांचा खर्चही निघाला नाही. याच परिस्थितीचा अनुभव शेतकºयांना २०१६-२०१७ मध्ये आला होता. त्यामुळे दरवर्षी विमा काढणाºया शेतकºयांची संख्या घटताना दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी