शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

बिबट्या नरभक्षी झाल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन

By | Updated: November 29, 2020 04:05 IST

साहेबराव हिवराळे औरंगाबाद : बिबट्याने आपेगाव व बीड जिल्ह्यात चार जणांवर हल्ला केल्यामुळे तो नरभक्षी झालाय का, असा सवाल ...

साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : बिबट्याने आपेगाव व बीड जिल्ह्यात चार जणांवर हल्ला केल्यामुळे तो नरभक्षी झालाय का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. तर त्याने हल्ला का केला याचे निराकरण करण्यात वन व वन्यजीव विभागाचे पथक कामाला लागले आहे.

बिबट्या केव्हाही मानवावर हल्ला करीत नाही तो दोन पायाच्या माणसाला घाबरतो. परंतु त्यांनी पैठण आणि बीड येथे एकून चार जणांवर हल्ला करून त्यांना मारल्याने त्याचे कारण वनविभाग शोधत आहे. वन्य जीव तसेच वन विभागाचे पथक दोन्ही ठिकाणी ८ ते १० पिंजरे आणि विशेष शोध पथक तैनात करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणच्या घटनांत साम्य आहे. परंतु मानव जेव्हा वाकून शेतात काम करीत असेल तेव्हा बिबट्याच्या डोळ्यात दिसणारे चित्र हे त्याच्या सावजासारखे आणि त्याच्या आवाक्यातील ठरते. मिरची तोडत असताना पैठणचा हल्ला त्याला वाचविण्यासाठी आलेल्या पित्यालाही त्यावेळी त्याने ठार केले. घटना घडल्यानंतर बीड जिल्ह्यातही झालेला हल्ल्यात दोन गंभीर प्रसंग असे दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत घडलेल्या चार घटनांमुळे शेतकरी घाबरलेले आहेत. तो प्रत्यक्ष वन विभागाच्या पथकाला सापडत नाही तोपर्यंत सर्वांनी खबरदार घेणे गरजेचे आहे.

काही सांगता येत नाही...

बिबट्या हा मानवावर कधीच हल्ला करीत नाही परंतु त्याच्या आवाक्यातील सावज असल्यास तो त्याचे भक्ष्य समजून हल्ला करू शकतो. अन्यथा तो मानवाची चाहूल पाहून पळून जातो. मानवी वस्तीच्या आसपास तो सातत्याने राहत असल्याने तो मानसाळलेला असतो. त्याने हल्ला का केला हे शोधणे गरजेचे आहे.

- विद्या आत्रेय (वन जीव अभ्यासक)

जनतेनी सहकार्य करावे, टीम शोधात आहेत

बिबट्या नरभक्षक झाला असे म्हणता येत नाही, कारण त्याच्या सावजाआड आल्यामुळे हा प्रकार घडला असावा, ज्या घटना घडल्या त्या ठिकाणी आवश्यक स्टाॅफ तैनात करण्यात आला आहे. पिंजरे तसेच गस्त वाढविलेली आहे. वन्य जीव तसेच वन विभाग कामाला लागलेले आहे. एकटे घराबाहेर जाऊ नये, लहान मुलांना अधिक जपावे, जनतेनीही सहकार्य करावे, आम्ही शोध घेत आहोत.

- प्रकाश महाजन (मुख्य वनसंरक्षक )