शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

बिबट्या नरभक्षी झाल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन

By | Updated: November 29, 2020 04:05 IST

साहेबराव हिवराळे औरंगाबाद : बिबट्याने आपेगाव व बीड जिल्ह्यात चार जणांवर हल्ला केल्यामुळे तो नरभक्षी झालाय का, असा सवाल ...

साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : बिबट्याने आपेगाव व बीड जिल्ह्यात चार जणांवर हल्ला केल्यामुळे तो नरभक्षी झालाय का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. तर त्याने हल्ला का केला याचे निराकरण करण्यात वन व वन्यजीव विभागाचे पथक कामाला लागले आहे.

बिबट्या केव्हाही मानवावर हल्ला करीत नाही तो दोन पायाच्या माणसाला घाबरतो. परंतु त्यांनी पैठण आणि बीड येथे एकून चार जणांवर हल्ला करून त्यांना मारल्याने त्याचे कारण वनविभाग शोधत आहे. वन्य जीव तसेच वन विभागाचे पथक दोन्ही ठिकाणी ८ ते १० पिंजरे आणि विशेष शोध पथक तैनात करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणच्या घटनांत साम्य आहे. परंतु मानव जेव्हा वाकून शेतात काम करीत असेल तेव्हा बिबट्याच्या डोळ्यात दिसणारे चित्र हे त्याच्या सावजासारखे आणि त्याच्या आवाक्यातील ठरते. मिरची तोडत असताना पैठणचा हल्ला त्याला वाचविण्यासाठी आलेल्या पित्यालाही त्यावेळी त्याने ठार केले. घटना घडल्यानंतर बीड जिल्ह्यातही झालेला हल्ल्यात दोन गंभीर प्रसंग असे दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत घडलेल्या चार घटनांमुळे शेतकरी घाबरलेले आहेत. तो प्रत्यक्ष वन विभागाच्या पथकाला सापडत नाही तोपर्यंत सर्वांनी खबरदार घेणे गरजेचे आहे.

काही सांगता येत नाही...

बिबट्या हा मानवावर कधीच हल्ला करीत नाही परंतु त्याच्या आवाक्यातील सावज असल्यास तो त्याचे भक्ष्य समजून हल्ला करू शकतो. अन्यथा तो मानवाची चाहूल पाहून पळून जातो. मानवी वस्तीच्या आसपास तो सातत्याने राहत असल्याने तो मानसाळलेला असतो. त्याने हल्ला का केला हे शोधणे गरजेचे आहे.

- विद्या आत्रेय (वन जीव अभ्यासक)

जनतेनी सहकार्य करावे, टीम शोधात आहेत

बिबट्या नरभक्षक झाला असे म्हणता येत नाही, कारण त्याच्या सावजाआड आल्यामुळे हा प्रकार घडला असावा, ज्या घटना घडल्या त्या ठिकाणी आवश्यक स्टाॅफ तैनात करण्यात आला आहे. पिंजरे तसेच गस्त वाढविलेली आहे. वन्य जीव तसेच वन विभाग कामाला लागलेले आहे. एकटे घराबाहेर जाऊ नये, लहान मुलांना अधिक जपावे, जनतेनीही सहकार्य करावे, आम्ही शोध घेत आहोत.

- प्रकाश महाजन (मुख्य वनसंरक्षक )