शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रानमेवा महागला ! सफरचंदापेक्षाही आंबट, गोड गावरान बोरं महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 12:30 IST

दिवाळी संपली की, थंडीला सुरुवात होते व गावरान बोरं विक्रीला येतात.

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : आंबट, गोड असा स्वाद असलेला रानमेवा म्हणून सर्वपरिचित गावरान बोरांना एवढा भाव चढला आहे की, सध्या सफरचंदापेक्षाही ती महाग आहेत. बाजारात सफरचंद १०० रुपये किलो, तर गावरान बोरं १२० रुपये किलोपर्यंत विकली जात आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात डोंगर रांगात, नाला काठेला, शेतात बोरांची असंख्य झाडे आहेत. दिवाळी संपली की, थंडीला सुरुवात होते व गावरान बोरं विक्रीला येतात. टोपलीत रचून ठेवलेली बारीक लाल, हिरवी बोरं, काही जास्त पिकलेली बोरं खाण्यास आंबट-गोड लागत असल्याने तेवढ्याच चवीने खाल्ली जातात. तरुणी, महिलांना गावरान बोरं जास्तच आवडतात. ग्रामीण भागातील महिला, पुरुष डोंगररांगात, वनराईत फिरून बोरं वेचून आणतात व विकतात. अनेकांनी शेतातही बोराची झाडे लावली आहेत. बोेरांचे आयुर्वेदात मोठे महत्त्व आहे. यामुळे आता बोर खाण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. बोर वाळवून त्याचे ‘लब्दू’ तयार केले जातात. सध्या सुरुवातीला बोरांची आवक कमी असल्याने भावाने शंभरी पार केली आहे. मात्र डिसेंबर महिन्यात भाव कमी होतील. सध्या तरी सफरचंदापेक्षा जास्त भाव बोराला मिळत आहे.

बोरन्हाणाची परंपरा१ ते ५ वर्षे वयाच्या बाळांना बोरन्हाण घातले जाते. कमी वजनाची बोरे टणाटण पडल्याने डोक्यातील प्रेशर पॉइंट्स सक्रिय होतात, असे यामागचे शास्त्रीय कारण सांगितले जाते. यामुळे सुरुवातीला गावरान बोरांचे भाव चढलेले असतात.

यंदा चमेली बोरांची आवक कमीगावरान बोरांआधी मोठ्या आकारातील चमेली बोरं बाजारात येत असतात. मात्र यंदा अपेक्षेनुसार या बोरांची आवक वाढली नाही. जळगाव, सोलापूर या भागांतूनही बोरं येतात. सध्या ४० ते ५० रुपये किलोने ही बोरं मिळत आहेत.

शेतात बोरांच्या झाडांचे प्रमाण वाढलेमध्यंतरी चमेली बोरांना मोठी मागणी असे. पण हे बोर चवीला पांचट लागत असल्याने आता ग्राहक पुन्हा गावरान बोरांकडे वळले आहेत. यामुळे अनेकांनी शेतात गावरान बोरांची झाडे लावली आहेत. बोरकूटसाठीही बोरांना मागणी असते. यंदा पोषक वातावरणामुळे बोरांचे उत्पादन भरपूर आहे.- संजय पाटील (कृषी शास्त्रज्ञ )

सुरुवातीला चांगला भावआता १००च्या पुढे भाव असला तरी महिनाभरात ८० रुपये किलोपर्यंत भाव उतरेल. बोरांची झाडे सर्वत्र असतात; फक्त वेचण्याचे परिश्रम घ्यावे लागतात.- सय्यद पठाण, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीfruitsफळेAurangabadऔरंगाबाद