शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकार दलालीत हरवले: देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 15:06 IST

मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर गेल्या 2 वर्षांत अनेक अडचणी आल्या मात्र या सरकारने एक पैशांची मदत केली नाही

औरंगाबाद : प्रत्येक अडचणीत शेतकऱ्यास आमच्या काळात पैसे मिळत होते. आता मात्र शेतकऱ्यांवर कोणी बोलत नाही, त्यांची वीज कापली जाते. रोज उठून पोपटपंची करायची, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचे नाही. शेतकरी संकटात असताना सरकार कुठे आहे ? राज्य सरकार मुंबईतील उंच इमारतीत दलाली करण्यात हरवले आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आज लासूर येथे केली. 

लासुर येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते १२० कोटींच्या विकास कामांचा उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या मेळाव्यात महिला बचत गट आणि दिव्यांग कामगारांना मदत देण्यात आली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मोदी सरकारने गोरगरिबांसाठी काय केले हे सांगत राज्य सरकारवर निशाण साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. ते म्हणाले, खूप दिल असे म्हणाऱ्यांच्या फक्त भाषणात मराठवाडा आहे, ते फक्त नाव वापरतात. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचा या सरकारनें खून केला, कवच कुंडल काढून घेतली. आम्ही दुष्काळ मुक्त मराठवाड्याचे स्वप्न पाहिले होते, शेतकरी हताश होता, तेव्हा आम्ही मराठवाडा ग्रीड पाणी योजना आणली. समुद्रात वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणणार होतो, मात्र या सरकारने 'स्लो पॉयझन' देऊन ती योजना संपवली. औरंगाबादने शिवसेनेला ओळख दिली, या शहरासाठी 1680 कोटींची पाणी योजना आम्ही दिली होती, मात्र सरकार बदलले आणि यांनी निर्णय बदलला. साधं पाणी हे लोक शहराला देत नाहीत, अशी खरमरीत टीकाही यावेळी फडणवीस यांनी केली. 

राज्य सरकार दलाली करण्यात व्यस्त मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर गेल्या 2 वर्षांत अनेक अडचणी आल्या मात्र या सरकारने एक पैशांची मदत केली नाही... आता सरकार कुठं आहे कळत नाही मुंबईच्या मोठ्या इमारतीत , तिथल्या दलाली करण्यात सरकार हरवलं आहे... याना मराठवाड्यातील शेतकरी दिसत नाही. ही लोक शेतकऱ्यांची वीज कापताय आणि मोठ्यांना सोडतात. आपल्या सरकारने एका शेतकऱ्याची सुद्धा वीज कापली नाही. मात्र यांचं मंत्री म्हणतात वीज वापरली बिल भरावे लागेल आणि दुसरीकडे सगळ्या मंत्र्यांना मात्र फुकट वीज मिळते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेMarathwadaमराठवाडा