शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकार दलालीत हरवले: देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 15:06 IST

मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर गेल्या 2 वर्षांत अनेक अडचणी आल्या मात्र या सरकारने एक पैशांची मदत केली नाही

औरंगाबाद : प्रत्येक अडचणीत शेतकऱ्यास आमच्या काळात पैसे मिळत होते. आता मात्र शेतकऱ्यांवर कोणी बोलत नाही, त्यांची वीज कापली जाते. रोज उठून पोपटपंची करायची, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचे नाही. शेतकरी संकटात असताना सरकार कुठे आहे ? राज्य सरकार मुंबईतील उंच इमारतीत दलाली करण्यात हरवले आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आज लासूर येथे केली. 

लासुर येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते १२० कोटींच्या विकास कामांचा उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या मेळाव्यात महिला बचत गट आणि दिव्यांग कामगारांना मदत देण्यात आली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मोदी सरकारने गोरगरिबांसाठी काय केले हे सांगत राज्य सरकारवर निशाण साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. ते म्हणाले, खूप दिल असे म्हणाऱ्यांच्या फक्त भाषणात मराठवाडा आहे, ते फक्त नाव वापरतात. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचा या सरकारनें खून केला, कवच कुंडल काढून घेतली. आम्ही दुष्काळ मुक्त मराठवाड्याचे स्वप्न पाहिले होते, शेतकरी हताश होता, तेव्हा आम्ही मराठवाडा ग्रीड पाणी योजना आणली. समुद्रात वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणणार होतो, मात्र या सरकारने 'स्लो पॉयझन' देऊन ती योजना संपवली. औरंगाबादने शिवसेनेला ओळख दिली, या शहरासाठी 1680 कोटींची पाणी योजना आम्ही दिली होती, मात्र सरकार बदलले आणि यांनी निर्णय बदलला. साधं पाणी हे लोक शहराला देत नाहीत, अशी खरमरीत टीकाही यावेळी फडणवीस यांनी केली. 

राज्य सरकार दलाली करण्यात व्यस्त मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर गेल्या 2 वर्षांत अनेक अडचणी आल्या मात्र या सरकारने एक पैशांची मदत केली नाही... आता सरकार कुठं आहे कळत नाही मुंबईच्या मोठ्या इमारतीत , तिथल्या दलाली करण्यात सरकार हरवलं आहे... याना मराठवाड्यातील शेतकरी दिसत नाही. ही लोक शेतकऱ्यांची वीज कापताय आणि मोठ्यांना सोडतात. आपल्या सरकारने एका शेतकऱ्याची सुद्धा वीज कापली नाही. मात्र यांचं मंत्री म्हणतात वीज वापरली बिल भरावे लागेल आणि दुसरीकडे सगळ्या मंत्र्यांना मात्र फुकट वीज मिळते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेMarathwadaमराठवाडा