शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

नेत्यांनाे, सांगा आमची तहान कधी भागणार? छत्रपती संभाजीनगरात जलसंकट गडद

By मुजीब देवणीकर | Updated: April 11, 2024 17:35 IST

पीपल्स मॅनिफेस्टो: नेत्यांचे विजयी गुढी उभारण्यासाठी प्रयत्न; नागरिकांचा मात्र शिमगा

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीनिमित्त सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विजयाची गुढी उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या राजकीय गदारोळात शहरातील १८ लाखांहून अधिक नागरिकांची तहान कोण भागविणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शहराला एक दिवसाआड पाणी मिळावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च केले, तरीही त्यांचा काहीच उपयोग झालेला नाही. आजही विविध वसाहतींना आठ ते दहा दिवसांतून एकदाच पाणी मिळत आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्य, केंद्र शासनाने २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजूरी दिली. त्यानंतर शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ-मोठे होर्डिंग लावले. आपल्या नेत्याला ‘जलसम्राट’ अशी पदवीही देऊन टाकली. स्मार्ट सिटी कार्यालयात वारंवार पाण्यासाठी बैठका घेतल्या. प्रत्येक बैठकीत एकच आग्रह होता, लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरात मुबलक प्रमाणात पाणी आले पाहिजे. राजकीय नेत्यांच्या दबावातून मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी देखील २० फेब्रुवारीपासून शहरात ७५ एमएलडी मुबलक पाणी येईल, शहरला एक किंवा दोन दिवसांड पाणी देण्याची घोषणाही केली. प्रत्यक्षात एप्रिलचा पहिला आठवडा उलटला तरी पाण्यासाठी शिमगा सुरूच आहे. ऐन पाडव्याच्या दिवशीही मनपा शहराला पाणी देऊ शकली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

२०० कोटी खर्च केले तरी...यंदाच्या उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवू नये म्हणून युद्धपातळीवर २०० कोटी रुपयांची जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्यात आली. ७५ एमएलडी पाणी या जलवाहिनीतून मिळेल असे घोषित केले होते. आज प्रत्यक्षात ८ ते १० एमएलडी पाणी जलवाहिनीतून घेण्यात येत आहे. कारण काय तर फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात वाढीव पाणी शुद्ध करण्याची क्षमता नाही. येथे आणखी एक जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे, त्याचे काम म्हणे जूनमध्ये पूर्ण होईल.

शहराची गरज अन् वस्तुस्थिती७०० आणि १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे सध्या शहराला दररोज ११५ ते १२० एमएलडी पाणी येत आहे. आठ ते दहा दिवसांतून एकदा विविध वसाहतींना अत्यल्प पाणीपुरवठा केला जातोय. शहराला दररोज २३० एमएलडी पाण्याची गरज आहे. एवढे पाणी आले तरच एक दिवसाआड शहराला पाणी मिळेल.

हर्सूल येथे ४ कोटींचा खर्चयंदा उन्हाळ्यात हर्सूल तलावातून जास्त पाणी उपसा करून जुन्या शहराला पाणी देण्यासाठी ४ कोटी रुपये खर्च करून नवीन जलशुद्धीकरण केंद्रही उभारले. या केंद्राची चाचणी घेण्याची वेळ आठ दिवसांपूर्वी आली तेव्हा तलावात मुबलक पाणीच नसल्याचे लक्षात आले. हा चार कोटींचा खर्चही पाण्यात गेल्यासारखी स्थिती आज तरी आहे.

नवीन योजना २०२५ मध्ये२७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले. योजना पूर्ण होऊन शहरात पाणी येण्यासाठी किमान मार्च २०२५ तरी उजडेल असे वाटत आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर शहराला तूर्त २५० एमएलडी पाणी येईल.

अडचण काय हे विचारूयंदा उन्हाळ्यात शहराला त्रास होऊ नये म्हणून ९०० मिमीची जलवाहिनी टाकली. ७५ एमएलडी पाणी यातून येणे अपेक्षित आहे. नेमके पाणी वाढवून का येत नाही, हे अधिकाऱ्यांना विचारले जाईल.- अतुल सावे, गृहनिर्माणमंत्री, भाजप.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४