शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

नेत्यांनाे, सांगा आमची तहान कधी भागणार? छत्रपती संभाजीनगरात जलसंकट गडद

By मुजीब देवणीकर | Updated: April 11, 2024 17:35 IST

पीपल्स मॅनिफेस्टो: नेत्यांचे विजयी गुढी उभारण्यासाठी प्रयत्न; नागरिकांचा मात्र शिमगा

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीनिमित्त सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विजयाची गुढी उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या राजकीय गदारोळात शहरातील १८ लाखांहून अधिक नागरिकांची तहान कोण भागविणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शहराला एक दिवसाआड पाणी मिळावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च केले, तरीही त्यांचा काहीच उपयोग झालेला नाही. आजही विविध वसाहतींना आठ ते दहा दिवसांतून एकदाच पाणी मिळत आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्य, केंद्र शासनाने २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजूरी दिली. त्यानंतर शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ-मोठे होर्डिंग लावले. आपल्या नेत्याला ‘जलसम्राट’ अशी पदवीही देऊन टाकली. स्मार्ट सिटी कार्यालयात वारंवार पाण्यासाठी बैठका घेतल्या. प्रत्येक बैठकीत एकच आग्रह होता, लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरात मुबलक प्रमाणात पाणी आले पाहिजे. राजकीय नेत्यांच्या दबावातून मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी देखील २० फेब्रुवारीपासून शहरात ७५ एमएलडी मुबलक पाणी येईल, शहरला एक किंवा दोन दिवसांड पाणी देण्याची घोषणाही केली. प्रत्यक्षात एप्रिलचा पहिला आठवडा उलटला तरी पाण्यासाठी शिमगा सुरूच आहे. ऐन पाडव्याच्या दिवशीही मनपा शहराला पाणी देऊ शकली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

२०० कोटी खर्च केले तरी...यंदाच्या उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवू नये म्हणून युद्धपातळीवर २०० कोटी रुपयांची जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्यात आली. ७५ एमएलडी पाणी या जलवाहिनीतून मिळेल असे घोषित केले होते. आज प्रत्यक्षात ८ ते १० एमएलडी पाणी जलवाहिनीतून घेण्यात येत आहे. कारण काय तर फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात वाढीव पाणी शुद्ध करण्याची क्षमता नाही. येथे आणखी एक जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे, त्याचे काम म्हणे जूनमध्ये पूर्ण होईल.

शहराची गरज अन् वस्तुस्थिती७०० आणि १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे सध्या शहराला दररोज ११५ ते १२० एमएलडी पाणी येत आहे. आठ ते दहा दिवसांतून एकदा विविध वसाहतींना अत्यल्प पाणीपुरवठा केला जातोय. शहराला दररोज २३० एमएलडी पाण्याची गरज आहे. एवढे पाणी आले तरच एक दिवसाआड शहराला पाणी मिळेल.

हर्सूल येथे ४ कोटींचा खर्चयंदा उन्हाळ्यात हर्सूल तलावातून जास्त पाणी उपसा करून जुन्या शहराला पाणी देण्यासाठी ४ कोटी रुपये खर्च करून नवीन जलशुद्धीकरण केंद्रही उभारले. या केंद्राची चाचणी घेण्याची वेळ आठ दिवसांपूर्वी आली तेव्हा तलावात मुबलक पाणीच नसल्याचे लक्षात आले. हा चार कोटींचा खर्चही पाण्यात गेल्यासारखी स्थिती आज तरी आहे.

नवीन योजना २०२५ मध्ये२७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले. योजना पूर्ण होऊन शहरात पाणी येण्यासाठी किमान मार्च २०२५ तरी उजडेल असे वाटत आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर शहराला तूर्त २५० एमएलडी पाणी येईल.

अडचण काय हे विचारूयंदा उन्हाळ्यात शहराला त्रास होऊ नये म्हणून ९०० मिमीची जलवाहिनी टाकली. ७५ एमएलडी पाणी यातून येणे अपेक्षित आहे. नेमके पाणी वाढवून का येत नाही, हे अधिकाऱ्यांना विचारले जाईल.- अतुल सावे, गृहनिर्माणमंत्री, भाजप.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४