शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनाे, सांगा आमची तहान कधी भागणार? छत्रपती संभाजीनगरात जलसंकट गडद

By मुजीब देवणीकर | Updated: April 11, 2024 17:35 IST

पीपल्स मॅनिफेस्टो: नेत्यांचे विजयी गुढी उभारण्यासाठी प्रयत्न; नागरिकांचा मात्र शिमगा

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीनिमित्त सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विजयाची गुढी उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या राजकीय गदारोळात शहरातील १८ लाखांहून अधिक नागरिकांची तहान कोण भागविणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शहराला एक दिवसाआड पाणी मिळावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च केले, तरीही त्यांचा काहीच उपयोग झालेला नाही. आजही विविध वसाहतींना आठ ते दहा दिवसांतून एकदाच पाणी मिळत आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्य, केंद्र शासनाने २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजूरी दिली. त्यानंतर शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ-मोठे होर्डिंग लावले. आपल्या नेत्याला ‘जलसम्राट’ अशी पदवीही देऊन टाकली. स्मार्ट सिटी कार्यालयात वारंवार पाण्यासाठी बैठका घेतल्या. प्रत्येक बैठकीत एकच आग्रह होता, लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरात मुबलक प्रमाणात पाणी आले पाहिजे. राजकीय नेत्यांच्या दबावातून मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी देखील २० फेब्रुवारीपासून शहरात ७५ एमएलडी मुबलक पाणी येईल, शहरला एक किंवा दोन दिवसांड पाणी देण्याची घोषणाही केली. प्रत्यक्षात एप्रिलचा पहिला आठवडा उलटला तरी पाण्यासाठी शिमगा सुरूच आहे. ऐन पाडव्याच्या दिवशीही मनपा शहराला पाणी देऊ शकली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

२०० कोटी खर्च केले तरी...यंदाच्या उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवू नये म्हणून युद्धपातळीवर २०० कोटी रुपयांची जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्यात आली. ७५ एमएलडी पाणी या जलवाहिनीतून मिळेल असे घोषित केले होते. आज प्रत्यक्षात ८ ते १० एमएलडी पाणी जलवाहिनीतून घेण्यात येत आहे. कारण काय तर फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात वाढीव पाणी शुद्ध करण्याची क्षमता नाही. येथे आणखी एक जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे, त्याचे काम म्हणे जूनमध्ये पूर्ण होईल.

शहराची गरज अन् वस्तुस्थिती७०० आणि १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे सध्या शहराला दररोज ११५ ते १२० एमएलडी पाणी येत आहे. आठ ते दहा दिवसांतून एकदा विविध वसाहतींना अत्यल्प पाणीपुरवठा केला जातोय. शहराला दररोज २३० एमएलडी पाण्याची गरज आहे. एवढे पाणी आले तरच एक दिवसाआड शहराला पाणी मिळेल.

हर्सूल येथे ४ कोटींचा खर्चयंदा उन्हाळ्यात हर्सूल तलावातून जास्त पाणी उपसा करून जुन्या शहराला पाणी देण्यासाठी ४ कोटी रुपये खर्च करून नवीन जलशुद्धीकरण केंद्रही उभारले. या केंद्राची चाचणी घेण्याची वेळ आठ दिवसांपूर्वी आली तेव्हा तलावात मुबलक पाणीच नसल्याचे लक्षात आले. हा चार कोटींचा खर्चही पाण्यात गेल्यासारखी स्थिती आज तरी आहे.

नवीन योजना २०२५ मध्ये२७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले. योजना पूर्ण होऊन शहरात पाणी येण्यासाठी किमान मार्च २०२५ तरी उजडेल असे वाटत आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर शहराला तूर्त २५० एमएलडी पाणी येईल.

अडचण काय हे विचारूयंदा उन्हाळ्यात शहराला त्रास होऊ नये म्हणून ९०० मिमीची जलवाहिनी टाकली. ७५ एमएलडी पाणी यातून येणे अपेक्षित आहे. नेमके पाणी वाढवून का येत नाही, हे अधिकाऱ्यांना विचारले जाईल.- अतुल सावे, गृहनिर्माणमंत्री, भाजप.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४