शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महापालिका निवडणुकीसाठी नेत्यांची पावले महाविकास आघाडीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 19:52 IST

तीनही पक्षांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची आघाडी करून निवडणूक लढविण्याची मानसिकता

ठळक मुद्देमहापालिकेसाठी नक्की फार्म्युला ठरला नाही जागा वाटपात काँग्रेसला अधिक जागांची अपेक्षा

-  स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : यावेळी मनपाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वेगळेवेगळे लढण्याची शक्यता कमी दिसते. तीनही पक्षांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची आघाडी करून निवडणूक लढविण्याची मानसिकता असली तरी काँग्रेसला एकूण जागांमध्ये चांगल्या जागा हव्या आहेत. सध्या वॉर्डांवरच्या हरकती व आक्षेपांच्या  सुनावणीकडे सर्वच पक्षांचे लक्ष असून, त्यानंतर राजकीय हालचालींना वेग येईल.

येत्या २० फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर हे औरंगाबादला येत आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग येईल. अलीकडेच घोसाळकर यांनी महाविकास आघाडीच्या दृष्टीने एक पाऊल उचलून महापौर बंगल्यावर तीनही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सध्या शिवसेनेचे ३० नगरसेवक आहेत. काँग्रेसचे ११ आणि राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक आहेत. एवढ्या जागा ज्या त्या पक्षाच्या शाबूत राहतील. ज्या वॉर्डात दोन नंबरवर जे पक्ष राहिले, त्याही जागा त्या- त्या पक्षाला द्याव्यात, असा फार्म्युला घोसाळकर यांनी मांडला होता. मात्र काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार यांना हा फार्म्युला मान्य नाही. २०१५ साली मनपाची निवडणूक झाली. आता २०२० मध्ये परिस्थिती खूप बदलली आहे. त्यामुळे त्या- त्या वॉर्डात ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासारखा असेल, त्याला ती जागा सोडण्यात यावी. काँग्रेसला सन्मानपूर्वक ५० टक्के जागा मिळाव्यात, असा आग्रह पवार यांनी धरला. नक्की फार्म्युला अद्याप ठरलेला नाही. तो तीनही पक्षांचे श्रेष्ठीच ठरवतील. 

६५ वॉर्डांत समित्या तयारमनपा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून गती वाढविली आहे. मुंबईत प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात                    यांनी घेतलेल्या बैठकीत प्रत्येक वॉर्डात अकरा जणांची एक समिती स्थापन करण्याचे ठरले होते. त्यानुसार आतापर्यंत एकूण ६५ वॉर्डांमध्ये अकरा जणांच्या समित्या स्थापन झाल्या आहेत. उरलेल्या वॉर्डांत लवकरच या समित्या अस्तित्वात येतील, असे पवार यांनी सांगितले. गेल्या १३ फेबु्रवारीपासून काँग्रेसने इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्जांचे वाटप सुरू केले आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत हे अर्ज वाटप केले जातील. गांधी भवन आणि शहराध्यक्षांचे कार्यालय, निराला बाजार येथून आतापर्यंत ३० अर्जांचे वाटप झालेले आहे. वॉर्डांच्या हरकती व आक्षेपांच्या सुनावणीमुळे व आज रविवार असल्यामुळे अर्जांचे वाटप होऊ शकले नाही. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी सांगितले की, मनपा निवडणुकीत महाविकास आघाडी करण्यासाठी प्रत्येक पक्षाने एक समिती स्थापन करण्याचे ठरले आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अशी समिती स्थापन करणार आहे. काँग्रेसही करील. राष्ट्रवादी काँग्रेसही उमेदवारी अर्ज मागवून घेणार आहेत. एक दोन दिवसांत या कामाला गती मिळेल. 

भाजपला खिंडार पडेलमहापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर २० फेब्रुवारी रोजी औरंगाबादला येत आहेत. दरम्यान भाजपला मोठे खिंडार पडणार आहे. गजानन बारवाल यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून शिवसेना प्रवेशाचे संकेत दिलेले आहेत. अन्य मंडळीही वाटेवर आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांची मानसिकता महाविकास आघाडी करून मनपा निवडणूक लढवावी, अशी झालेली आहे. नक्की फार्म्युला तीनही पक्षांच्या श्रेष्ठींच्या बैठकीत ठरेल, असे घोडेले यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक