शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

महापालिका निवडणुकीसाठी नेत्यांची पावले महाविकास आघाडीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 19:52 IST

तीनही पक्षांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची आघाडी करून निवडणूक लढविण्याची मानसिकता

ठळक मुद्देमहापालिकेसाठी नक्की फार्म्युला ठरला नाही जागा वाटपात काँग्रेसला अधिक जागांची अपेक्षा

-  स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : यावेळी मनपाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वेगळेवेगळे लढण्याची शक्यता कमी दिसते. तीनही पक्षांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची आघाडी करून निवडणूक लढविण्याची मानसिकता असली तरी काँग्रेसला एकूण जागांमध्ये चांगल्या जागा हव्या आहेत. सध्या वॉर्डांवरच्या हरकती व आक्षेपांच्या  सुनावणीकडे सर्वच पक्षांचे लक्ष असून, त्यानंतर राजकीय हालचालींना वेग येईल.

येत्या २० फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर हे औरंगाबादला येत आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग येईल. अलीकडेच घोसाळकर यांनी महाविकास आघाडीच्या दृष्टीने एक पाऊल उचलून महापौर बंगल्यावर तीनही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सध्या शिवसेनेचे ३० नगरसेवक आहेत. काँग्रेसचे ११ आणि राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक आहेत. एवढ्या जागा ज्या त्या पक्षाच्या शाबूत राहतील. ज्या वॉर्डात दोन नंबरवर जे पक्ष राहिले, त्याही जागा त्या- त्या पक्षाला द्याव्यात, असा फार्म्युला घोसाळकर यांनी मांडला होता. मात्र काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार यांना हा फार्म्युला मान्य नाही. २०१५ साली मनपाची निवडणूक झाली. आता २०२० मध्ये परिस्थिती खूप बदलली आहे. त्यामुळे त्या- त्या वॉर्डात ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासारखा असेल, त्याला ती जागा सोडण्यात यावी. काँग्रेसला सन्मानपूर्वक ५० टक्के जागा मिळाव्यात, असा आग्रह पवार यांनी धरला. नक्की फार्म्युला अद्याप ठरलेला नाही. तो तीनही पक्षांचे श्रेष्ठीच ठरवतील. 

६५ वॉर्डांत समित्या तयारमनपा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून गती वाढविली आहे. मुंबईत प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात                    यांनी घेतलेल्या बैठकीत प्रत्येक वॉर्डात अकरा जणांची एक समिती स्थापन करण्याचे ठरले होते. त्यानुसार आतापर्यंत एकूण ६५ वॉर्डांमध्ये अकरा जणांच्या समित्या स्थापन झाल्या आहेत. उरलेल्या वॉर्डांत लवकरच या समित्या अस्तित्वात येतील, असे पवार यांनी सांगितले. गेल्या १३ फेबु्रवारीपासून काँग्रेसने इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्जांचे वाटप सुरू केले आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत हे अर्ज वाटप केले जातील. गांधी भवन आणि शहराध्यक्षांचे कार्यालय, निराला बाजार येथून आतापर्यंत ३० अर्जांचे वाटप झालेले आहे. वॉर्डांच्या हरकती व आक्षेपांच्या सुनावणीमुळे व आज रविवार असल्यामुळे अर्जांचे वाटप होऊ शकले नाही. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी सांगितले की, मनपा निवडणुकीत महाविकास आघाडी करण्यासाठी प्रत्येक पक्षाने एक समिती स्थापन करण्याचे ठरले आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अशी समिती स्थापन करणार आहे. काँग्रेसही करील. राष्ट्रवादी काँग्रेसही उमेदवारी अर्ज मागवून घेणार आहेत. एक दोन दिवसांत या कामाला गती मिळेल. 

भाजपला खिंडार पडेलमहापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर २० फेब्रुवारी रोजी औरंगाबादला येत आहेत. दरम्यान भाजपला मोठे खिंडार पडणार आहे. गजानन बारवाल यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून शिवसेना प्रवेशाचे संकेत दिलेले आहेत. अन्य मंडळीही वाटेवर आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांची मानसिकता महाविकास आघाडी करून मनपा निवडणूक लढवावी, अशी झालेली आहे. नक्की फार्म्युला तीनही पक्षांच्या श्रेष्ठींच्या बैठकीत ठरेल, असे घोडेले यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक