शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

एलबीटी ऐरणीवर...

By admin | Updated: May 28, 2014 01:15 IST

औरंगाबाद : महानगरपालिका हद्दीतून एलबीटी कर कायमचा हटविण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने असहकार आंदोलन सुरू केले आहे.

औरंगाबाद : महानगरपालिका हद्दीतून एलबीटी कर कायमचा हटविण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने असहकार आंदोलन सुरू केले आहे. औरंगाबादेतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील मनपा हद्दीत व्यापारी असे आंदोलन करीत आहेत. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असून व्यापारी महासंघाअंतर्गत येणार्‍या अन्य व्यापारी संघटनांच्या बैठका घेण्यात येत आहेत. एलबीटीविरोधात ही अंतिम लढाई असल्याची प्रतिक्रिया व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. दरम्यान, महापालिकेने एलबीटी न भरणार्‍यांवर जप्तीचा निर्णय घेऊ, असा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिका आणि शहरवासीयांच्या दृष्टीने हा विषय स्फोटक बनला आहे. राज्य शासनाला कोणत्याही परिस्थितीत एलबीटी रद्द करावाच लागेल, असे आता शहरातील व्यापार्‍यांना वाटत आहे. महापालिकेचे ‘अर्थचक्र’ एलबीटीमुळे चक्रव्यूहात अडकले आहे. एलबीटी भरण्यास व्यापार्‍यांनी विरोध सुरू केल्यामुळे मे महिन्यात १८ ऐवजी ११ कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे. त्यामुळे पालिकेसमोर आर्थिक आव्हानांसह विकासकामे करण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. ५ जून रोजी शासन एलबीटीबाबत निर्णय घेणार असल्याची चर्चा व्यापार्‍यांत सुरू आहे. तोपर्यंत पालिका प्रशासनही वाट पाहण्याच्या भूमिकेत आहे. मनपाकडे ९५ कोटी रुपयांचा मालमत्ताकर आणि पाणीपट्टी मिळूनही तिजोरीत फक्त ११ कोटी रुपये शिल्लक आहेत. चार महिन्यांत ८७ कोटींचा हिशेब प्रशासनाने चुकता केला. विकासकामांसह मनपाच्या दैनंदिन खर्चावर मोठा परिणाम १ जूनपासून होण्याचे संकेत आहेत. आजवरच्या गोळाबेरजेनुसार २७ मेपर्यंत १७ कोटी रुपये एलबीटीतून जमा होणे क्रमप्राप्त असताना सध्या ११ कोटी रुपयांच्या आसपासच रक्कम जमा झाली आहे. आयुक्तांचे मत असे... एलबीटी बंद व्हावा अशी व्यापार्‍यांची मागणी आहे. मनपाचे अर्थकारण एलबीटीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. गेल्या वर्षी १९५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. व्यापार्‍यांनी विरोध केला असला तरी ७० टक्के एलबीटी पालिकेला या महिन्यात मिळाला आहे. १०० व्यापार्‍यांनी १० रुपये एलबीटी भरला आहे, यावर आयुक्त म्हणाले, या प्रकरणात काय कारवाई करायची याचा निर्णय घेण्यात येईल. फक्त आपत्कालीन कामे लोकसभा निवडणुकीसाठी ५ मार्च रोजी लागलेली आचारसंहिता २६ एप्रिल रोजी शिथिल झाली. त्यानंतर लगेच पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागली. ती आचारसंहिता २८ जूनपर्यंत असणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, पथदिवे, ड्रेनेज, नालेसफाई या कामांकडेच पालिका लक्ष देणार आहे. विकासकामांच्या संचिका, अंदाजपत्रकांची मंजुरी या काळात होणार नाही.