सितम सोनवणे , लातूरजिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून शौचालयाच्या बांधकामात राज्यभरात आपल्या कामाच्या माध्यमातून एक चांगला आदर्श उभारला आहे़ स्वच्छतेच्या कामात नेहमीच आघाडवर असणाऱ्या या विभागाने जिल्हाभरात आपल्या शौचालय बांधणी तसेच स्वच्छतेचे महत्व गावकऱ्यांना समजावून सांगून वर्षभरात एकूण ४९ गावे ही हागणदारी मुक्त केली आहेत़ यापुर्वीच ८० गावे ही हागणदारी मुक्त करण्यात आली होती़ मागच्या वर्षीच्या व सद्य:परिस्थितीतील मिळून जिल्ह्यात १२९ गावेही हागणदारी मुक्त झाली आहेत़शासनाने राज्यभरात नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच सर्वांना आपल्या आरोग्याची सुरक्षितता जपण्यासाठी सर्वत्र स्वच्छतेचा संदेश मिळावा आणि स्वच्छता राहावी, यासाठी मिशन स्वच्छ भारत अंतर्गत सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवली जात आहे़ या मोहिमे अंतर्गत गावा गावांत शौचालयाचे महत्व पटवून देण्यात येत आहे़ तसेच जे नागरिक शौचालयाचा वापर करत नाहीत अथवा कुटुंबात ज्याच्या घरी शौचालय नाही अशा नागरिकांना शासनाच्या वतीने शौचालयासाठी १२ हजार रुपयाचे अनुदान देवून शौचालयाचा वापर करण्यास प्रेरीत करण्यात येत आहे़ त्यामुळे गावपातळीपर्यंत शौचालय पोहोचले आहेत़ शौचालयाच्या चळवळीतून गावागावांना स्वच्छतेचे महत्व कळत असून आपल्या आरोग्यासाठी उघड्यावर शौचाला जाणे हे हानिकारक असल्याने नागरिकही आता शौचालयाचे बांधकाम करून शौचालयाचा वापर करत आहेत़ परिणामी या वर्षभरात जिल्ह्यातील ४९ गावांचा हागणदारी मुक्त गावांमध्ये समावेश झाला आहे़
लातूर जिल्ह्यात ४९ गावे हागणदारी मुक्त
By admin | Updated: November 18, 2015 00:39 IST