शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

उशिरा होणारे उड्डाण वेळेवर झाल्याने ३० प्रवाशांचे विमान हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 6:39 PM

एअर इंडियाच्या चुकीमुळे झाले प्रवाशांचे हाल

ठळक मुद्देदिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय

औरंगाबाद : एअर इंडिया विमान कंपनीमार्फत स्वातंत्र्यदिनी मुंबई- औरंगाबाद- दिल्ली, असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कंपनीच्या चुकीमुळे चांगलीच तारांबळ उडाली आणि या सर्व धावपळीत काहीही चूक नसताना निष्कारण मुंबईहून औरंगाबादला येणाऱ्या ३० प्रवाशांचे विमान हुकले.

दि.१५ आॅगस्ट रोजी उड्डाण करणारे एएल-४४२ हे मुंबई- औरंगाबाद- दिल्ली विमान नियोजित वेळेच्या तीन तास उशिरा औरंगाबादला येईल, असे मेलच्या साहाय्याने दि.१४ आॅगस्ट रोजी प्रवाशांना कळविण्यात आले होते. त्यानुसार विमानाचे उड्डाण मुंबई येथून दु. ३.२५ ऐवजी सायं. ६.३० ला होणार होते. त्यामुळे विमानाला उशीर असल्यामुळे प्रवासी बदललेल्या वेळेनुसार मुंबई विमानतळावर आले आणि विमान चक्क नियोजित वेळेवर येऊन त्याचे औरंगाबादकडे उड्डाणही झाले असल्याची माहिती प्रवाशांना मिळाली. यामुळे काहीही चूक नसताना विमान हुकल्यामुळे प्रवाशांना मात्र ऐनवेळी प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागले.

कामानिमित्त मुंबई- औरंगाबाद असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अगोदरच त्यांच्या मुंबई- औरंगाबाद प्रवासाचे तिकीट आरक्षित करून ठेवलेले होते; पण ऐनवेळी नियोजनाच्या अभावामुळे झालेला गोंधळ प्रवाशांचा तणाव वाढविणारा आणि ऐनवेळी त्यांना धावपळ करायला लावणारा ठरला.उद्योजक रवी माछर याविषयी सांगताना म्हणाले की, त्यांना एअर इंडिया कंपनीचा विमानाच्या उड्डाणाला उशीर होण्याविषयी माहिती देणारा मेल दि.१४ आॅगस्ट रोजी मिळाला. त्यामुळे ते उद्योजक मधुसूदन अग्रवाल यांच्यासह  बदललेल्या वेळेनुसार मुंबई विमानतळावर पोहोचले असता त्यांना औरंगाबादला जाणारे विमान नियोजित वेळेवर म्हणजेच दु. ३.३० वा. औरंगाबादसाठी रवाना झाल्याचे समजले. अग्रवाल हे रक्षाबंधनासाठी मुंबईहून औरंगाबादला येत होते. औरंगाबादचे काम आटोपून त्यांना त्याचदिवशी सायंकाळी दिल्लीला रवाना व्हायचे होते. मात्र, त्यांचे विमान हुकल्यावर ते चार्टर्ड प्लेनने औरंगाबादला आले आणि माछर हे अग्रवाल यांच्यासह याच विमानात औरंगाबादला आले. कंपनीच्या गलथान कारभारामुळे तब्बल ३० प्रवाशांचे विमान हुकले असल्याची बाब मुंबई विमानतळावर निदर्शनास आल्याचेही माछर यांनी सांगितले.

उद्योजक नंदकुमार कागलीवाल यांनाही या प्रसंगाला सामोरे जावे लागले. या अनुभवाविषयी सांगताना ते म्हणाले की, आम्हाला मेलवरून सूचना आल्यानुसार आम्ही उशिरा विमानतळावर पोहोचलो; पण विमान आगोदरच्याच वेळेला रवाना झालेले होते. या सर्व गोष्टीमुळे मला मुंबई ते शिर्डी असा प्रवास निरर्थक करावा लागला आणि शिर्डीहून मग मी औरंगाबादला आलो. असे केले नसते, तर एकच विमान असल्यामुळे मला दुसऱ्या दिवशीच्या विमानापर्यंत मुंबईला वाट पाहत विनाकारण ताटकळत बसावे लागले असते. 

गलथानपणाआधीच तोट्यात असलेल्या एअर इंडिया कंपनीला गलथान कारभारामुळे वेळोवेळी प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याविषयी एअर इंडियाच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोयप्रवाशांच्या पुढील सर्वच प्रवासाचे नियोजन या प्रकारामुळे विस्कळीत झाले. या घटनेमुळे औरंगाबाद येथून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचीही चांगलीच गैरसोय झाली. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ