शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

औरंगाबादमध्ये अखेरच्या टप्प्यात शासकीय तूर खरेदीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 19:08 IST

तूरीचा हंगाम संपत आला असताना आज जाधववाडीत शासकीय तूर खरेदीला सुरुवात झाली. नमनाला आलेले १५ क्विंटल तूरीपैकी १३ क्विंटल तूरीत आद्रता १३ टक्के भरल्याने त्या तूरी खरेदी करण्यात आली नाहीत. केवळ एफएक्यू दर्जाची २ क्विंटल तूरी खरेदी करण्यात आली. 

ठळक मुद्देशेतकर्‍यांची आॅनलाईन नोंदणी सुरु केली पण खरेदी सुरु न झाल्याने शेतकर्‍यांना आडत बाजारात ४३०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटलने तूर विकावी लागली. तूरीचा हंगाम संपत आल असतानाही शासकीय तूर खरेदी केंद्र सूरू न झाल्याने राज्य शासनावर चोहीबाजूने टिका होऊ लागली. अखेर शासनोन तूर खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले.

औरंगाबाद : तूरीचा हंगाम संपत आला असताना आज जाधववाडीत शासकीय तूर खरेदीला सुरुवात झाली. नमनाला आलेले १५ क्विंटल तूरीपैकी १३ क्विंटल तूरीत आद्रता १३ टक्के भरल्याने त्या तूरी खरेदी करण्यात आली नाहीत. केवळ एफएक्यू दर्जाची २ क्विंटल तूरी खरेदी करण्यात आली. 

यंदा बोनससह ५४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. शेतकर्‍यांची आॅनलाईन नोंदणी सुरु केली पण खरेदी सुरु न झाल्याने शेतकर्‍यांना आडत बाजारात ४३०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटलने तूर विकावी लागली. तूरीचा हंगाम संपत आल असतानाही शासकीय तूर खरेदी केंद्र सूरू न झाल्याने राज्य शासनावर चोहीबाजूने टिका होऊ लागली. अखेर शासनोन तूर खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले. जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत आज नाफेडच्या वतीने तूर खरेदी केंद्र सुरु झाले. याचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तूर खरेदी केंद्रावर २४९ शेतकर्‍यांनी आॅनलाईन नावनोंदणी केली आहे. सर्व शेतकर्‍यांना कोणत्या दिवशी केंद्रावर तूर विक्रीला आणायची त्याचे मेसेज पाठविले जात आहे. हमीभाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांना एफएक्यू दर्जाची तूर आणणे आवश्यक आहे. यावेळी संचालक, शेतकर्‍यांची उपस्थिती होती. 

औरंगाबादपेक्षा जालना कृउबाचा उत्तम विकास विधानसभाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले की, औरंगाबाद पेक्षा जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास उत्तम झाला आहे. येथे मात्र, जिल्हा न्यायालयापासून ते सर्वाच्च न्यायालयापर्यंत बाजार समितीसंदर्भातील असंख्य याचिका प्रलंबीत आहेत. यामुळे येथील विकासकामाला ब्रेक लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

आठवडाभरात मिळेल मास्टर प्लॅनला मंजूरी बाजार समितीच्या मास्टर प्लॅनला आठवड्याभरात मंजूरी मिळणार आहे. त्यानंतर जालनाचा धर्तीवर येथील मोंढ्याची स्थलांतराची प्रक्रिया सुरुवात करण्यात येईल,अशी घोषणाही हरिभाऊ बागडे यांनी यावेळी केली.

आडत बाजारात ५० हजार क्विंटल तूर खरेदीडिसेंबरच्या १५ तारखेपासून ते ३ फेब्रुवारीपर्यंत आडत बाजारात ५० हजार क्विंटल तूर खरेदी झाली. दररोज हजार ते दिड हजार क्विंटल तूर विक्रीला येत होती. आता हंगात संपुष्टात आला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद