शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

'अखेरचा जय महाराष्ट्र'; माजी जिल्हा प्रमुखांनी कृष्णकुंजवरून प्रतिसाद नसल्याने मनसे सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 13:03 IST

जानेवारी २०२० मध्ये दाशरथे यांनी शिवसेनेसोबत असलेली ३० वर्षांची नाळ तोडून मनसेचा झेंडा हाती घेतला होता.

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस अगोदर पक्षाला एक धक्का बसला आहे. १४ डिसेंबर २०२१ रोजी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखपद काढून घेतल्यानंतर अडगळीला पडलेले सुहास दाशरथे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले. अडीच महिन्यात पक्षप्रमुखांनी एकदाही संपर्क साधला नाही, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनीदेखील विचारात घेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे दाशरथे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जानेवारी २०२० मध्ये दाशरथे यांनी शिवसेनेसोबत असलेली ३० वर्षांची नाळ तोडून मनसेचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या नियुक्तीने पक्षात दोन गट पडले. विद्ममान जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर विरुद्ध दाशरथे असा शीतसंघर्ष पक्षात सुरू झाला. त्यानंतर कोरोना महामारीची साथ सुरू झाली. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात दाशरथे यांनी आंदोलने केली. तसेच सेनेच्या मोर्चा विरोधातही बॅनरबाजी केली. ही पक्षाची संस्कृती नाही, असा ठपका दाशरथे यांच्यावर ठेवून त्यांचे पद काढून पुन्हा खांबेकर यांना देण्यात आले. यातूनच नाराज झालेले दाशरथे हे मनसैनिक म्हणून कार्यरत राहिले. आज पक्षप्रमुख बोलवतील, उद्या बोलवतील, अशा अपेक्षेवर असलेले दाशरथे यांना काही कृृष्णकुंजवरून सांगावा आला नाही. शेवटी त्यांनी सोमवारी सोशल मीडियातून मनसेला जय महाराष्ट्र केल्याचे जाहीर केले. दरम्यान, दाशरथे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मनसे सोडण्याचा निर्णय मी घेतला आहे.

भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यतादाशरथे हे पुन्हा शिवसेनेत जातील, असे बाेलले जात आहे. परंतु आता त्यांना शिवसेनेत प्रवेश मिळणे अवघड आहे. आणि जर प्रवेश मिळाला तर त्यांना कधी व कोणते पद मिळणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे दाशरथे हे भाजपत जाण्याची दाट शक्यता आहे. पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा भाजपला किती फायदा होईल, हे आताच सांगता येणे अवघड आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे