शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

'अखेरचा जय महाराष्ट्र'; माजी जिल्हा प्रमुखांनी कृष्णकुंजवरून प्रतिसाद नसल्याने मनसे सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 13:03 IST

जानेवारी २०२० मध्ये दाशरथे यांनी शिवसेनेसोबत असलेली ३० वर्षांची नाळ तोडून मनसेचा झेंडा हाती घेतला होता.

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस अगोदर पक्षाला एक धक्का बसला आहे. १४ डिसेंबर २०२१ रोजी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखपद काढून घेतल्यानंतर अडगळीला पडलेले सुहास दाशरथे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले. अडीच महिन्यात पक्षप्रमुखांनी एकदाही संपर्क साधला नाही, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनीदेखील विचारात घेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे दाशरथे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जानेवारी २०२० मध्ये दाशरथे यांनी शिवसेनेसोबत असलेली ३० वर्षांची नाळ तोडून मनसेचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या नियुक्तीने पक्षात दोन गट पडले. विद्ममान जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर विरुद्ध दाशरथे असा शीतसंघर्ष पक्षात सुरू झाला. त्यानंतर कोरोना महामारीची साथ सुरू झाली. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात दाशरथे यांनी आंदोलने केली. तसेच सेनेच्या मोर्चा विरोधातही बॅनरबाजी केली. ही पक्षाची संस्कृती नाही, असा ठपका दाशरथे यांच्यावर ठेवून त्यांचे पद काढून पुन्हा खांबेकर यांना देण्यात आले. यातूनच नाराज झालेले दाशरथे हे मनसैनिक म्हणून कार्यरत राहिले. आज पक्षप्रमुख बोलवतील, उद्या बोलवतील, अशा अपेक्षेवर असलेले दाशरथे यांना काही कृृष्णकुंजवरून सांगावा आला नाही. शेवटी त्यांनी सोमवारी सोशल मीडियातून मनसेला जय महाराष्ट्र केल्याचे जाहीर केले. दरम्यान, दाशरथे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मनसे सोडण्याचा निर्णय मी घेतला आहे.

भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यतादाशरथे हे पुन्हा शिवसेनेत जातील, असे बाेलले जात आहे. परंतु आता त्यांना शिवसेनेत प्रवेश मिळणे अवघड आहे. आणि जर प्रवेश मिळाला तर त्यांना कधी व कोणते पद मिळणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे दाशरथे हे भाजपत जाण्याची दाट शक्यता आहे. पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा भाजपला किती फायदा होईल, हे आताच सांगता येणे अवघड आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे